शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

शिरोळमध्ये पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:43 IST

शिरोळ / कुरुंदवाड : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने व धरण क्षेत्रातील पाण्याच्या विसर्गाने पंचगंगा नदी ...

शिरोळ / कुरुंदवाड : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने व धरण क्षेत्रातील पाण्याच्या विसर्गाने पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पुन्हा धास्ती घेतली आहे.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता नृसिंहवाडी येथे कृष्णेची पाणी पातळी ४० फूट, राजापूर बंधाऱ्यावर २५.३ फूट, अंकली पुलाजवळ २३.८ फूट होती तर शिरोळ बंधाºयावर पंचगंगेची पाणी पातळी ३८.९ फूट, तेरवाड बंधाºयावर ४९ फूट होती.गतमहिन्यात महापुराने धुमाकूळ घातल्याने शेती, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. पशुधन वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापूर ओसरून जनजीवन सुरळीत होत असतात. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडले आहे. तेरवाड, शिरोळ बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेला आहे. कुरुंदवाड-जुना शिरोळ रस्त्यावरील अनवडी पूल पाण्याखाली गेला. कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.पन्हाळा परिसरात पुन्हा संततधारपन्हाळा : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पन्हाळा तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी पावसाची पुन्हा संततधार सुरू झाली. गुरुवारी घरोघरी गौरींचे आगमन होणार आहे. त्यात पावसाचा जोर कायम असल्याने सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाºया भाज्याही मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. पन्हाळा तालुक्यातील कुंभी, जांभळी, कासारी, धामणी आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पाऊस थांबला नाही तर अनेक बंधारे पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पन्हाळ्यावर २७ मिमी, तर बाजारभोगाव येथे सगळ्यात जास्त ५४ मिमी पावसाची नोंद झाली.कासारी खोºयात पावसाचा जोरअणूस्कुरा : कासारी खोºयात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, पाल बंधाºयावर पाणी आल्याने पाल, इजोली, सावर्डी, मरळे, बर्की गावांचा संपर्क तुटला आहे. करंजफेण परिसरात गेले तीन दिवस पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारनंतर करंजफेण ते पालदरम्यान बंधाºयावर पाणी आल्याने नदीपलीकडच्या नागरिकांची तारांबळ उडाली. बर्की येथील बंधाºयावर पाणी आल्याने धबधब्याकडे जाणारे पर्यटकही मागे परतल. तर दुपारनंतर परिसरांतील शाळांना सुटी दिली. दरम्यान, गेल्या महापुराचा अनुभव ताजा असल्याने नागरिक आताच जीवनावश्यक वस्तूंची जुळवाजुळव करत आहेत.