शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या पोलिसांच्या बदल्या कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:46 IST

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रनगरीतील उद्योजक, सूत दलाल, व्यापारी यांच्यासह अवैध व्यावसायिकांशी आपले ‘सूत’ जुळवून घेऊन वर्षानुवर्षे ‘तग’ धरून शहरातच नोकरी करणाऱ्या पोलिसांच्या यंदातरी बदल्या होणार का? शहरातील तीन पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वाहतूक शाखा या ठिकाणीच बदल्या करून घेऊन आपली ‘यंत्रणा’ नियमित ठेवणाºया अशा ...

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रनगरीतील उद्योजक, सूत दलाल, व्यापारी यांच्यासह अवैध व्यावसायिकांशी आपले ‘सूत’ जुळवून घेऊन वर्षानुवर्षे ‘तग’ धरून शहरातच नोकरी करणाऱ्या पोलिसांच्या यंदातरी बदल्या होणार का? शहरातील तीन पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वाहतूक शाखा या ठिकाणीच बदल्या करून घेऊन आपली ‘यंत्रणा’ नियमित ठेवणाºया अशा पोलिसांमुळे खाकीला डाग पडताना दिसत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.पोलीस अधिकाºयांची दोन-तीन वर्षांनी, तर कर्मचाºयांची सहा वर्षांनी दुसरीकडे बदली करण्याचा नियम आहे. एक कर्मचारी एका डिव्हीजनमध्ये (उपअधीक्षक कार्यक्षेत्र) १० ते १२ वर्षे राहू शकतो. त्यानंतर त्या कर्मचाºयाची दुसºया डिव्हीजनमध्ये बदली केली जाते. कारण अधिकारी किंवा कर्मचारी यांचे एखाद्याबरोबर निर्माण झालेला वाद, पूर्वग्रहदूषितपणा यामुळे संबंधिताला त्रास होऊ शकतो. तसेच लागलेली अन्य स्वरूपाची ‘यंत्रणा’ मोडीत निघावी, हा उद्देश आहे. मात्र, तो उद्देश इचलकरंजी शहरात सफल होताना दिसत नाही. काही पोलीस कर्मचारी वर्षानुवर्षे याच शहरातील विविध पोलीस ठाण्यांत बदली करून घेतात. हद्द बदलली तरी जुन्या हद्दीतील ‘यंत्रणा’ कार्यान्वित ठेवली जाते. त्यानंतर बदली झालेल्या ठाण्यांतही यंत्रणेत सहभागी होता येते, असा दुहेरी फायदा ते करून घेतात.प्रामाणिकपणे काम करणाºयांवर अन्याय1 काही मर्जीतील पोलीस कर्मचारी बदली झाली तरी त्याच पोलीस ठाण्यात काम करत राहतात. बदली झालेल्या ठिकाणी हजर होत नाहीत, त्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांमार्फत वशिलाही लावतात. तसेच काही कर्मचारी वशिलेबाजीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालय याठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. अशा कर्मचाºयांचे उपद्व्याप व उठाठेव पाहिली, तर सर्वसामान्यांना धसका बसेल, अशी असते.2 पोलीस खात्यातील अशा काही कर्मचाºयांमुळे अनेकवेळा खाकी वर्दीवर डाग पडतात. अशा प्रकारांमुळे प्रामाणिकपणे काम करणाºया पोलिसांवर मात्र अन्याय होतो. त्यांचे खच्चीकरण होऊन त्याचा कामावरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देऊन यंदातरी अशा कर्मचाºयांची उचलबांगडी करावी, अशी मागणी होत आहे.