शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

By admin | Updated: August 27, 2015 00:31 IST

बाजार समिती : घाऊक बाजारात किरकोळ विक्री; राजकीय वरदहस्त; व्यापाऱ्यांवर उपासमारी

राजाराम लोंढे - कोल्हापूर  बाजार समितीच्या घाऊक बाजारात किरकोळ विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असताना, कोल्हापूर बाजार समितीत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही राजकीय वरदहस्तामुळे भाजीपाला व फळ मार्केटमध्ये राजरोसपणे किरकोळ विक्री सुरू आहे. परिणामी बाजार समितीनेच सुरू केलेला मिनी मार्केटमधील व्यवसाय पूर्णपणे संपला असून, तेथील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बाजार समितीने १९९३ ला गाळे बांधून भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याचे मिनी मार्केट तयार केले. या मार्केटमध्ये सुमारे शंभर गाळे आहेत. सुरुवातीच्या काळात एकेका व्यापाऱ्याचा दिवसाला तीन-चार हजार रुपये व्यवसाय व्हायचा; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून फळे व भाजीपाला मार्केटमध्येच किरकोळ विक्री सुरू केली आणि मिनी मार्केटमधील व्यवसायच संपला. घाऊक बाजारात माल घ्यायचा आणि तिथेच त्याची विक्री करण्याचे काम जवळपास शंभर व्यापारी करीत आहेत. याबाबत गेली चार वर्षे मिनी मार्केटमधील व्यापारी समितीकडे तक्रार करीत आहेत. समितीने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने घाऊकमध्ये किरकोळ विक्री करण्याची संख्या वाढत आहे. परिणामी मिनी मार्केटमधील व्यवसाय संपला आहे. दिवसभर बसून शंभर रुपयांचाही व्यवसाय होत नसल्याने येथील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मध्यंतरी, पुणे बाजार समितीमध्ये घाऊक मार्केटमध्ये किरकोळ विक्री होत असल्याचा वाद न्यायालयात गेला होता. यासारख्या विविध ठिकाणांहून याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. पणन कायद्यानुसार हे बेकायदेशीर असून, तशी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; पण कोल्हापूर बाजार समितीमध्ये राजरोसपणे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली सुरू आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी बाजार समितीतील मिनी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी समितीकडे तक्रार केली. त्यानुसार समितीने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या; पण समितीच्या एका बड्या नेत्याच्या आदेशामुळे पुन्हा ही कारवाई बारगळल्याची चर्चा सुरू आहे.दाद मागायची कोणाकडे?या व्यापाऱ्यांचे हातावरचे पोट असल्याने आतापर्यंत पाच-सहा वर्षे त्यांनी अन्याय सहन केला. दिवसभर गिऱ्हाईकच नसल्याने त्यांना असाहाय्यपणे बसावे लागते. अनेक वेळा तक्रारी करूनही समितीला पाझर फुटत नाही. समितीने कारवाई करण्यास सुरुवात केली की, राजकीय मंडळी ती दाबून टाकतात. न्यायालयीन आदेशाचा उघड-उघड अवमान होत असताना कोणालाही त्याची पर्वा नाही. अवमान याचिका दाखल करण्याइतपत त्या व्यापाऱ्यांची ताकद नाही; मग त्यांनी दाद मागायची कोणाकडे? जिल्हा उपनिबंधकांनी समितीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. घाऊक बाजारातील किरकोळ विक्रीबाबत आम्ही समितीला निवेदन देऊन थकलो आहे. आमचा व्यवसाय संपल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायालयाच्या आदेशाला ही मंडळी जुमानत नसतील तर आमच्यासारख्या गोरगरिबांचा आवाज ऐकणार कोण?- अकबर गोठेवाले (फळ विक्रेते, मिनी मार्केट) येत्या आठ-दहा दिवसांत सगळे व्यापारी मिनी मार्केटमध्येच जातील. घाऊक बाजारात कोणालाही विक्री करू देणार नाही. आम्हाला न्यायालयाच्या आदेशानुसार काम करावे लागेल.- विलास साठे (उपसभापती, बाजार समिती)