शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

महर्षी शिंंदे यांचे समग्र जीवन लोकांसमोर

By admin | Updated: February 27, 2016 01:41 IST

मुंबईत आज ग्रंथ प्रकाशन : मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; आत्मपर लेखनाचा दुसरा खंड

कोल्हापूर : आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत अस्पृश्यता उद्धाराचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनावरील आत्मपर लेखनाचा दुसरा खंड आज, शनिवारी प्रकाशित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात हा समारंभ सायंकाळी सहा वाजता होत आहे. मराठी साहित्यातील व्यासंगी समीक्षक गो. मा. पवार व नव्या पिढीतील समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. महर्षी शिंदे यांचे समग्र वाङ्मय प्रसिद्ध करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हाती घेतला आहे. त्यातील पहिला खंड ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, संशोधन व आणि चिंतन..’ पाच वर्षांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. त्याचे लेखन गो. मा. पवार यांनीच केले आहे. पवार हे शिंदे यांचे तसे नातजावई लागतात. गेली तीस वर्षे त्यांनी अत्यंत कष्टाने विविध साधने जमा करून त्यांची पाच चरित्रे लिहिली आहेत. आताचा हा खंड आत्मपर लेखनाचा असून त्यातही रोजनिशी, माझ्या आठवणी व अनुभव, प्रवासवर्णन असे तीन भाग आहेत. या तिन्ही भागांच्या स्वतंत्र पुस्तिकाही उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. त्याची अत्यंत सुबक छपाई कोल्हापुरातील शासकीय मुद्रणालयात झाली आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये अस्पृश्यतेसारखा माणुसकीला कलंकभूत असणारा प्रश्न अस्तित्वात आहे याची कोणाला फारशी जाणीवसुद्धा नव्हती. अशा काळात सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी व त्यांची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी सन १९०६ मध्ये ‘डिस्पे्रड क्लासेस मिशन’ ही अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी संस्था स्थापन करण्याचा द्रष्टेपणा आणि कर्तेपणा महर्षी शिंदे यांनी दाखविला. महर्षी शिंदे हे अस्पृश्यता निवारण कार्याच्या जागृती पर्वाचे प्रणेते व ह्या कार्याचे अग्रदूत होते. शिंदे यांनी आयुष्याच्या तीन वेगवेगळ््या कालखंडामध्ये रोजनिशी लिहिली. ती त्यावेळच्या वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे. तशीच ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही प्रत्यय देणारी आहे. महर्षी शिंदे यांची रोजनिशी वाचताना आपण एक चांगल्या दर्जाची वाङ्मयीन कृती वाचत आहोत असा अनुभव येतो. त्यांचे आत्मचरित्र वाचताना एका सात्विक, निरहंकारी, क्षमाशील वृत्तीच्या पुरुषाने लिहिले आहे, असा प्रत्यय सातत्याने येत राहतो. महर्षी शिंदे यांचे हे आत्मपर लेखन हे कृतीवीर असणाऱ्या धर्मनिष्ठ पुरुषाचे आहे. त्यांच्या प्रवास वर्णन लेखनातूनही उच्चप्रतीचे चिंतन आपल्याला आढळते. महर्षी शिंदे हे जसे सुधारक व विचारवंत होते त्याचप्रमाणे ते एक श्रेष्ठ दर्जाचे ललित साहित्याचे सर्जनशील लेखकही होते. नव्या ग्रंथातून त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्याने समाजासमोर येत आहे.