शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या पोलिसांच्या बदल्या कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:46 IST

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रनगरीतील उद्योजक, सूत दलाल, व्यापारी यांच्यासह अवैध व्यावसायिकांशी आपले ‘सूत’ जुळवून घेऊन वर्षानुवर्षे ‘तग’ धरून शहरातच नोकरी करणाऱ्या पोलिसांच्या यंदातरी बदल्या होणार का? शहरातील तीन पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वाहतूक शाखा या ठिकाणीच बदल्या करून घेऊन आपली ‘यंत्रणा’ नियमित ठेवणाºया अशा ...

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रनगरीतील उद्योजक, सूत दलाल, व्यापारी यांच्यासह अवैध व्यावसायिकांशी आपले ‘सूत’ जुळवून घेऊन वर्षानुवर्षे ‘तग’ धरून शहरातच नोकरी करणाऱ्या पोलिसांच्या यंदातरी बदल्या होणार का? शहरातील तीन पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वाहतूक शाखा या ठिकाणीच बदल्या करून घेऊन आपली ‘यंत्रणा’ नियमित ठेवणाºया अशा पोलिसांमुळे खाकीला डाग पडताना दिसत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.पोलीस अधिकाºयांची दोन-तीन वर्षांनी, तर कर्मचाºयांची सहा वर्षांनी दुसरीकडे बदली करण्याचा नियम आहे. एक कर्मचारी एका डिव्हीजनमध्ये (उपअधीक्षक कार्यक्षेत्र) १० ते १२ वर्षे राहू शकतो. त्यानंतर त्या कर्मचाºयाची दुसºया डिव्हीजनमध्ये बदली केली जाते. कारण अधिकारी किंवा कर्मचारी यांचे एखाद्याबरोबर निर्माण झालेला वाद, पूर्वग्रहदूषितपणा यामुळे संबंधिताला त्रास होऊ शकतो. तसेच लागलेली अन्य स्वरूपाची ‘यंत्रणा’ मोडीत निघावी, हा उद्देश आहे. मात्र, तो उद्देश इचलकरंजी शहरात सफल होताना दिसत नाही. काही पोलीस कर्मचारी वर्षानुवर्षे याच शहरातील विविध पोलीस ठाण्यांत बदली करून घेतात. हद्द बदलली तरी जुन्या हद्दीतील ‘यंत्रणा’ कार्यान्वित ठेवली जाते. त्यानंतर बदली झालेल्या ठाण्यांतही यंत्रणेत सहभागी होता येते, असा दुहेरी फायदा ते करून घेतात.प्रामाणिकपणे काम करणाºयांवर अन्याय1 काही मर्जीतील पोलीस कर्मचारी बदली झाली तरी त्याच पोलीस ठाण्यात काम करत राहतात. बदली झालेल्या ठिकाणी हजर होत नाहीत, त्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांमार्फत वशिलाही लावतात. तसेच काही कर्मचारी वशिलेबाजीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालय याठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. अशा कर्मचाºयांचे उपद्व्याप व उठाठेव पाहिली, तर सर्वसामान्यांना धसका बसेल, अशी असते.2 पोलीस खात्यातील अशा काही कर्मचाºयांमुळे अनेकवेळा खाकी वर्दीवर डाग पडतात. अशा प्रकारांमुळे प्रामाणिकपणे काम करणाºया पोलिसांवर मात्र अन्याय होतो. त्यांचे खच्चीकरण होऊन त्याचा कामावरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देऊन यंदातरी अशा कर्मचाºयांची उचलबांगडी करावी, अशी मागणी होत आहे.