शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:13 IST

कोल्हापूर : कागल विधानसभा क्षेत्रातील नागनवाडी, आंबेओहोळ प्रकल्पाच्या भूमी संपादनाचे पॅकेज मंजूर झालेले नाही. दूधगंगा डावा कालवा ३२ ते ...

कोल्हापूर : कागल विधानसभा क्षेत्रातील नागनवाडी, आंबेओहोळ प्रकल्पाच्या भूमी संपादनाचे पॅकेज मंजूर झालेले नाही. दूधगंगा डावा कालवा ३२ ते ७६ किलोमीटर या कामाच्या देयकांची चौकशी व्हावी; बेलेवाडी मासा, तमनाकवाडा, माद्याळ येथील साठवण तलावामध्ये जाणाऱ्या जमिनीला जास्त मोबदला द्यावा, या मागणीसाठी सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. ही कामे लवकर पूर्ण न झाल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा मंगळवारी आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे, नागनवाडी प्रकल्प रखडलेला आहे. प्रकल्प प्रलंबित राहण्याचे कारण प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या जमिनीबाबत या प्रकल्पाला ८७ हेक्टर जमिनीची गरज असून, ३५ हेक्टर जमीन संपादित झालेली आहे. परंतु काही शेतकरी उच्च न्यायालयात गेल्यामुळे जमिनीचे वाटप झालेले नाही. लाभक्षेत्रामध्ये जमीन मिळणे कठीण झाल्याने ‘जलसंपदा’च्या नियामक मंडळाने हेक्टरी २७ लाखांचे पॅकेज प्रकल्पग्रस्तांना देण्यास मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव महसूल व पुनर्वसन मंत्र्यांकडे गेली तीन वर्षे पडून आहे. आंबेओहोळ प्रकल्पही रखडला आहे. प्रकल्पग्रस्तांना ४३५ हेक्टर जमीन देय आहे. त्यापैकी १७५ हेक्टर जमीन संपादित केलेली आहे. त्यापैकी ८५ हे. जमिनीचे वाटप केलेले आहे. उर्वरित २४ हेक्टरच्या जमिनीबाबत शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती आणलेली आहे.बेलेवाडीमासा, तमनाकवाडा व माद्याळ या गावांतील साठवण तलाव मंजूर असून, कामे सुरू झालेली आहेत; परंतु या तलावामध्ये ज्यांची जमीन गेलेली आहे, त्यांना मोबदला तत्काळ मिळावा. पालकमंत्र्यांनी पॅकेजला मान्यता द्यावी. शिष्टमंडळात जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, गणपतराव फराकटे, आदींचा समावेश होता.कालव्याच्या कामाची चौकशी व्हावीदूधगंगा डावा कालवा १८ वर्षे प्रलंबित आहे. जमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मार्च २०१९ पर्यंत अधिकाºयांनी कालव्यामधील पाणी कागलच्या जयसिंग तलावात सोडण्याचे अभिवचन दिले होते; परंतु ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करावे; तसेच या कामाची व दिलेल्या देयकांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली.