शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाचाकटेवाडीकरांना पाण्यासाठी डोंगरातील झऱ्याचाच आधार

By admin | Updated: June 3, 2015 01:00 IST

पाणीप्रश्न गंभीर : गावगाडा चालविणाऱ्याचा मात्र ग्रामस्थांना पाणीप्रश्न मिटविण्यासाठी भूलथापा; एक घागर पाणी चार रुपयाला

प्रकाश पाटील -कोपार्डे --जिल्ह्याच्या पश्चिमेला असणाऱ्या १२ वाड्यांपैकी एक पाचाकटेवाडीमध्ये पाणीप्रश्न गंभीर बनला असून, पाण्यासाठी रोजगार सोडून महिलांना पायपीट करावी लागत आहे. डोंगरावरील झऱ्याचे पाणी न मिळाल्यास घागरीला चार रुपये मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. समृद्ध असणाऱ्या जिल्ह्यात ही शोकांतिका म्हणावी लागेल. पासार्डेपैकी पाचाकटेवाडी (ता. करवीर) सुमारे १५०० लोकवस्तीचे डोंगरीवाडी. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी डोंगरातील पाण्याच्या झऱ्याचा आधार घ्यावा लागत आहे. स्वातंत्र्याची पहाट होऊन अर्धशतक झाले तरी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ना लोकप्रतिनिधी, ना प्रशासनाला स्वारस्य असल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी २२ लाखांची नवीन पेयजल योजना मंजूर झाली. मुख्य पाईपलाईनचे काम झाले. ज्या झऱ्याला पाणी चांगल्या प्रमाणात आहे तेथे चेंबर बांधला गेलेलाच नाही. ज्या ठिकाणी चेंबर बांधला आहे व सायफन पद्धतीला पाईप टाकली आहे ती चुकीच्या ठिकाणी असल्याच्या ग्रामस्थांनी तक्रारी मांडल्या. जुन्या नळयोजनेतून पाण्याच्या टाकीत काही प्रमाणात पाणी साठते. हे पाणी चार दिवसांतून येते. तेही पूर्ण क्षमतेने मिळत नाही. केवळ चार घागरी पाण्यावर चार दिवस एकेका कुटुंबाला तहान भागवावी लागत आहे. शेतीची कामे व रोजगार बाजूला ठेवून पुरुष मंडळी, तर स्त्रियांना घरकामापेक्षा पाण्याला महत्त्व द्यावे लागत आहे. डोंगर उतारावरून चार कि. मी. खाली पासार्डेतील शेतकरी रणधीर मोरे यांच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थ व महिला येतात. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना नागरिक २५० रुपये देऊन एक हजार लिटर पाणी आरडेवाडी व पासार्डेतून विकत आणत आहेत. नवीन नळपाणी योजना त्वरित पूर्ण करून पाणीप्रश्न मार्गी लावावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.पाणीप्रश्न गंभीर बनल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील, सुनील पाटील यांनी पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले. दरम्यान, उप ठेकेदार संभाजी पाचाकटे यांनी योजनेचे पाणी चेंबर बांधण्यासाठी थांबविले आहे. येत्या आठ दिवसांत ग्रामस्थांना पाणी देऊ, असे आश्वासन दिले आहे.दुसरीकडे चेंबरचे ठिकाण निश्चित करून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाले तर योग्य होईल, अन्यथा काम लांबणीवर पडणार आहे.लोकसहभागाशिवाय विकास नाही. ग्रामस्थांनी पाणी योजनेच्या कामात लक्ष घालावे. पुन्हा पुन्हा योजना मिळत नाहीत. योग्य ठिकाणी चेंबर व्हावा यासाठी पाठपुरावा करू- राजेंद्र सूर्यवंशी, पंचायत समितीचे सदस्य