शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘पंचगंगा’ प्रदूषण शिरोळच्या मुळावर

By admin | Updated: November 17, 2015 00:25 IST

नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीही बिघडली

संदीप बावचे --जयसिंगपूर -‘नेमीचे येतो पावसाळा’ याप्रमाणे प्रत्येक निवडणुकामध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यात प्रत्येकवेळी पंचगंगा प्रदूषण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, हे आश्वासनच राहिले आहे. अनेक वर्षांपासून नदी क्षेत्रात वाढलेले औद्योगिकरण, शहरातील सांडपाणी यामुळे पंचगंगेच्या काळ्या पाण्याची शिक्षा शिरोळकरांना भोगावी लागत आहे.पंचगंगा नदीमुळे तालुक्यातील शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, तेरवाड, धरणगुत्ती, आगर, कुरूंदवाड, शिरोळसह सुमारे २३ गावे ओलिताखाली आली. त्यामुळे शेती सुजलाम-सुफलाम् बनली. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. मात्र, बारमाही वाहणाऱ्या या नदीमुळे काठावरील गावात औद्योगिक क्षेत्र वाढले अन् कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत औद्योगिकरणाचे, शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत गेला. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे जलचर प्राणी नाश पावत असल्याने प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. वाहून येणारे प्रदूषित पाणी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ व तेरवाड या शेवटच्या बंधाऱ्यावर येऊन तटत असल्याने याचा फटका गेली अनेक वर्षे तालुक्यालाच जास्त बसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेच. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे पिकाऊ जमीन नापीक बनत आहे. दरवर्षी आॅक्टोबरनंतर दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी शासन पातळीवर अनेक वेळा आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकावर केवळ जुजबी कारवाई करण्यापलीकडे आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. ऐन दिवाळीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुटीचा फायदा घेत इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्याचे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडल्याने पंचगंगा नदी पात्रातील पाणी पूर्णपणे दूषित बनले आहे. नदीला काळेकुट्ट पाणी आले. पाण्याला उग्र वास सध्या येत असून नदीपात्रात अक्षरश: मृत माशांचा थर पडला होता. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त झाला. (पुर्वार्ध)