शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

हॉटेलमधील सांडपाणी प्रक्रियेविना बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST

कळंबा : हॉटेल्स, मंगल कार्यालये, उपहारगृहे, जंकफूडच्या गाड्यांतून बाहेर फेकले जाणारे सांडपाणी पूर्णपणे प्रक्रिया केल्याखेरीज बाहेर टाकू नका, असे ...

कळंबा : हॉटेल्स, मंगल कार्यालये, उपहारगृहे, जंकफूडच्या गाड्यांतून बाहेर फेकले जाणारे सांडपाणी पूर्णपणे प्रक्रिया केल्याखेरीज बाहेर टाकू नका, असे स्पष्ट निर्देश हरित लवादाने देऊनही संबंधित घटक हेच नियम पायदळी तुडवित सांडपाणी थेट नाले, रस्त्यांवर टाकत असल्याने रंकाळा आणि कळंबा तलावाची अपरिमित हानी होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेनेचे हरित लवादाच्या या निर्देशांकडे कानाडोळा केल्याने हॉटेल्स, मंगल कार्यालये बिनदक्कतपणे सांडपाणी नाल्यांमध्ये सोडत असल्याचे चित्र आहे. उपनगरे आणि लगतच्या ग्रामीण भागात हॉटेल्स आणि ढाबा संस्कृतीने चांगलाच जोर धरला आहे. याशिवाय चौकाचौकात रस्त्याकडेस उभ्या जंकफूडच्या गाड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हॉटेल, लॉज, उपाहारगृहे या ठिकाणी स्वयंपाकगृहे, धुणीभांडी यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. मात्र, यावर प्रक्रिया न करताच ते पाणी कोठेही, कसेही सोडले जाते. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. हे सांडपाणी उपनगरातील नैसर्गिक नाल्यांमधून थेट रंकाळा, कळंबा तलावात पोहचत आहे. त्यामुळे या दोन्ही तलावांत प्रदूषण वाढत असल्याचे चित्र आहे.

चौकट : हॉटेल, उपाहारगृहे, लॉज याठिकाणी पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी पुनर्प्रक्रिया करणारी यंत्रणा बसवावी लागते. रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे लागते. संबंधित प्रशासनाने दर तीन महिन्यांनी तपासणी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. परंतु याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याचे प्रदूषणात भर पडत आहे.