शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

‘के. पी.’ हटावसाठी कायपण

By admin | Updated: October 2, 2014 00:37 IST

कॉँग्रेसची निवडणुकीतून माघार : विरोधक एकवटले

संजय पारकर- राधानगरी कॉँग्रेसच्या नेत्यांनी तलवारी म्यान केल्यामुळे निवडणुकीतील लढतीचे चित्रच बदलले आहे. बहुरंगी लढत अपेक्षित असताना आता तिरंगी होणार आहे. यामुळे प्रचंड चुरशीने निवडणूक होणार आहे. आमदार के. पी. पाटील यांना सोपी वाटणारी निवडणूक काहीशी खडतर होणार आहे. या निवडणुकीत ‘के.पी. हटाव’साठी कायपण करण्यावर विरोधकांचा भर राहील, असे दिसते.विस्तार व मतदार संख्येने मोठा असलेल्या या मतदारसंघात मागील दोन निवडणुकीत विरोधकांतील दुहीमुळे के. पी. पाटील दुसऱ्यांदा विजयी झाले. तिन्ही तालुक्यांत असलेली राष्ट्रवादी कॉँग्रेसची मजबूत फळी, बहुतांश प्रमुख सत्तास्थाने, नियमित संपर्क व विकासकामांचा दावा या जिवावर विजयाची हॅट्ट्रिक करायची, असा चंग बाधून त्यांनी दोन महिन्यांपासून प्रचारही सुरू केला आहे.राज्यातील सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली नसती, तरीही येथे मात्र संपूर्ण कॉँग्रेस त्यांच्या विरोधातच राहिली असती. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्या राजकीय त्रासाने गांजलेल्या कॉँग्रेसच्या राधानगरीतील नेत्यांनी एकजूट करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र, पक्षाची उमेदवारी मिळविण्यात भुदरगडमधील माजी आमदार बजरंग देसाई यशस्वी ठरले. त्यामुळे असंतोषात पुन्हा भर पडली. त्यांना सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यासाठी दोन दिवस खलबते सुरू होती. तसा निर्णयही झाला. त्यामुळे एकाकी पडण्याऐवजी निवडणुकीत माघारीचा निर्णय देसाई यांनी घेतला.गतवेळी अपक्ष म्हणून लढून लक्ष्यवेधी मते घेतलेल्या प्रकाश आबिटकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून शिवसेनेत सक्रिय होऊन या पक्षाची उमेदवारी मिळविली. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना मिळालेला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ते लढतीत प्रमुख उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाले होते. कॉँग्रेसचा उमेदवारच रिंगणात नसणे हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. तशी चर्चा झाल्याचेही बोलले जाते. सेना-भाजपची युती तुटल्याने हे दोन पक्ष वेगळे झाले. तशी भाजपची ताकद येथे नाहीच आहे. मात्र, ’स्वाभिमानी’, आरपीआय (आठवले गट) यांच्या युतीतून ‘स्वाभिमानी’चे प्रा. जालंदर पाटील रिंगणात आहेत. केंद्रातील सत्ता, खा. राजू शेट्टी यांचा करिष्मा व शेतकऱ्यांचे संघटन याचा त्यांना फायदा होणार असल्याने लढतीत तेही राहणार आहेत. याशिवाय तांबाळे येथील महिला साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे साताप्पा कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक सुतार, अपक्ष अशोक भाऊसो खोत, उमेश गणपती पाटील हे ही रिंगणात आहेत; पण खरी लढत के. पी. पाटील, प्रकाश आबिटकर व प्रा. जालंदर पाटील यांच्यातच होणार आहे. राधानगरी तालुक्यातील कॉँग्रेसमध्ये के.पी. हटावसाठी कायपण, अशी भूमिका होती. त्यामुळे शिवसेनेचे असूनही आबिटकर यांना त्यांचे पाठबळ मिळू शकते. भुदरगडमधील दिनकरराव जाधव यांनी मागीलवेळी त्यांना पाठबळ दिले होते. आगामी ‘बिद्री’ची निवडणूक लक्षात घेता यावेळीही तसे होऊ शकते. मात्र, बजरंग देसाई व आबिटकर हे स्थानिक प्रतिस्पर्धी असल्याने त्यांचा निर्णय काय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेसाठी आठ उमेदवार रिंगणात असून कालपासून सुरू असलेल्या चर्चेतून कॉँग्रेसने धक्कादायक निर्णय घेतला. पक्षाचे उमेदवार माजी आमदार बजरंग देसाई यांनी, तसेच हिंदुराव चौगले, अरुण डोंगळे, सत्यजित जाधव यांनीही अर्ज मागे घेतले. त्यांचा पाठिंबा आबिटकर यांना राहण्याची शक्यता असल्याने के. पी. पाटील यांचा चांगलाच कस लागेल.राधानगरीएकूण मतदार ३,0६,00५ नावपक्षके. पी. पाटील राष्ट्रवादीप्रकाश आबिटकर शिवसेनाजालंदर पाटील स्वाभिमानीअशोक सुतार बहुजन मुक्ती पार्टीसाताप्पा कांबळे बसपाअशोक खोतअपक्षउमेश कांबळेअपक्षविजयमाला देसाई अपक्ष