शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्नी आराखडा केंद्राकडे पाठविणार

By admin | Updated: October 2, 2015 01:15 IST

राज्य सरकार सकारात्मक : मुंबईत बैठक, निधीसाठी सूचना

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण रोखण्याबद्दल कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी जिल्हा परिषदेने १०८ कोटींच्या तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण गुरुवारी मुंबई मंत्रालयातील पर्यावरण विभागातील बैठकीत झाले. पर्यावरण विभागाच्या अप्पर सचिव मालिनी शंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निधीसाठी केंद्राकडे आराखडा पाठविण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी आराखड्यासंबंधी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, कोल्हापूर, इचलकरंजीसह ग्रामीण भागातील ३९ गावे पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असल्याचे समोर आले. उच्च न्यायालयातही यासंबंधी याचिका दाखल झाली आहे. कोल्हापूर व इचलकरंजीस प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी निधी मिळत आहे. ३९ गावांनाही निधीची गरज आहे. त्यामुळे १०८ कोटींचा आराखडा तयार केला आहे. ३९ गावांतील लोकसंख्या सुमारे नऊ लाख आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तात्परत्या उपाययोजना लोकसहभागातून प्रभावीपणे राबविल्या आहेत. गणेशोत्सवात मूर्ती आणि निर्माल्य दानला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एक लाखांवर मूर्ती भक्तांनी स्वत:हून दान केल्या आहेत. या गावांत प्रदूषणाबद्दलच्या कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून निधी मिळावा. तसेच केंद्राकडून निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत.सचिव शंकर म्हणाल्या, निधीसाठी पाणीपुरवठा विभाग व ‘नाबार्ड’कडे प्रस्ताव पाठवावेत. पाणीपुरवठा विभागाला निधी देणे शक्य नसल्यास कारणे द्यावीत. राज्य शासनाचा २० टक्के निधीचा वाटा मिळविण्यासाठी प्रदूषण विषयाशी संबंधित सर्वच विभागांकडे प्रस्ताव देऊन पाठपुरावा करावा. निधी मिळण्यासाठी पर्यावरण विभाग सकारात्मक आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. यावेळी प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली. प्रदूषण, पाणीपुरवठा या विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी विविध सूचना दिल्या.विशेष कौतुकरक्षाविसर्जनामुळे जलप्रदूषण होते, यासंबंधी जिल्हा परिषदेने व्यापक जागृती केली. यामुळे रक्षाविसर्जन करण्याचे ग्रामस्थांनी स्वत:हून बंद केले आहे, असे सीईओ सुभेदार यांनी बैठकीत सांगितले. या यशस्वी उपक्रमाचे सचिव शंकर यांनी विशेष कौतुक केले.