शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेचे ‘दुखणं’ बळावतंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:43 IST

कोल्हापूर :शहरातील साठ टक्के भागातच भूमिगत मैला-सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यांवर प्रक्रिया होते; मात्र शहराच्या उर्वरित चाळीस टक्के ...

कोल्हापूर :शहरातील साठ टक्के भागातच भूमिगत मैला-सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यांवर प्रक्रिया होते; मात्र शहराच्या उर्वरित चाळीस टक्के भागात अद्याप भूमिगत मैला सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. परिणामी रस्त्याकडेच्या गटारीतून, विविध नाल्यांतून हे मैलामिश्रित सांडपाणी शेवटी नदीत मिसळते. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढलेली आहे. त्याचा परिणाम कोल्हापूरच्या शहरवासीयांना भोगावा लागत नसला तरी नदीच्या खालच्या बाजूंकडील नागरिक मात्र त्रस्त आहेत.नागरिकांचे आरोग्य धोक्यातपंचगंगा नदीचे प्रदूषण ही एक चिंतेची बाब बनली आहे. अनेक ठिकाणांहून थेट पंचगंगा नदीत मैला व रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने नदीकाठावरील गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिरोळ तालुक्यात तर कर्करोगाचे रुग्ण आढळून येत आहेत, इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यात कोल्हापूर महानगरपालिकेचा वाटा मोठा आहे. नदी प्रदूषणप्रकरणी पालिकेला शेकडो शो कॉज नोटीस बजावल्या, गुन्हे दाखल झाले, उच्च न्यायालयाने फटकारले, राष्टÑीय हरित लवादाने दंड ठोठावण्याचा इशारा दिला. तरीही प्रदूषण रोखण्यात पालिकेला यश आलेले नाही.सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे जयंती व दुधाळी नाल्यांवर सांडपाणी उपसा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तरीही अनेकवेळा हे नाले ओसंडून वाहून थेट नदीत मिसळतात.त्याला तांत्रिक कारणे पुढे केली जातात. लाईन बझार येथे७६ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात आले असले, तरी त्याकडे ७५ एमएलडी सांडपाणी दिले जात नाही. जेमतेम ५० ते ५५ एमएलडी सांडपाणी तेथे पोहोचते. बाकी २० ते २५ एमएलडी सांडपाणी नदीत मिसळते.शहरात लक्षतीर्थ, फुलेवाडी, जामदार क्लब, पिकनिक पॉइंट, जुना बुधवार, रमणमळा, शुगर मिल, छत्रपती कॉलनी, बापट कॅम्प, राजहंस प्रेसनजीक, सीपीआर असे १२ छोटे मोठे नाले असून ते अडविणे आणि एस.टी.पी.कडे वळविणे यासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे; परंतु ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते आहे. यातून प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.