शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

थकीत कर्जाची खाती अधिकाऱ्यांच्या माथी

By admin | Updated: September 19, 2014 00:29 IST

राष्ट्रीयीकृत बॅँकांतील चित्र : सहामाही, वर्षअखेरीमुळे वसुलीला जोर

रमेश पाटील- कसबा बावडा -गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जाची थकबाकी वाढतच चालली आहे. या कर्जाची वसुली करणे हे सध्या सर्वच बँकांपुढे मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यामुळे अनेक बँकांच्या व्यवस्थापनाने मोठ्या थकीत कर्जाच्या खात्याच्या वसुलीची जबाबदारी ब्रँच मॅॅनेजर आणि अधिकाऱ्यांवर टाकली आहे. बँकेचे दैनंदिन कामकाज पाहून उर्वरित वेळेत दिलेल्या कर्जदाराच्या ‘लिस्ट’प्रमाणे कर्जाच्या वसुलीचा पाठपुरावा करावयाचा आहे. सहामाही वर्षअखेरीमुळे अधिकाऱ्यांना हे काम सध्या करावेच लागत आहे.सहामाही वर्षअखेर (३० सप्टेंबर) जवळ आल्याने सध्या सर्वच बँकांत धांदल सुरू आहे. कर्जाची वसुली करणे, एन.पी.ए. कमी करणे, ठेवी कमी न होतील याची दक्षता घेणे, नवीन कर्ज पाठविणे, आदी कामे जोरात सुरू आहेत. सहामाही वर्षअखेरीमुळे राष्ट्रीयीकृत बँकांत अशी धांदल सुरू असली, तरी नागरी बँकांत थोडा निवांतपणा आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत मात्र सहामाही नफा जाहीर करावा लागत असल्याने त्यांची धडपड थकबाकी कमी करण्यावर आहे. या बँकांच्या नफ्यावर बँकांचे शेअर मार्केट अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक बँक आपल्या बँकेचा नफा कसा जास्त होईल, याकडे लक्ष देते.दरम्यान, नोटिसी पाठवूनही कर्जदार थकीत कर्ज वेळेत भरत नसल्याने बँकांच्या थकीत कर्जदाराच्या खात्याचे वाटप अधिकाऱ्यांना करण्याचा निर्णय यंदापासून घेतला आहे. सध्या मॅनेजर आणि अधिकारी यांना थकबाकी कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. इतर कर्मचाऱ्यांनीही थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला थकीत कर्जाची किती खाती दिली आणि त्या खात्यातून किती थकबाकी वसूल झाली, याचा रिपोर्ट दर महिन्याला पाठवावा लागत असल्याने अधिकारी रस्त्यावर दिसत आहेत.बँका चांगल्या कर्जदारांच्या शोधातथकीत कर्जे दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे बँका सध्या चांगल्या कर्जदारांच्या शोधात आहेत. ज्यांचे उत्पन्न चांगले आहे, कागदपत्रे चांगली आहेत, स्थावर संपत्ती चांगली आहे, अशा कर्जदाराला बँका चटकन कर्ज देतात; परंतु सध्या असे कर्जदार कमी येत असल्याने बँका चांगल्या कर्जदारांचा शोध घेत असतात.नागरी बँकांची थकबाकी कमीकाही वर्षांपूर्वी नागरी बँकाची थकबाकी जास्त असायची. त्यावेळी राष्ट्रीयकृत बॅकांची थकबाकी अगदी किरकोळ दोन किंवा तीन टक्के इतकीच असायची. आता उलटी परिस्थिती झाली आहे. आता अनेक नागरी बँकाची थकबाकी शुन्य टक्के आहे. मात्र, त्यावेळी राष्ट्रीयकृत बँकांची थकबाकी वाढताना दिसत आहे.