शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोहीचा महाप्रवाह सत्ता उलथवेल

By admin | Updated: July 18, 2014 00:28 IST

भारत पाटणकर : सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने कोल्हापुरात सत्कार

कोल्हापूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेला छेद देत अखिल भारतीय साहित्य संमेलनाला प्रतिशब्द म्हणून ‘विद्रोही साहित्य संमेलना’ची चळवळ सुरू झाली. या विद्रोही, बौद्ध आणि दलित साहित्य मांडणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन त्याचा महाप्रवाह बनवला तर तो सत्ता उलथवून टाकेल, असे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केले. बाराव्या विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज, गुरुवारी सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने पाटणकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार्थ पोळके, डॉ. सतीश घाटगे, ज. रा. दाभोळे, डी. जी. भास्कर, बबनराव रानगे, आर. बी. कोसंबी, अनिल म्हमाणे उपस्थित होते. यावेळी पाटणकर यांचा घोंगडे, फेटा, हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हे संमेलन २ व ३ आॅगस्टला येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये होत आहे.पाटणकर म्हणाले, वास्तववादी साहित्य बहुजनांनी, शोषितांनी निर्माण केले म्हणून विद्रोहीचे पहिले साहित्य संमेलन जाणीवपूर्वक मुंबईतील धारावीमध्ये घेतले. आता दिल्लीतील सत्ता नागपुरातून चालवली जाते. पण, विद्रोही, बौद्ध आणि दलित साहित्य मांडणारे एकत्र आले तर महाराष्ट्रात त्यांचा पराभव कोणी रोखू शकणार नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे वैदिक प्रकरण घडविले. आता महाराजांनी बहुजन उद्धारासाठी केलेल्या कार्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची वेळ आली आहे. पोळके म्हणाले, ‘अखिल भारतीय’ नावाने जी साहित्य संमेलने होतात त्यात बहुजन साहित्यिक नसतो, वंचितांच्या जगण्याचे वास्तव नसले तरी अशा संमेलनावर सरकार लाखो रुपये उधळते. या विरोधात ही चळवळ सुरू आहे. संत तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, जनाबार्इंनी सामान्यांचे जगणे मांडले. दलित साहित्याने खऱ्या अर्थाने मराठीला सजग केले, पण ही वैदिक पद्धती विद्रोहाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या कित्येक दाभोलकरांचे खून करत राहील. त्याच्याशी लढण्यासाठी सगळ््यांनी एकत्र आले पाहिजे. यावेळी आर. बी. कोसंबी, सतीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब घस्ते यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)