शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

पंचगंगेचे ‘दुखणं’ बळावतंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:43 IST

कोल्हापूर :शहरातील साठ टक्के भागातच भूमिगत मैला-सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यांवर प्रक्रिया होते; मात्र शहराच्या उर्वरित चाळीस टक्के ...

कोल्हापूर :शहरातील साठ टक्के भागातच भूमिगत मैला-सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यांवर प्रक्रिया होते; मात्र शहराच्या उर्वरित चाळीस टक्के भागात अद्याप भूमिगत मैला सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. परिणामी रस्त्याकडेच्या गटारीतून, विविध नाल्यांतून हे मैलामिश्रित सांडपाणी शेवटी नदीत मिसळते. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढलेली आहे. त्याचा परिणाम कोल्हापूरच्या शहरवासीयांना भोगावा लागत नसला तरी नदीच्या खालच्या बाजूंकडील नागरिक मात्र त्रस्त आहेत.नागरिकांचे आरोग्य धोक्यातपंचगंगा नदीचे प्रदूषण ही एक चिंतेची बाब बनली आहे. अनेक ठिकाणांहून थेट पंचगंगा नदीत मैला व रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने नदीकाठावरील गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिरोळ तालुक्यात तर कर्करोगाचे रुग्ण आढळून येत आहेत, इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यात कोल्हापूर महानगरपालिकेचा वाटा मोठा आहे. नदी प्रदूषणप्रकरणी पालिकेला शेकडो शो कॉज नोटीस बजावल्या, गुन्हे दाखल झाले, उच्च न्यायालयाने फटकारले, राष्टÑीय हरित लवादाने दंड ठोठावण्याचा इशारा दिला. तरीही प्रदूषण रोखण्यात पालिकेला यश आलेले नाही.सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे जयंती व दुधाळी नाल्यांवर सांडपाणी उपसा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तरीही अनेकवेळा हे नाले ओसंडून वाहून थेट नदीत मिसळतात.त्याला तांत्रिक कारणे पुढे केली जातात. लाईन बझार येथे७६ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात आले असले, तरी त्याकडे ७५ एमएलडी सांडपाणी दिले जात नाही. जेमतेम ५० ते ५५ एमएलडी सांडपाणी तेथे पोहोचते. बाकी २० ते २५ एमएलडी सांडपाणी नदीत मिसळते.शहरात लक्षतीर्थ, फुलेवाडी, जामदार क्लब, पिकनिक पॉइंट, जुना बुधवार, रमणमळा, शुगर मिल, छत्रपती कॉलनी, बापट कॅम्प, राजहंस प्रेसनजीक, सीपीआर असे १२ छोटे मोठे नाले असून ते अडविणे आणि एस.टी.पी.कडे वळविणे यासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे; परंतु ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते आहे. यातून प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.