शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

‘के. पी.’ हटावसाठी कायपण

By admin | Updated: October 2, 2014 00:37 IST

कॉँग्रेसची निवडणुकीतून माघार : विरोधक एकवटले

संजय पारकर- राधानगरी कॉँग्रेसच्या नेत्यांनी तलवारी म्यान केल्यामुळे निवडणुकीतील लढतीचे चित्रच बदलले आहे. बहुरंगी लढत अपेक्षित असताना आता तिरंगी होणार आहे. यामुळे प्रचंड चुरशीने निवडणूक होणार आहे. आमदार के. पी. पाटील यांना सोपी वाटणारी निवडणूक काहीशी खडतर होणार आहे. या निवडणुकीत ‘के.पी. हटाव’साठी कायपण करण्यावर विरोधकांचा भर राहील, असे दिसते.विस्तार व मतदार संख्येने मोठा असलेल्या या मतदारसंघात मागील दोन निवडणुकीत विरोधकांतील दुहीमुळे के. पी. पाटील दुसऱ्यांदा विजयी झाले. तिन्ही तालुक्यांत असलेली राष्ट्रवादी कॉँग्रेसची मजबूत फळी, बहुतांश प्रमुख सत्तास्थाने, नियमित संपर्क व विकासकामांचा दावा या जिवावर विजयाची हॅट्ट्रिक करायची, असा चंग बाधून त्यांनी दोन महिन्यांपासून प्रचारही सुरू केला आहे.राज्यातील सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली नसती, तरीही येथे मात्र संपूर्ण कॉँग्रेस त्यांच्या विरोधातच राहिली असती. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्या राजकीय त्रासाने गांजलेल्या कॉँग्रेसच्या राधानगरीतील नेत्यांनी एकजूट करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र, पक्षाची उमेदवारी मिळविण्यात भुदरगडमधील माजी आमदार बजरंग देसाई यशस्वी ठरले. त्यामुळे असंतोषात पुन्हा भर पडली. त्यांना सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यासाठी दोन दिवस खलबते सुरू होती. तसा निर्णयही झाला. त्यामुळे एकाकी पडण्याऐवजी निवडणुकीत माघारीचा निर्णय देसाई यांनी घेतला.गतवेळी अपक्ष म्हणून लढून लक्ष्यवेधी मते घेतलेल्या प्रकाश आबिटकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून शिवसेनेत सक्रिय होऊन या पक्षाची उमेदवारी मिळविली. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना मिळालेला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ते लढतीत प्रमुख उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाले होते. कॉँग्रेसचा उमेदवारच रिंगणात नसणे हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. तशी चर्चा झाल्याचेही बोलले जाते. सेना-भाजपची युती तुटल्याने हे दोन पक्ष वेगळे झाले. तशी भाजपची ताकद येथे नाहीच आहे. मात्र, ’स्वाभिमानी’, आरपीआय (आठवले गट) यांच्या युतीतून ‘स्वाभिमानी’चे प्रा. जालंदर पाटील रिंगणात आहेत. केंद्रातील सत्ता, खा. राजू शेट्टी यांचा करिष्मा व शेतकऱ्यांचे संघटन याचा त्यांना फायदा होणार असल्याने लढतीत तेही राहणार आहेत. याशिवाय तांबाळे येथील महिला साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे साताप्पा कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक सुतार, अपक्ष अशोक भाऊसो खोत, उमेश गणपती पाटील हे ही रिंगणात आहेत; पण खरी लढत के. पी. पाटील, प्रकाश आबिटकर व प्रा. जालंदर पाटील यांच्यातच होणार आहे. राधानगरी तालुक्यातील कॉँग्रेसमध्ये के.पी. हटावसाठी कायपण, अशी भूमिका होती. त्यामुळे शिवसेनेचे असूनही आबिटकर यांना त्यांचे पाठबळ मिळू शकते. भुदरगडमधील दिनकरराव जाधव यांनी मागीलवेळी त्यांना पाठबळ दिले होते. आगामी ‘बिद्री’ची निवडणूक लक्षात घेता यावेळीही तसे होऊ शकते. मात्र, बजरंग देसाई व आबिटकर हे स्थानिक प्रतिस्पर्धी असल्याने त्यांचा निर्णय काय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेसाठी आठ उमेदवार रिंगणात असून कालपासून सुरू असलेल्या चर्चेतून कॉँग्रेसने धक्कादायक निर्णय घेतला. पक्षाचे उमेदवार माजी आमदार बजरंग देसाई यांनी, तसेच हिंदुराव चौगले, अरुण डोंगळे, सत्यजित जाधव यांनीही अर्ज मागे घेतले. त्यांचा पाठिंबा आबिटकर यांना राहण्याची शक्यता असल्याने के. पी. पाटील यांचा चांगलाच कस लागेल.राधानगरीएकूण मतदार ३,0६,00५ नावपक्षके. पी. पाटील राष्ट्रवादीप्रकाश आबिटकर शिवसेनाजालंदर पाटील स्वाभिमानीअशोक सुतार बहुजन मुक्ती पार्टीसाताप्पा कांबळे बसपाअशोक खोतअपक्षउमेश कांबळेअपक्षविजयमाला देसाई अपक्ष