शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्नी आराखडा केंद्राकडे पाठविणार

By admin | Updated: October 2, 2015 01:15 IST

राज्य सरकार सकारात्मक : मुंबईत बैठक, निधीसाठी सूचना

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण रोखण्याबद्दल कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी जिल्हा परिषदेने १०८ कोटींच्या तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण गुरुवारी मुंबई मंत्रालयातील पर्यावरण विभागातील बैठकीत झाले. पर्यावरण विभागाच्या अप्पर सचिव मालिनी शंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निधीसाठी केंद्राकडे आराखडा पाठविण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी आराखड्यासंबंधी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, कोल्हापूर, इचलकरंजीसह ग्रामीण भागातील ३९ गावे पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असल्याचे समोर आले. उच्च न्यायालयातही यासंबंधी याचिका दाखल झाली आहे. कोल्हापूर व इचलकरंजीस प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी निधी मिळत आहे. ३९ गावांनाही निधीची गरज आहे. त्यामुळे १०८ कोटींचा आराखडा तयार केला आहे. ३९ गावांतील लोकसंख्या सुमारे नऊ लाख आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तात्परत्या उपाययोजना लोकसहभागातून प्रभावीपणे राबविल्या आहेत. गणेशोत्सवात मूर्ती आणि निर्माल्य दानला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एक लाखांवर मूर्ती भक्तांनी स्वत:हून दान केल्या आहेत. या गावांत प्रदूषणाबद्दलच्या कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून निधी मिळावा. तसेच केंद्राकडून निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत.सचिव शंकर म्हणाल्या, निधीसाठी पाणीपुरवठा विभाग व ‘नाबार्ड’कडे प्रस्ताव पाठवावेत. पाणीपुरवठा विभागाला निधी देणे शक्य नसल्यास कारणे द्यावीत. राज्य शासनाचा २० टक्के निधीचा वाटा मिळविण्यासाठी प्रदूषण विषयाशी संबंधित सर्वच विभागांकडे प्रस्ताव देऊन पाठपुरावा करावा. निधी मिळण्यासाठी पर्यावरण विभाग सकारात्मक आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. यावेळी प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली. प्रदूषण, पाणीपुरवठा या विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी विविध सूचना दिल्या.विशेष कौतुकरक्षाविसर्जनामुळे जलप्रदूषण होते, यासंबंधी जिल्हा परिषदेने व्यापक जागृती केली. यामुळे रक्षाविसर्जन करण्याचे ग्रामस्थांनी स्वत:हून बंद केले आहे, असे सीईओ सुभेदार यांनी बैठकीत सांगितले. या यशस्वी उपक्रमाचे सचिव शंकर यांनी विशेष कौतुक केले.