शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा धुराडी पेटू देणार नाही

By admin | Updated: April 16, 2017 23:32 IST

राजू शेट्टी : आष्ट्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा

आष्टा : महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे. उसाला दुसरा हप्ता पाचशे रुपये द्या, अन्यथा आॅक्टोबरमध्ये कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आष्टा (ता. वाळवा) येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याप्रसंगी शेट्टी बोलत होते. सरकारने विचार न केल्यास प्रसंगी मुंबईत धडक देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, संजय बेले, भागवत जाधव, महावीर पाटील, भास्कर कदम, महेश खराडे, जयवंत पाटील, संदीप राजोबा, जयकुमार कोले, आष्टा शहर अध्यक्ष सुरेश आवटी, अरुण कवठेकर, राहुल थोटे, सुदर्शन वाडकर, प्रतीक हालुंडे, अमोल चौगुले, विजय चौगुले, बंडू मंजुगुडे व कार्यकर्ते उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, एक वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून शेतकरी परिषद, मेळावे घेतले, जनजागृती केली. त्यावेळी साडेसहा ते सात लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीसाठी अर्ज घेतले. पूर्वीच्या तुलनेने सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडत आहेत, मात्र याबाबत सरकारला कोणतीही फिकीर नाही, असे दिसून येत आहे. सर्वच पातळीवर आज शेतकरी सरकारच्या अनास्थेचा बळी ठरत आहे. ढगफुटी, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी या सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र याकडे सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. निसर्गाशी दोनहात करता-करता घेतलेले जे पीक विक्रीसाठी बाजारात नेले जाते, तेथेही शेतकरी फसवला जात आहे. १९८२ मध्ये, १९८९ मध्ये व २००८ मध्ये कर्जमाफी झाली, त्याचा गाजावाजा केला जातो. मात्र देशातील कॉर्पोरेट कंपनीची २७ हजार कोटीची संशयित बुडित कर्जे आहेत. त्यातील केवळ दहा लोकांची थकित कर्जाची रक्कम ५८ हजार कोटीवर आहे. आम्ही फक्त राज्याचे ३० हजार कोटी कर्जमाफीची मागणी करीत आहोत.शेतकरी व मोठ्या कर्जदारांना वेगळा न्याय का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. मायक्रो फायनान्स कंपन्या गोरगरीब महिलांना ४२ टक्के व्याज दराने कर्ज देऊन पठाणी वसुली करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले. खा. शेट्टी म्हणाले, देशाची गरज पूर्ण होईल एवढे साखर उत्पादन यावर्षी झाले आहे. पुढीलवर्षी हीच परिस्थिती राहणार आहे. एकीकडे गुजरातसारख्या राज्यामध्ये १२.१८ टक्के रिकव्हरीला ४,४०० रुपये प्रतिटन दर मिळत आहे, मग येथे का नाही? सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आज शेतकरी देशोधडीला लागत आहे.शेतकऱ्याचा सात-बारा कोरा झाला पाहिजे व उसाला दुसरा हप्ता ५०० पेक्षा अधिक मिळाला पाहिजे. ४ मे रोजी कोल्हापूर येथील शेतकरी मेळाव्यास लाखो शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून ताकद दाखवून द्यावी. सरकारच्या उरात धडकी भरवणाऱ्या मोर्चानंतर प्रसंगी मुंबईत धडक देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)सदाभाऊ गैरहजरखा. राजू शेट्टी म्हणाले, येत्या १ मे महाराष्ट्रदिनी ग्रामसभेत सात-बारा कोरा झाला पाहिजे व उसाला दुसरा हप्ता ५०० मिळाला पाहिजे, असा ठराव करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी, मंत्री सदाभाऊ खोत शासकीय कामामुळे येऊ शकले नाहीत, असे सांगितले, मात्र या कार्यक्रमप्रसंगी, ठिकाणी खोत का आले नाहीत, याचीच चर्चा होती.