शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रसायनयुक्त सांडपाणीप्रश्नी शेतकऱ्यांचा उद्रेक

By admin | Updated: August 29, 2014 23:41 IST

जयसिंगपुरात अकिवाटे औद्योगिक कार्यालयावर दगडफेक करून ठोकले टाळे : सांडपाणी प्रक्रिया, पाणी उपसा करणाऱ्या मोटारींची नासधूस

जयसिंगपूर : येथील ल. क अकिवाटे औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात आलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे आज, शुक्रवारी दोनशेहून अधिक संतप्त शेतकऱ्यांकडून उद्रेक झाला. अकिवाटे संस्थेच्या कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड करीत टाळे ठोकण्यात आले. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची नासधूस करून कृष्णानदीवर पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारींचे नुकसान करण्यात आले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, येत्या चार दिवसांत रसायनयुक्त पाणी सोडणे बंद न झाल्यास औद्योगिक वसाहतीचा विद्युत पुरवठा तोडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.गेल्या दोन महिन्यांपासून ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्यामुळे वसाहतीच्या पूर्व भागात असणाऱ्या शेती पिकाला मोठा फ टका बसला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून शेतात बियांणाची पेरणी केली आहे. बियाणाची उगवण झालेली असतानाच रसायनयुक्त दूषित पाणी पिकात साचून राहिल्याने संपूर्ण पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, भुईमूग, पालेभाज्या, आदी पिकांना फटका बसला आहे. याप्रश्नी महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी शिरोळ तहसील कार्यालयाकडे तक्रारी दिल्यानंतर तलाठ्यांनी पंचनामाही केला होता. मात्र, त्यानंतरही दूषित पाणी सोडले जात होते. आठ दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी सांडपाणी सोडणारी पाईप उद्ध्वस्त केली होती. गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाणी वसाहतीतून शेतात सोडण्यात आल्यामुळे अक्षरश: शेतीपिकात रसायनयुक्त पाण्याची तळी साचल्यामुळे आज सकाळी दहाच्या सुमारास सुमारे दोनशेहून अधिक शेतकरी अकिवाटे औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून येथे येण्यास सांगितले. मात्र, त्यांनी येण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयावर हल्ला चढविला. दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी सी.ई.टी.पी. (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्पाकडे चाल करून या ठिकाणी असणारे मोटारी, पाईपांची नासधूस केली. उदगाव हद्दीत विहिरीवर असलेल्या मोटारी विहिरीत ढकलून दिल्या. त्यानंतर उदगाव येथे कृष्णा नदीवर वसाहतीकरिता पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारीच्या फ्युजा काढल्या. दोन तास आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी कारखानदारांना वीजपुरवठा तोडण्याचा इशारा दिला. आंदोलनानंतरही दिवसभर रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात शेतात जात होते. (प्रतिनिधी)