शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘पंचगंगा’ प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवर

By admin | Updated: February 3, 2015 00:29 IST

तेरवाड बंधाऱ्याची पाहणी : कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी

कुरुंदवाड : इचलकरंजीतील औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडल्याने हे पाणी काळेकुट्ट बनले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठच्या नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आल्याने तीव्र संताप व्यक्तहोत आहे. संतप्त नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदविल्याने या विभागाचे क्षेत्र अधिकारी राजेश आवटी यांनी तेरवाड बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. मात्र, केवळ वारंवार पंचनामाच केला जात असून, कारवाईच होत नसल्याने नागरिकांनी आवटी यांना धारेवर धरले व या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील गावांना बसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे ही नदी येथील नागरिकांसाठी संकट बनली आहे. नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई व्हावी यासाठी शिरोळ तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना आंदोलन करून थकले. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागाच्या नाकर्तेपणामुळे प्रदूषण करणारे बिनधास्तच राहिले याचा परिणाम शिरोळ तालुक्यातील नागरिकांना भोगावे लागत आहेत.नदी प्रदूषणामुळे तेरवाड बंधाऱ्यावर मासे मृत झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन करीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाणी, जलपर्णी व मृत मासे वाहून जाण्यासाठी तेरवाड बंधाऱ्याचे बरगे काढण्याचा निर्णय झाला होता. पाणी वाहून गेल्याने प्रदूषणाची तीव्रता कमी झाली होती. मात्र, पुन्हा इचलकरंजी शहरातून प्रोसेसचे रसायनयुक्त सांडपाणी ओढ्यावाटे नदीत सोडल्याने नदीला काळेकुट्ट पाणी आले असून, उग्र वास येत आहे. तसेच पाण्याला फेस येत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी राजेश आवटी बंधाऱ्यावर आले. अधिकारी आल्याचे समजताच स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, कल्लाप्पा बेडक्याळे, मलगोंडा पाटील, रोहित कारदगे, वैभव पाटील, दादा पाटील, नीलेश बरगाले आदींनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. अधिकारी आवटी यांनी नदीतील पाणी घेऊन तपासणीसाठी पंचनामा केला.