शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

‘पंचगंगा’ प्रदूषण शिरोळच्या मुळावर

By admin | Updated: November 17, 2015 00:25 IST

नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीही बिघडली

संदीप बावचे --जयसिंगपूर -‘नेमीचे येतो पावसाळा’ याप्रमाणे प्रत्येक निवडणुकामध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यात प्रत्येकवेळी पंचगंगा प्रदूषण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, हे आश्वासनच राहिले आहे. अनेक वर्षांपासून नदी क्षेत्रात वाढलेले औद्योगिकरण, शहरातील सांडपाणी यामुळे पंचगंगेच्या काळ्या पाण्याची शिक्षा शिरोळकरांना भोगावी लागत आहे.पंचगंगा नदीमुळे तालुक्यातील शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, तेरवाड, धरणगुत्ती, आगर, कुरूंदवाड, शिरोळसह सुमारे २३ गावे ओलिताखाली आली. त्यामुळे शेती सुजलाम-सुफलाम् बनली. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. मात्र, बारमाही वाहणाऱ्या या नदीमुळे काठावरील गावात औद्योगिक क्षेत्र वाढले अन् कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत औद्योगिकरणाचे, शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत गेला. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे जलचर प्राणी नाश पावत असल्याने प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. वाहून येणारे प्रदूषित पाणी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ व तेरवाड या शेवटच्या बंधाऱ्यावर येऊन तटत असल्याने याचा फटका गेली अनेक वर्षे तालुक्यालाच जास्त बसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेच. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे पिकाऊ जमीन नापीक बनत आहे. दरवर्षी आॅक्टोबरनंतर दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी शासन पातळीवर अनेक वेळा आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकावर केवळ जुजबी कारवाई करण्यापलीकडे आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. ऐन दिवाळीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुटीचा फायदा घेत इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्याचे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडल्याने पंचगंगा नदी पात्रातील पाणी पूर्णपणे दूषित बनले आहे. नदीला काळेकुट्ट पाणी आले. पाण्याला उग्र वास सध्या येत असून नदीपात्रात अक्षरश: मृत माशांचा थर पडला होता. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त झाला. (पुर्वार्ध)