शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

करवीर तालुक्यातील पूरग्रस्त पिकांचे पंचनामे करा

By admin | Updated: July 17, 2016 01:02 IST

सदाभाऊ खोत यांचे आदेश : राज्यात एक कोटी फळझाड योजना राबविणार

इस्लामपूर : करवीर तालुक्यातील पुरात बुडालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी दिले.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सर्वाधिकार कृषी खात्याकडे घेऊन राज्यात एक कोटी फळझाड लागवड योजना राबवू तसेच राज्यात सेंद्रिय गावे निर्माण करून त्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करू. याशिवाय केरळच्या धर्तीवर शेतीमधील गुंतवणूक आणि उत्पादन वाढवून त्याच्या विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय मॉल उभारून बाजारपेठ उपलब्ध करून देऊ, अशी घोषणाही त्यांनी केली.येथील पंचायत समितीच्या सभागृहात मंत्री खोत यांनी शनिवारी सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय बैठक घेतली. बैठकीत तिन्ही जिल्ह्यांतील पाऊसमान, पेरणी व पीक (स्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत जत, आटपाडी येथे दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. करवीर तालुक्यात पाण्यात बुडालेल्या पिकांचे नुकसान होण्याचे संकट आहे. मंत्री खोत यांनी याबाबतचे पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश देत नुकसान भरपाईसाठी पीक व फळपीक विमा योजनेचे अर्ज शेतकऱ्यांकडून तातडीने भरून घ्या. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता कृषीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना केली.ते म्हणाले, कृषी विभागाकडे एकूण ११७ योजना आहेत. मात्र मी मुख्यमंत्र्यांकडे योजनांची संख्या कमी करण्याची मागणी करणार आहे. कमी योजना ठेवून त्या प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. कृषी विभागाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, पीक आणि फळपीक विमा योजना, विशेष घटक योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. ‘माथा ते पायथा’ पाणी अडवण्याचा कृती आराखडा तयार करा. निधीची चिंता करू नका. कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे यांनी तिन्ही जिल्ह्यातील विभागाचा आढावा सादर केला. जलयुक्त शिवारच्या कामांची माहिती दिली. त्यावर खोत यांनी या योजनेतून अडवलेल्या पाण्याचे लोकप्रतिनधींना बोलावून पूजन करा. त्याचा अहवाल द्या. दौऱ्यात कोठेही भेट देऊन या कामांची पाहणी करणार आहे. अधिकाऱ्यांनी अडचण आली तर, थेट माझ्याशी संपर्क साधावा. मात्र कामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही, असा इशाराही दिला. (वार्ताहर)बैठकीतून चॅनेलवर लक्षराज्यमंत्री सदाभाऊ खोत आपल्या विभागाची आढावा बैठक घेत होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांत नाशिकच्या बाजार समितीतील वृत्त प्रसारित होत होते. ही माहिती मिळताच खोत यांनी नाशिकच्या जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क साधून व्यापाऱ्यांशी चर्चा करा, त्यातून तोडगा काढा, मात्र ते ऐकत नसतील, तर जीवनावश्यक सेवा अधिनियमाखाली कडक कारवाई करा. त्यांना काळ्या यादीत टाका. पुढे काय करायचे ते सरकार बघून घेईल, अशा सूचना दिल्या.