शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कर्जाची खाती अधिकाऱ्यांच्या माथी

By admin | Updated: September 19, 2014 00:29 IST

राष्ट्रीयीकृत बॅँकांतील चित्र : सहामाही, वर्षअखेरीमुळे वसुलीला जोर

रमेश पाटील- कसबा बावडा -गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जाची थकबाकी वाढतच चालली आहे. या कर्जाची वसुली करणे हे सध्या सर्वच बँकांपुढे मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यामुळे अनेक बँकांच्या व्यवस्थापनाने मोठ्या थकीत कर्जाच्या खात्याच्या वसुलीची जबाबदारी ब्रँच मॅॅनेजर आणि अधिकाऱ्यांवर टाकली आहे. बँकेचे दैनंदिन कामकाज पाहून उर्वरित वेळेत दिलेल्या कर्जदाराच्या ‘लिस्ट’प्रमाणे कर्जाच्या वसुलीचा पाठपुरावा करावयाचा आहे. सहामाही वर्षअखेरीमुळे अधिकाऱ्यांना हे काम सध्या करावेच लागत आहे.सहामाही वर्षअखेर (३० सप्टेंबर) जवळ आल्याने सध्या सर्वच बँकांत धांदल सुरू आहे. कर्जाची वसुली करणे, एन.पी.ए. कमी करणे, ठेवी कमी न होतील याची दक्षता घेणे, नवीन कर्ज पाठविणे, आदी कामे जोरात सुरू आहेत. सहामाही वर्षअखेरीमुळे राष्ट्रीयीकृत बँकांत अशी धांदल सुरू असली, तरी नागरी बँकांत थोडा निवांतपणा आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत मात्र सहामाही नफा जाहीर करावा लागत असल्याने त्यांची धडपड थकबाकी कमी करण्यावर आहे. या बँकांच्या नफ्यावर बँकांचे शेअर मार्केट अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक बँक आपल्या बँकेचा नफा कसा जास्त होईल, याकडे लक्ष देते.दरम्यान, नोटिसी पाठवूनही कर्जदार थकीत कर्ज वेळेत भरत नसल्याने बँकांच्या थकीत कर्जदाराच्या खात्याचे वाटप अधिकाऱ्यांना करण्याचा निर्णय यंदापासून घेतला आहे. सध्या मॅनेजर आणि अधिकारी यांना थकबाकी कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. इतर कर्मचाऱ्यांनीही थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला थकीत कर्जाची किती खाती दिली आणि त्या खात्यातून किती थकबाकी वसूल झाली, याचा रिपोर्ट दर महिन्याला पाठवावा लागत असल्याने अधिकारी रस्त्यावर दिसत आहेत.बँका चांगल्या कर्जदारांच्या शोधातथकीत कर्जे दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे बँका सध्या चांगल्या कर्जदारांच्या शोधात आहेत. ज्यांचे उत्पन्न चांगले आहे, कागदपत्रे चांगली आहेत, स्थावर संपत्ती चांगली आहे, अशा कर्जदाराला बँका चटकन कर्ज देतात; परंतु सध्या असे कर्जदार कमी येत असल्याने बँका चांगल्या कर्जदारांचा शोध घेत असतात.नागरी बँकांची थकबाकी कमीकाही वर्षांपूर्वी नागरी बँकाची थकबाकी जास्त असायची. त्यावेळी राष्ट्रीयकृत बॅकांची थकबाकी अगदी किरकोळ दोन किंवा तीन टक्के इतकीच असायची. आता उलटी परिस्थिती झाली आहे. आता अनेक नागरी बँकाची थकबाकी शुन्य टक्के आहे. मात्र, त्यावेळी राष्ट्रीयकृत बँकांची थकबाकी वाढताना दिसत आहे.