शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

By admin | Updated: August 27, 2015 00:31 IST

बाजार समिती : घाऊक बाजारात किरकोळ विक्री; राजकीय वरदहस्त; व्यापाऱ्यांवर उपासमारी

राजाराम लोंढे - कोल्हापूर  बाजार समितीच्या घाऊक बाजारात किरकोळ विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असताना, कोल्हापूर बाजार समितीत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही राजकीय वरदहस्तामुळे भाजीपाला व फळ मार्केटमध्ये राजरोसपणे किरकोळ विक्री सुरू आहे. परिणामी बाजार समितीनेच सुरू केलेला मिनी मार्केटमधील व्यवसाय पूर्णपणे संपला असून, तेथील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बाजार समितीने १९९३ ला गाळे बांधून भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याचे मिनी मार्केट तयार केले. या मार्केटमध्ये सुमारे शंभर गाळे आहेत. सुरुवातीच्या काळात एकेका व्यापाऱ्याचा दिवसाला तीन-चार हजार रुपये व्यवसाय व्हायचा; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून फळे व भाजीपाला मार्केटमध्येच किरकोळ विक्री सुरू केली आणि मिनी मार्केटमधील व्यवसायच संपला. घाऊक बाजारात माल घ्यायचा आणि तिथेच त्याची विक्री करण्याचे काम जवळपास शंभर व्यापारी करीत आहेत. याबाबत गेली चार वर्षे मिनी मार्केटमधील व्यापारी समितीकडे तक्रार करीत आहेत. समितीने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने घाऊकमध्ये किरकोळ विक्री करण्याची संख्या वाढत आहे. परिणामी मिनी मार्केटमधील व्यवसाय संपला आहे. दिवसभर बसून शंभर रुपयांचाही व्यवसाय होत नसल्याने येथील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मध्यंतरी, पुणे बाजार समितीमध्ये घाऊक मार्केटमध्ये किरकोळ विक्री होत असल्याचा वाद न्यायालयात गेला होता. यासारख्या विविध ठिकाणांहून याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. पणन कायद्यानुसार हे बेकायदेशीर असून, तशी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; पण कोल्हापूर बाजार समितीमध्ये राजरोसपणे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली सुरू आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी बाजार समितीतील मिनी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी समितीकडे तक्रार केली. त्यानुसार समितीने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या; पण समितीच्या एका बड्या नेत्याच्या आदेशामुळे पुन्हा ही कारवाई बारगळल्याची चर्चा सुरू आहे.दाद मागायची कोणाकडे?या व्यापाऱ्यांचे हातावरचे पोट असल्याने आतापर्यंत पाच-सहा वर्षे त्यांनी अन्याय सहन केला. दिवसभर गिऱ्हाईकच नसल्याने त्यांना असाहाय्यपणे बसावे लागते. अनेक वेळा तक्रारी करूनही समितीला पाझर फुटत नाही. समितीने कारवाई करण्यास सुरुवात केली की, राजकीय मंडळी ती दाबून टाकतात. न्यायालयीन आदेशाचा उघड-उघड अवमान होत असताना कोणालाही त्याची पर्वा नाही. अवमान याचिका दाखल करण्याइतपत त्या व्यापाऱ्यांची ताकद नाही; मग त्यांनी दाद मागायची कोणाकडे? जिल्हा उपनिबंधकांनी समितीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. घाऊक बाजारातील किरकोळ विक्रीबाबत आम्ही समितीला निवेदन देऊन थकलो आहे. आमचा व्यवसाय संपल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायालयाच्या आदेशाला ही मंडळी जुमानत नसतील तर आमच्यासारख्या गोरगरिबांचा आवाज ऐकणार कोण?- अकबर गोठेवाले (फळ विक्रेते, मिनी मार्केट) येत्या आठ-दहा दिवसांत सगळे व्यापारी मिनी मार्केटमध्येच जातील. घाऊक बाजारात कोणालाही विक्री करू देणार नाही. आम्हाला न्यायालयाच्या आदेशानुसार काम करावे लागेल.- विलास साठे (उपसभापती, बाजार समिती)