शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

थकीत कर्जाची खाती अधिकाऱ्यांच्या माथी

By admin | Updated: September 19, 2014 00:29 IST

राष्ट्रीयीकृत बॅँकांतील चित्र : सहामाही, वर्षअखेरीमुळे वसुलीला जोर

रमेश पाटील- कसबा बावडा -गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जाची थकबाकी वाढतच चालली आहे. या कर्जाची वसुली करणे हे सध्या सर्वच बँकांपुढे मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यामुळे अनेक बँकांच्या व्यवस्थापनाने मोठ्या थकीत कर्जाच्या खात्याच्या वसुलीची जबाबदारी ब्रँच मॅॅनेजर आणि अधिकाऱ्यांवर टाकली आहे. बँकेचे दैनंदिन कामकाज पाहून उर्वरित वेळेत दिलेल्या कर्जदाराच्या ‘लिस्ट’प्रमाणे कर्जाच्या वसुलीचा पाठपुरावा करावयाचा आहे. सहामाही वर्षअखेरीमुळे अधिकाऱ्यांना हे काम सध्या करावेच लागत आहे.सहामाही वर्षअखेर (३० सप्टेंबर) जवळ आल्याने सध्या सर्वच बँकांत धांदल सुरू आहे. कर्जाची वसुली करणे, एन.पी.ए. कमी करणे, ठेवी कमी न होतील याची दक्षता घेणे, नवीन कर्ज पाठविणे, आदी कामे जोरात सुरू आहेत. सहामाही वर्षअखेरीमुळे राष्ट्रीयीकृत बँकांत अशी धांदल सुरू असली, तरी नागरी बँकांत थोडा निवांतपणा आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत मात्र सहामाही नफा जाहीर करावा लागत असल्याने त्यांची धडपड थकबाकी कमी करण्यावर आहे. या बँकांच्या नफ्यावर बँकांचे शेअर मार्केट अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक बँक आपल्या बँकेचा नफा कसा जास्त होईल, याकडे लक्ष देते.दरम्यान, नोटिसी पाठवूनही कर्जदार थकीत कर्ज वेळेत भरत नसल्याने बँकांच्या थकीत कर्जदाराच्या खात्याचे वाटप अधिकाऱ्यांना करण्याचा निर्णय यंदापासून घेतला आहे. सध्या मॅनेजर आणि अधिकारी यांना थकबाकी कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. इतर कर्मचाऱ्यांनीही थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला थकीत कर्जाची किती खाती दिली आणि त्या खात्यातून किती थकबाकी वसूल झाली, याचा रिपोर्ट दर महिन्याला पाठवावा लागत असल्याने अधिकारी रस्त्यावर दिसत आहेत.बँका चांगल्या कर्जदारांच्या शोधातथकीत कर्जे दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे बँका सध्या चांगल्या कर्जदारांच्या शोधात आहेत. ज्यांचे उत्पन्न चांगले आहे, कागदपत्रे चांगली आहेत, स्थावर संपत्ती चांगली आहे, अशा कर्जदाराला बँका चटकन कर्ज देतात; परंतु सध्या असे कर्जदार कमी येत असल्याने बँका चांगल्या कर्जदारांचा शोध घेत असतात.नागरी बँकांची थकबाकी कमीकाही वर्षांपूर्वी नागरी बँकाची थकबाकी जास्त असायची. त्यावेळी राष्ट्रीयकृत बॅकांची थकबाकी अगदी किरकोळ दोन किंवा तीन टक्के इतकीच असायची. आता उलटी परिस्थिती झाली आहे. आता अनेक नागरी बँकाची थकबाकी शुन्य टक्के आहे. मात्र, त्यावेळी राष्ट्रीयकृत बँकांची थकबाकी वाढताना दिसत आहे.