शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कागलमधील ३00 कुटुंबांना २५ वर्षांनी घरांची मालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 01:03 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : गेली २५ ते ३० वर्षे भोगवटदार म्हणून नाव असल्याने नगरपालिका अतिक्रमणधारक ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : गेली २५ ते ३० वर्षे भोगवटदार म्हणून नाव असल्याने नगरपालिका अतिक्रमणधारक म्हणून कधी कारवाई करेल, हे सांगता येत नव्हते. झोपडपट्टीवजा वसाहतीमधील राहत असलेल्यांवर भीतीची टांगती तलवार घेऊन जगणाऱ्या कागल शहरातील पाच वसाहतींमधील जवळपास ३00 कुटुंबांना आता त्यांच्या घराच्या मालकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या झोपडपट्टी अतिक्रमण नियमित करण्याच्या निर्णयाने त्यांना गुड न्यूज मिळाली आहे.शासनाने सन २००६ पूर्वीच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेल्या घरांना रीतसर मान्यता देण्याचा कायदा केला आहे. त्यानुसार कागल शहरातील पाच वसाहतींमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामध्ये रेल्वेलाईन वसाहत (मुस्लिम कब्रस्तान-पसारेवाडी रस्त्यावर), राजीव गांधी वसाहत, शाहूनगर बेघर वसाहतीच्या कमानीजवळील सत्यप्रकाश वसाहत, वड्डवाडी परिसरातील वसाहत आणि बिरदेव मंदिर, स्मशानभूमी परिसरातील वसाहत यांचा यात समावेश आहे. शहराच्या वाढत्या विस्तारीकरणात आज कागल वाट मिळेल तिकडे पसरत चालले आहे; पण २५ ते ३० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. शहरातीलच नागरिक कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या संख्येमुळे जुनी घरे अपुरी पडू लागल्याने शासकीय जागावर अतिक्रमण करून राहू लागले. जागा विकत घेऊन घर बांधण्याएवढी आर्थिक कुवतही त्यांची नव्हती. त्यातून मग या अतिक्रमणधारकांच्या वसाहती कागल शहरात उभ्या राहिल्या.इतर ठिकाणांप्रमाणे त्यांना राजकीय संरक्षण मिळाले, भोगवटदार म्हणून नावे लागली; पण मालकी शासनाचीच कायम होती. आता हे सर्वजण भोगवटदाराऐवजी मालक म्हणून नोंदले जाणार आहेत. रेल्वेलाईन वसाहतीचे लोक तर १९९५ पूर्वीच्या झोपडपट्टी कायद्यानुसार प्रयत्न करीत होते; पण आता या नव्या कायद्याने हे काम पूर्ण झाले आहे.भोगवटदार व मालक यांतील फरकभोगवटदार म्हणून नाव असले तरी बांधकामासाठी रीतसर परवानगी मिळत नव्हती. अतिक्रमणमधील बांधकाम करताना या मर्यादा होत्या. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नव्हता. कर्ज काढता येत नव्हते. इतकेच नाही तर पाणी कनेक्शन, वीज कनेक्शनही घेण्यास अडचणी होत्या आणि राजकीय त्रास तर वेगळाच. आता मालक म्हणून नाव लागल्यावर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, घर बांधणीसाठी कर्ज हे लाभ घेणे शक्य होणार आहे.म्हणून रेल्वेलाईन...कागलमधील मुस्लिम कब्रस्तानच्या बाजूने पसारेवाडीकडे जाणाºया रस्त्याकडेला १९९० पासूनच हे अतिक्रमण सुरू झाले. रेल्वेच्या डब्यासारखी लांबच्या लांब ही घरे-झोपड्या बांधल्या गेल्या. त्यामुळे या वसाहतीचे नाव रेल्वेलाईन पडले. तर बेघर वसाहत नियमित झाली. तरीसुद्धा तेथे एक अतिक्रमणधारकांची नवीन वसाहत उदयास आली. तिचे नाव ‘सत्यप्रकाश’ असे आहे. हे नाव कसे दिले गेले याचा उलगडा होत नाही. आता मालक होणारे बहुतांशी गरीब, मजूर, शेतमजूर अशा वर्गांतील आहेत.