शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

कागलमधील ३00 कुटुंबांना २५ वर्षांनी घरांची मालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 01:03 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : गेली २५ ते ३० वर्षे भोगवटदार म्हणून नाव असल्याने नगरपालिका अतिक्रमणधारक ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : गेली २५ ते ३० वर्षे भोगवटदार म्हणून नाव असल्याने नगरपालिका अतिक्रमणधारक म्हणून कधी कारवाई करेल, हे सांगता येत नव्हते. झोपडपट्टीवजा वसाहतीमधील राहत असलेल्यांवर भीतीची टांगती तलवार घेऊन जगणाऱ्या कागल शहरातील पाच वसाहतींमधील जवळपास ३00 कुटुंबांना आता त्यांच्या घराच्या मालकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या झोपडपट्टी अतिक्रमण नियमित करण्याच्या निर्णयाने त्यांना गुड न्यूज मिळाली आहे.शासनाने सन २००६ पूर्वीच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेल्या घरांना रीतसर मान्यता देण्याचा कायदा केला आहे. त्यानुसार कागल शहरातील पाच वसाहतींमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामध्ये रेल्वेलाईन वसाहत (मुस्लिम कब्रस्तान-पसारेवाडी रस्त्यावर), राजीव गांधी वसाहत, शाहूनगर बेघर वसाहतीच्या कमानीजवळील सत्यप्रकाश वसाहत, वड्डवाडी परिसरातील वसाहत आणि बिरदेव मंदिर, स्मशानभूमी परिसरातील वसाहत यांचा यात समावेश आहे. शहराच्या वाढत्या विस्तारीकरणात आज कागल वाट मिळेल तिकडे पसरत चालले आहे; पण २५ ते ३० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. शहरातीलच नागरिक कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या संख्येमुळे जुनी घरे अपुरी पडू लागल्याने शासकीय जागावर अतिक्रमण करून राहू लागले. जागा विकत घेऊन घर बांधण्याएवढी आर्थिक कुवतही त्यांची नव्हती. त्यातून मग या अतिक्रमणधारकांच्या वसाहती कागल शहरात उभ्या राहिल्या.इतर ठिकाणांप्रमाणे त्यांना राजकीय संरक्षण मिळाले, भोगवटदार म्हणून नावे लागली; पण मालकी शासनाचीच कायम होती. आता हे सर्वजण भोगवटदाराऐवजी मालक म्हणून नोंदले जाणार आहेत. रेल्वेलाईन वसाहतीचे लोक तर १९९५ पूर्वीच्या झोपडपट्टी कायद्यानुसार प्रयत्न करीत होते; पण आता या नव्या कायद्याने हे काम पूर्ण झाले आहे.भोगवटदार व मालक यांतील फरकभोगवटदार म्हणून नाव असले तरी बांधकामासाठी रीतसर परवानगी मिळत नव्हती. अतिक्रमणमधील बांधकाम करताना या मर्यादा होत्या. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नव्हता. कर्ज काढता येत नव्हते. इतकेच नाही तर पाणी कनेक्शन, वीज कनेक्शनही घेण्यास अडचणी होत्या आणि राजकीय त्रास तर वेगळाच. आता मालक म्हणून नाव लागल्यावर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, घर बांधणीसाठी कर्ज हे लाभ घेणे शक्य होणार आहे.म्हणून रेल्वेलाईन...कागलमधील मुस्लिम कब्रस्तानच्या बाजूने पसारेवाडीकडे जाणाºया रस्त्याकडेला १९९० पासूनच हे अतिक्रमण सुरू झाले. रेल्वेच्या डब्यासारखी लांबच्या लांब ही घरे-झोपड्या बांधल्या गेल्या. त्यामुळे या वसाहतीचे नाव रेल्वेलाईन पडले. तर बेघर वसाहत नियमित झाली. तरीसुद्धा तेथे एक अतिक्रमणधारकांची नवीन वसाहत उदयास आली. तिचे नाव ‘सत्यप्रकाश’ असे आहे. हे नाव कसे दिले गेले याचा उलगडा होत नाही. आता मालक होणारे बहुतांशी गरीब, मजूर, शेतमजूर अशा वर्गांतील आहेत.