शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

शिरोळ तालुक्यात पंचगंगा काळीकुट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:57 IST

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला काळेकुट्ट पाणी आले असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला काळेकुट्ट पाणी आले असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, दूषित पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी जीवनदायी आहे. मात्र, नदीपात्रात औद्योगिक कारखान्यांचे सांडपाणी, मैलायुक्त सांडपाण्यामुळे नदी पूर्णपणे प्रदूषित बनली आहे. त्यातच नदीपात्राला जलपर्णीचा विळखा, आदी कारणांमुळे जीवनदायी नदी मरणदायी ठरली आहे.पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. मात्र, ही आंदोलने काही काळापुरतीच केल्याने प्रश्न तसाच राहिला. काही महिन्यांपूर्वी आमदार उल्हास पाटील यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी जागर यात्रा काढली. संगम ते उगमापर्यंत पदयात्रेतून पंचगंगा काठच्या नागरिकांना जागे, तर नदी प्रदूषण करणारे घटक, प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाला इशारा देण्यात आला. या आंदोलनामुळे नदी प्रदूषण मुक्तीकडे वळेल, अशी आशा होती. मात्र, जागर मोर्चा हा केवळ आंदोलनापुरताच राहिला. पुन्हा ये रे माझ्या मागल्या... या उक्तीप्रमाणे आमदारांना व प्रदूषण नियंत्रण मंडळालाही याचा विसर पडला आहे.सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असताना व पात्रातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असताना औद्योगिकीकरणाचे व सांडपाणी थेट नदीत सोडल्यामुळे नदीपात्रातील पाणी काळेकुट्ट बनले असून, पाण्याला उग्र वास येत आहे. धरणातून पाणी सोडले तरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर सांडपाणी पुढे ढकलत येऊन शिरोळ तालुक्यात स्थिरावते. त्यामुळे दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीकाठावरील गावांना बसत आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.