शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शिरोळमध्ये पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:43 IST

शिरोळ / कुरुंदवाड : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने व धरण क्षेत्रातील पाण्याच्या विसर्गाने पंचगंगा नदी ...

शिरोळ / कुरुंदवाड : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने व धरण क्षेत्रातील पाण्याच्या विसर्गाने पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पुन्हा धास्ती घेतली आहे.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता नृसिंहवाडी येथे कृष्णेची पाणी पातळी ४० फूट, राजापूर बंधाऱ्यावर २५.३ फूट, अंकली पुलाजवळ २३.८ फूट होती तर शिरोळ बंधाºयावर पंचगंगेची पाणी पातळी ३८.९ फूट, तेरवाड बंधाºयावर ४९ फूट होती.गतमहिन्यात महापुराने धुमाकूळ घातल्याने शेती, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. पशुधन वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापूर ओसरून जनजीवन सुरळीत होत असतात. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडले आहे. तेरवाड, शिरोळ बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेला आहे. कुरुंदवाड-जुना शिरोळ रस्त्यावरील अनवडी पूल पाण्याखाली गेला. कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.पन्हाळा परिसरात पुन्हा संततधारपन्हाळा : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पन्हाळा तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी पावसाची पुन्हा संततधार सुरू झाली. गुरुवारी घरोघरी गौरींचे आगमन होणार आहे. त्यात पावसाचा जोर कायम असल्याने सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाºया भाज्याही मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. पन्हाळा तालुक्यातील कुंभी, जांभळी, कासारी, धामणी आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पाऊस थांबला नाही तर अनेक बंधारे पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पन्हाळ्यावर २७ मिमी, तर बाजारभोगाव येथे सगळ्यात जास्त ५४ मिमी पावसाची नोंद झाली.कासारी खोºयात पावसाचा जोरअणूस्कुरा : कासारी खोºयात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, पाल बंधाºयावर पाणी आल्याने पाल, इजोली, सावर्डी, मरळे, बर्की गावांचा संपर्क तुटला आहे. करंजफेण परिसरात गेले तीन दिवस पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारनंतर करंजफेण ते पालदरम्यान बंधाºयावर पाणी आल्याने नदीपलीकडच्या नागरिकांची तारांबळ उडाली. बर्की येथील बंधाºयावर पाणी आल्याने धबधब्याकडे जाणारे पर्यटकही मागे परतल. तर दुपारनंतर परिसरांतील शाळांना सुटी दिली. दरम्यान, गेल्या महापुराचा अनुभव ताजा असल्याने नागरिक आताच जीवनावश्यक वस्तूंची जुळवाजुळव करत आहेत.