शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

रसायनयुक्त सांडपाणीप्रश्नी शेतकऱ्यांचा उद्रेक

By admin | Updated: August 29, 2014 23:41 IST

जयसिंगपुरात अकिवाटे औद्योगिक कार्यालयावर दगडफेक करून ठोकले टाळे : सांडपाणी प्रक्रिया, पाणी उपसा करणाऱ्या मोटारींची नासधूस

जयसिंगपूर : येथील ल. क अकिवाटे औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात आलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे आज, शुक्रवारी दोनशेहून अधिक संतप्त शेतकऱ्यांकडून उद्रेक झाला. अकिवाटे संस्थेच्या कार्यालयावर दगडफेक करून तोडफोड करीत टाळे ठोकण्यात आले. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची नासधूस करून कृष्णानदीवर पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारींचे नुकसान करण्यात आले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, येत्या चार दिवसांत रसायनयुक्त पाणी सोडणे बंद न झाल्यास औद्योगिक वसाहतीचा विद्युत पुरवठा तोडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.गेल्या दोन महिन्यांपासून ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्यामुळे वसाहतीच्या पूर्व भागात असणाऱ्या शेती पिकाला मोठा फ टका बसला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून शेतात बियांणाची पेरणी केली आहे. बियाणाची उगवण झालेली असतानाच रसायनयुक्त दूषित पाणी पिकात साचून राहिल्याने संपूर्ण पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, भुईमूग, पालेभाज्या, आदी पिकांना फटका बसला आहे. याप्रश्नी महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी शिरोळ तहसील कार्यालयाकडे तक्रारी दिल्यानंतर तलाठ्यांनी पंचनामाही केला होता. मात्र, त्यानंतरही दूषित पाणी सोडले जात होते. आठ दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी सांडपाणी सोडणारी पाईप उद्ध्वस्त केली होती. गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाणी वसाहतीतून शेतात सोडण्यात आल्यामुळे अक्षरश: शेतीपिकात रसायनयुक्त पाण्याची तळी साचल्यामुळे आज सकाळी दहाच्या सुमारास सुमारे दोनशेहून अधिक शेतकरी अकिवाटे औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून येथे येण्यास सांगितले. मात्र, त्यांनी येण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयावर हल्ला चढविला. दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी सी.ई.टी.पी. (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्पाकडे चाल करून या ठिकाणी असणारे मोटारी, पाईपांची नासधूस केली. उदगाव हद्दीत विहिरीवर असलेल्या मोटारी विहिरीत ढकलून दिल्या. त्यानंतर उदगाव येथे कृष्णा नदीवर वसाहतीकरिता पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारीच्या फ्युजा काढल्या. दोन तास आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी कारखानदारांना वीजपुरवठा तोडण्याचा इशारा दिला. आंदोलनानंतरही दिवसभर रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात शेतात जात होते. (प्रतिनिधी)