शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

...अन्यथा राज्याला निधी मिळणार नाही:अमन मित्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:32 IST

कोल्हापूर : भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्टÑाला निधी उपलब्ध होत आहे; परंतु भूजल संदर्भातील अधिनियमाची अंमलबजावणी झाली नाही तर इथून पुढे राज्याला केंद्र सरकारकडून कोणताही निधी मिळणार नाही, असे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी येथे सांगितले. तर महाराष्ट्र भूजल अधिनियम सर्वसामान्य जनतेच्या अभिप्रायासाठी खुला ठेवला ...

कोल्हापूर : भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्टÑाला निधी उपलब्ध होत आहे; परंतु भूजल संदर्भातील अधिनियमाची अंमलबजावणी झाली नाही तर इथून पुढे राज्याला केंद्र सरकारकडून कोणताही निधी मिळणार नाही, असे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी येथे सांगितले. तर महाराष्ट्र भूजल अधिनियम सर्वसामान्य जनतेच्या अभिप्रायासाठी खुला ठेवला असून, मसुद्यातील तरतुदींबाबत हरकती किंवा सूचना असल्यास शुक्रवार (दि. ३१)पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.महाराष्ट्र भूजल अधिनियमाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी जिल्हाधिकारी सुभेदार बोलत होते. यावेळी अमन मित्तल, भूजल सर्वेक्षण ग्रामविकास यंत्रणेचे उपसंचालक मिलिंद देशपांडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, भूवैज्ञानिक संतोष गोंधळी, आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, या अधिनियमाद्वारे पाणी वापरकर्त्यांना शाश्वत, समन्यायी, पुरेसा योग्य गुणवत्तेच्या भूजलाचा पुरवठा करणे सुकर होईल. तसेच भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास, पाणीबचत होण्यास मदत होईल. हा अधिनियम गावकऱ्यांच्या सहकार्यातून राबविला जाणार आहे. याबाबत काही हरकती, सूचना असल्यास पाणी पुरवठा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे द्याव्यात.अमन मित्तल म्हणाले, पाणी पातळी कमी झाल्यानंतर पुढील १०० वर्षांत याचा फटका बसणार आहे. यामुळे जिल्ह्याचे नव्हे, तर देशाचेही नुकसान होणार आहे.वरिष्ठ भूवैज्ञानिक गोसकी यांनी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम, २०१८ मधील प्रमुख तरतुदींची माहिती सविस्तरपणे दिली. या तरतुदीनुसार प्रत्येक विहीर मालकास आपल्या विहिरीची नोंदणी उपजिल्हाधिकाºयांकडे १८० दिवसांत करणे बंधनकारक आहे.दरम्यान, ‘भूजलाची गाथा’ या लघुचित्रपटाद्वारे अधिनियमासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील संस्था, नागरिकांनी सूचना व अभिप्राय नोंदविले.६० मीटर विहीर खोदण्यास परवानगीराज्यात सर्वसाधारणपणे ६० मीटर (२०० फूट) खोलीची विहीर खोदण्यास परवानगी दिली जाईल. त्यापेक्षा जास्त खोलीची विहीर ही केवळ पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यास परवानगी देता येईल. अशी परवानगी देण्याचा अधिकार राज्य भूजल प्राधिकरणास असेल, असे गोसकी यांनी सांगितले.शेती, औद्योगिक वापरासाठी भरावा लागणार ‘कर’अस्तित्वातील खोल विहिरींमधून शेती किंवा औद्योगिक वापरासाठी भूजलाचा उपसा करण्यावर महसूल विभागामार्फत कर बसविण्यात येईल, असे गोसकी यांनी सांगितले....तर बांधकाम मान्यता नाही१०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम असेल, तर अशा बांधकामावर पाऊस पाणी साठवण संरचना (रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर) बांधणे अनिवार्य असून, त्याशिवाय अशा बांधकामास मान्यता दिली जाणार नाही. तसेच जास्त पाणी लागणाºया पिकांच्या लागवडीसाठी पिकाच्या पेरणीपूर्वी पाणलोट क्षेत्र जलसंपत्ती समितीकडे अर्ज करावा लागेल, असे गोसकी यांनी सागिंतले.