शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘पंचगंगा’ प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवर

By admin | Updated: February 3, 2015 00:29 IST

तेरवाड बंधाऱ्याची पाहणी : कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी

कुरुंदवाड : इचलकरंजीतील औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडल्याने हे पाणी काळेकुट्ट बनले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठच्या नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आल्याने तीव्र संताप व्यक्तहोत आहे. संतप्त नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदविल्याने या विभागाचे क्षेत्र अधिकारी राजेश आवटी यांनी तेरवाड बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. मात्र, केवळ वारंवार पंचनामाच केला जात असून, कारवाईच होत नसल्याने नागरिकांनी आवटी यांना धारेवर धरले व या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील गावांना बसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे ही नदी येथील नागरिकांसाठी संकट बनली आहे. नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई व्हावी यासाठी शिरोळ तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना आंदोलन करून थकले. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणामुळे प्रदूषण करणारे बिनधास्तच राहिले याचा परिणाम शिरोळ तालुक्यातील नागरिकांना भोगावे लागत आहेत.नदी प्रदूषणामुळे तेरवाड बंधाऱ्यावर मासे मृत झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन करीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाणी, जलपर्णी व मृत मासे वाहून जाण्यासाठी तेरवाड बंधाऱ्याचे बरगे काढण्याचा निर्णय झाला होता. पाणी वाहून गेल्याने प्रदूषणाची तीव्रता कमी झाली होती. मात्र, पुन्हा इचलकरंजी शहरातून प्रोसेसचे रसायनयुक्त सांडपाणी ओढ्यावाटे नदीत सोडल्याने नदीला काळेकुट्ट पाणी आले असून, उग्र वास येत आहे. तसेच पाण्याला फेस येत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी राजेश आवटी बंधाऱ्यावर आले. अधिकारी आल्याचे समजताच स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, कल्लाप्पा बेडक्याळे, मलगोंडा पाटील, रोहित कारदगे, वैभव पाटील, दादा पाटील, नीलेश बरगाले आदींनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. अधिकारी आवटी यांनी नदीतील पाणी घेऊन तपासणीसाठी पंचनामा केला.