शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

महर्षी शिंंदे यांचे समग्र जीवन लोकांसमोर

By admin | Updated: February 27, 2016 01:41 IST

मुंबईत आज ग्रंथ प्रकाशन : मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; आत्मपर लेखनाचा दुसरा खंड

कोल्हापूर : आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत अस्पृश्यता उद्धाराचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनावरील आत्मपर लेखनाचा दुसरा खंड आज, शनिवारी प्रकाशित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात हा समारंभ सायंकाळी सहा वाजता होत आहे. मराठी साहित्यातील व्यासंगी समीक्षक गो. मा. पवार व नव्या पिढीतील समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. महर्षी शिंदे यांचे समग्र वाङ्मय प्रसिद्ध करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हाती घेतला आहे. त्यातील पहिला खंड ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, संशोधन व आणि चिंतन..’ पाच वर्षांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. त्याचे लेखन गो. मा. पवार यांनीच केले आहे. पवार हे शिंदे यांचे तसे नातजावई लागतात. गेली तीस वर्षे त्यांनी अत्यंत कष्टाने विविध साधने जमा करून त्यांची पाच चरित्रे लिहिली आहेत. आताचा हा खंड आत्मपर लेखनाचा असून त्यातही रोजनिशी, माझ्या आठवणी व अनुभव, प्रवासवर्णन असे तीन भाग आहेत. या तिन्ही भागांच्या स्वतंत्र पुस्तिकाही उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. त्याची अत्यंत सुबक छपाई कोल्हापुरातील शासकीय मुद्रणालयात झाली आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये अस्पृश्यतेसारखा माणुसकीला कलंकभूत असणारा प्रश्न अस्तित्वात आहे याची कोणाला फारशी जाणीवसुद्धा नव्हती. अशा काळात सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी व त्यांची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी सन १९०६ मध्ये ‘डिस्पे्रड क्लासेस मिशन’ ही अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी संस्था स्थापन करण्याचा द्रष्टेपणा आणि कर्तेपणा महर्षी शिंदे यांनी दाखविला. महर्षी शिंदे हे अस्पृश्यता निवारण कार्याच्या जागृती पर्वाचे प्रणेते व ह्या कार्याचे अग्रदूत होते. शिंदे यांनी आयुष्याच्या तीन वेगवेगळ््या कालखंडामध्ये रोजनिशी लिहिली. ती त्यावेळच्या वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे. तशीच ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही प्रत्यय देणारी आहे. महर्षी शिंदे यांची रोजनिशी वाचताना आपण एक चांगल्या दर्जाची वाङ्मयीन कृती वाचत आहोत असा अनुभव येतो. त्यांचे आत्मचरित्र वाचताना एका सात्विक, निरहंकारी, क्षमाशील वृत्तीच्या पुरुषाने लिहिले आहे, असा प्रत्यय सातत्याने येत राहतो. महर्षी शिंदे यांचे हे आत्मपर लेखन हे कृतीवीर असणाऱ्या धर्मनिष्ठ पुरुषाचे आहे. त्यांच्या प्रवास वर्णन लेखनातूनही उच्चप्रतीचे चिंतन आपल्याला आढळते. महर्षी शिंदे हे जसे सुधारक व विचारवंत होते त्याचप्रमाणे ते एक श्रेष्ठ दर्जाचे ललित साहित्याचे सर्जनशील लेखकही होते. नव्या ग्रंथातून त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्याने समाजासमोर येत आहे.