शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

रसायनयुक्त सांडपाणीप्रश्नी शेतकऱ्यांचा उद्रेक

By admin | Updated: August 29, 2014 23:41 IST

जयसिंगपुरात अकिवाटे औद्योगिक कार्यालयावर दगडफेक करून ठोकले टाळे : सांडपाणी प्रक्रिया, पाणी उपसा करणाऱ्या मोटारींची नासधूस

जयसिंगपूर : येथील ल. क अकिवाटे औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात आलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे आज, शुक्रवारी दोनशेहून अधिक संतप्त शेतकऱ्यांकडून उद्रेक झाला. अकिवाटे संस्थेच्या कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड करीत टाळे ठोकण्यात आले. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची नासधूस करून कृष्णानदीवर पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारींचे नुकसान करण्यात आले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, येत्या चार दिवसांत रसायनयुक्त पाणी सोडणे बंद न झाल्यास औद्योगिक वसाहतीचा विद्युत पुरवठा तोडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.गेल्या दोन महिन्यांपासून ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्यामुळे वसाहतीच्या पूर्व भागात असणाऱ्या शेती पिकाला मोठा फ टका बसला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून शेतात बियांणाची पेरणी केली आहे. बियाणाची उगवण झालेली असतानाच रसायनयुक्त दूषित पाणी पिकात साचून राहिल्याने संपूर्ण पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, भुईमूग, पालेभाज्या, आदी पिकांना फटका बसला आहे. याप्रश्नी महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी शिरोळ तहसील कार्यालयाकडे तक्रारी दिल्यानंतर तलाठ्यांनी पंचनामाही केला होता. मात्र, त्यानंतरही दूषित पाणी सोडले जात होते. आठ दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी सांडपाणी सोडणारी पाईप उद्ध्वस्त केली होती. गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाणी वसाहतीतून शेतात सोडण्यात आल्यामुळे अक्षरश: शेतीपिकात रसायनयुक्त पाण्याची तळी साचल्यामुळे आज सकाळी दहाच्या सुमारास सुमारे दोनशेहून अधिक शेतकरी अकिवाटे औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून येथे येण्यास सांगितले. मात्र, त्यांनी येण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयावर हल्ला चढविला. दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी सी.ई.टी.पी. (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्पाकडे चाल करून या ठिकाणी असणारे मोटारी, पाईपांची नासधूस केली. उदगाव हद्दीत विहिरीवर असलेल्या मोटारी विहिरीत ढकलून दिल्या. त्यानंतर उदगाव येथे कृष्णा नदीवर वसाहतीकरिता पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारीच्या फ्युजा काढल्या. दोन तास आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी कारखानदारांना वीजपुरवठा तोडण्याचा इशारा दिला. आंदोलनानंतरही दिवसभर रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात शेतात जात होते. (प्रतिनिधी)