शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

विद्रोहीचा महाप्रवाह सत्ता उलथवेल

By admin | Updated: July 18, 2014 00:28 IST

भारत पाटणकर : सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने कोल्हापुरात सत्कार

कोल्हापूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेला छेद देत अखिल भारतीय साहित्य संमेलनाला प्रतिशब्द म्हणून ‘विद्रोही साहित्य संमेलना’ची चळवळ सुरू झाली. या विद्रोही, बौद्ध आणि दलित साहित्य मांडणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन त्याचा महाप्रवाह बनवला तर तो सत्ता उलथवून टाकेल, असे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केले. बाराव्या विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज, गुरुवारी सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने पाटणकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार्थ पोळके, डॉ. सतीश घाटगे, ज. रा. दाभोळे, डी. जी. भास्कर, बबनराव रानगे, आर. बी. कोसंबी, अनिल म्हमाणे उपस्थित होते. यावेळी पाटणकर यांचा घोंगडे, फेटा, हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हे संमेलन २ व ३ आॅगस्टला येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये होत आहे.पाटणकर म्हणाले, वास्तववादी साहित्य बहुजनांनी, शोषितांनी निर्माण केले म्हणून विद्रोहीचे पहिले साहित्य संमेलन जाणीवपूर्वक मुंबईतील धारावीमध्ये घेतले. आता दिल्लीतील सत्ता नागपुरातून चालवली जाते. पण, विद्रोही, बौद्ध आणि दलित साहित्य मांडणारे एकत्र आले तर महाराष्ट्रात त्यांचा पराभव कोणी रोखू शकणार नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे वैदिक प्रकरण घडविले. आता महाराजांनी बहुजन उद्धारासाठी केलेल्या कार्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची वेळ आली आहे. पोळके म्हणाले, ‘अखिल भारतीय’ नावाने जी साहित्य संमेलने होतात त्यात बहुजन साहित्यिक नसतो, वंचितांच्या जगण्याचे वास्तव नसले तरी अशा संमेलनावर सरकार लाखो रुपये उधळते. या विरोधात ही चळवळ सुरू आहे. संत तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, जनाबार्इंनी सामान्यांचे जगणे मांडले. दलित साहित्याने खऱ्या अर्थाने मराठीला सजग केले, पण ही वैदिक पद्धती विद्रोहाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या कित्येक दाभोलकरांचे खून करत राहील. त्याच्याशी लढण्यासाठी सगळ््यांनी एकत्र आले पाहिजे. यावेळी आर. बी. कोसंबी, सतीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब घस्ते यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)