शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील सांडपाणी प्रक्रियेविना बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST

कळंबा : हॉटेल्स, मंगल कार्यालये, उपहारगृहे, जंकफूडच्या गाड्यांतून बाहेर फेकले जाणारे सांडपाणी पूर्णपणे प्रक्रिया केल्याखेरीज बाहेर टाकू नका, असे ...

कळंबा : हॉटेल्स, मंगल कार्यालये, उपहारगृहे, जंकफूडच्या गाड्यांतून बाहेर फेकले जाणारे सांडपाणी पूर्णपणे प्रक्रिया केल्याखेरीज बाहेर टाकू नका, असे स्पष्ट निर्देश हरित लवादाने देऊनही संबंधित घटक हेच नियम पायदळी तुडवित सांडपाणी थेट नाले, रस्त्यांवर टाकत असल्याने रंकाळा आणि कळंबा तलावाची अपरिमित हानी होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेनेचे हरित लवादाच्या या निर्देशांकडे कानाडोळा केल्याने हॉटेल्स, मंगल कार्यालये बिनदक्कतपणे सांडपाणी नाल्यांमध्ये सोडत असल्याचे चित्र आहे. उपनगरे आणि लगतच्या ग्रामीण भागात हॉटेल्स आणि ढाबा संस्कृतीने चांगलाच जोर धरला आहे. याशिवाय चौकाचौकात रस्त्याकडेस उभ्या जंकफूडच्या गाड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हॉटेल, लॉज, उपाहारगृहे या ठिकाणी स्वयंपाकगृहे, धुणीभांडी यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. मात्र, यावर प्रक्रिया न करताच ते पाणी कोठेही, कसेही सोडले जाते. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. हे सांडपाणी उपनगरातील नैसर्गिक नाल्यांमधून थेट रंकाळा, कळंबा तलावात पोहचत आहे. त्यामुळे या दोन्ही तलावांत प्रदूषण वाढत असल्याचे चित्र आहे.

चौकट : हॉटेल, उपाहारगृहे, लॉज याठिकाणी पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी पुनर्प्रक्रिया करणारी यंत्रणा बसवावी लागते. रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे लागते. संबंधित प्रशासनाने दर तीन महिन्यांनी तपासणी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. परंतु याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याचे प्रदूषणात भर पडत आहे.