शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

विद्रोहीचा महाप्रवाह सत्ता उलथवेल

By admin | Updated: July 18, 2014 00:28 IST

भारत पाटणकर : सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने कोल्हापुरात सत्कार

कोल्हापूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेला छेद देत अखिल भारतीय साहित्य संमेलनाला प्रतिशब्द म्हणून ‘विद्रोही साहित्य संमेलना’ची चळवळ सुरू झाली. या विद्रोही, बौद्ध आणि दलित साहित्य मांडणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन त्याचा महाप्रवाह बनवला तर तो सत्ता उलथवून टाकेल, असे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केले. बाराव्या विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज, गुरुवारी सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने पाटणकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार्थ पोळके, डॉ. सतीश घाटगे, ज. रा. दाभोळे, डी. जी. भास्कर, बबनराव रानगे, आर. बी. कोसंबी, अनिल म्हमाणे उपस्थित होते. यावेळी पाटणकर यांचा घोंगडे, फेटा, हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हे संमेलन २ व ३ आॅगस्टला येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये होत आहे.पाटणकर म्हणाले, वास्तववादी साहित्य बहुजनांनी, शोषितांनी निर्माण केले म्हणून विद्रोहीचे पहिले साहित्य संमेलन जाणीवपूर्वक मुंबईतील धारावीमध्ये घेतले. आता दिल्लीतील सत्ता नागपुरातून चालवली जाते. पण, विद्रोही, बौद्ध आणि दलित साहित्य मांडणारे एकत्र आले तर महाराष्ट्रात त्यांचा पराभव कोणी रोखू शकणार नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे वैदिक प्रकरण घडविले. आता महाराजांनी बहुजन उद्धारासाठी केलेल्या कार्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची वेळ आली आहे. पोळके म्हणाले, ‘अखिल भारतीय’ नावाने जी साहित्य संमेलने होतात त्यात बहुजन साहित्यिक नसतो, वंचितांच्या जगण्याचे वास्तव नसले तरी अशा संमेलनावर सरकार लाखो रुपये उधळते. या विरोधात ही चळवळ सुरू आहे. संत तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, जनाबार्इंनी सामान्यांचे जगणे मांडले. दलित साहित्याने खऱ्या अर्थाने मराठीला सजग केले, पण ही वैदिक पद्धती विद्रोहाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या कित्येक दाभोलकरांचे खून करत राहील. त्याच्याशी लढण्यासाठी सगळ््यांनी एकत्र आले पाहिजे. यावेळी आर. बी. कोसंबी, सतीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब घस्ते यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)