शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

...अन्यथा राज्याला निधी मिळणार नाही:अमन मित्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:32 IST

कोल्हापूर : भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्टÑाला निधी उपलब्ध होत आहे; परंतु भूजल संदर्भातील अधिनियमाची अंमलबजावणी झाली नाही तर इथून पुढे राज्याला केंद्र सरकारकडून कोणताही निधी मिळणार नाही, असे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी येथे सांगितले. तर महाराष्ट्र भूजल अधिनियम सर्वसामान्य जनतेच्या अभिप्रायासाठी खुला ठेवला ...

कोल्हापूर : भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्टÑाला निधी उपलब्ध होत आहे; परंतु भूजल संदर्भातील अधिनियमाची अंमलबजावणी झाली नाही तर इथून पुढे राज्याला केंद्र सरकारकडून कोणताही निधी मिळणार नाही, असे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी येथे सांगितले. तर महाराष्ट्र भूजल अधिनियम सर्वसामान्य जनतेच्या अभिप्रायासाठी खुला ठेवला असून, मसुद्यातील तरतुदींबाबत हरकती किंवा सूचना असल्यास शुक्रवार (दि. ३१)पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.महाराष्ट्र भूजल अधिनियमाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी जिल्हाधिकारी सुभेदार बोलत होते. यावेळी अमन मित्तल, भूजल सर्वेक्षण ग्रामविकास यंत्रणेचे उपसंचालक मिलिंद देशपांडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, भूवैज्ञानिक संतोष गोंधळी, आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, या अधिनियमाद्वारे पाणी वापरकर्त्यांना शाश्वत, समन्यायी, पुरेसा योग्य गुणवत्तेच्या भूजलाचा पुरवठा करणे सुकर होईल. तसेच भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास, पाणीबचत होण्यास मदत होईल. हा अधिनियम गावकऱ्यांच्या सहकार्यातून राबविला जाणार आहे. याबाबत काही हरकती, सूचना असल्यास पाणी पुरवठा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे द्याव्यात.अमन मित्तल म्हणाले, पाणी पातळी कमी झाल्यानंतर पुढील १०० वर्षांत याचा फटका बसणार आहे. यामुळे जिल्ह्याचे नव्हे, तर देशाचेही नुकसान होणार आहे.वरिष्ठ भूवैज्ञानिक गोसकी यांनी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम, २०१८ मधील प्रमुख तरतुदींची माहिती सविस्तरपणे दिली. या तरतुदीनुसार प्रत्येक विहीर मालकास आपल्या विहिरीची नोंदणी उपजिल्हाधिकाºयांकडे १८० दिवसांत करणे बंधनकारक आहे.दरम्यान, ‘भूजलाची गाथा’ या लघुचित्रपटाद्वारे अधिनियमासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील संस्था, नागरिकांनी सूचना व अभिप्राय नोंदविले.६० मीटर विहीर खोदण्यास परवानगीराज्यात सर्वसाधारणपणे ६० मीटर (२०० फूट) खोलीची विहीर खोदण्यास परवानगी दिली जाईल. त्यापेक्षा जास्त खोलीची विहीर ही केवळ पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यास परवानगी देता येईल. अशी परवानगी देण्याचा अधिकार राज्य भूजल प्राधिकरणास असेल, असे गोसकी यांनी सांगितले.शेती, औद्योगिक वापरासाठी भरावा लागणार ‘कर’अस्तित्वातील खोल विहिरींमधून शेती किंवा औद्योगिक वापरासाठी भूजलाचा उपसा करण्यावर महसूल विभागामार्फत कर बसविण्यात येईल, असे गोसकी यांनी सांगितले....तर बांधकाम मान्यता नाही१०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम असेल, तर अशा बांधकामावर पाऊस पाणी साठवण संरचना (रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर) बांधणे अनिवार्य असून, त्याशिवाय अशा बांधकामास मान्यता दिली जाणार नाही. तसेच जास्त पाणी लागणाºया पिकांच्या लागवडीसाठी पिकाच्या पेरणीपूर्वी पाणलोट क्षेत्र जलसंपत्ती समितीकडे अर्ज करावा लागेल, असे गोसकी यांनी सागिंतले.