शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:13 IST

कोल्हापूर : कागल विधानसभा क्षेत्रातील नागनवाडी, आंबेओहोळ प्रकल्पाच्या भूमी संपादनाचे पॅकेज मंजूर झालेले नाही. दूधगंगा डावा कालवा ३२ ते ...

कोल्हापूर : कागल विधानसभा क्षेत्रातील नागनवाडी, आंबेओहोळ प्रकल्पाच्या भूमी संपादनाचे पॅकेज मंजूर झालेले नाही. दूधगंगा डावा कालवा ३२ ते ७६ किलोमीटर या कामाच्या देयकांची चौकशी व्हावी; बेलेवाडी मासा, तमनाकवाडा, माद्याळ येथील साठवण तलावामध्ये जाणाऱ्या जमिनीला जास्त मोबदला द्यावा, या मागणीसाठी सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. ही कामे लवकर पूर्ण न झाल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा मंगळवारी आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे, नागनवाडी प्रकल्प रखडलेला आहे. प्रकल्प प्रलंबित राहण्याचे कारण प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या जमिनीबाबत या प्रकल्पाला ८७ हेक्टर जमिनीची गरज असून, ३५ हेक्टर जमीन संपादित झालेली आहे. परंतु काही शेतकरी उच्च न्यायालयात गेल्यामुळे जमिनीचे वाटप झालेले नाही. लाभक्षेत्रामध्ये जमीन मिळणे कठीण झाल्याने ‘जलसंपदा’च्या नियामक मंडळाने हेक्टरी २७ लाखांचे पॅकेज प्रकल्पग्रस्तांना देण्यास मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव महसूल व पुनर्वसन मंत्र्यांकडे गेली तीन वर्षे पडून आहे. आंबेओहोळ प्रकल्पही रखडला आहे. प्रकल्पग्रस्तांना ४३५ हेक्टर जमीन देय आहे. त्यापैकी १७५ हेक्टर जमीन संपादित केलेली आहे. त्यापैकी ८५ हे. जमिनीचे वाटप केलेले आहे. उर्वरित २४ हेक्टरच्या जमिनीबाबत शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती आणलेली आहे.बेलेवाडीमासा, तमनाकवाडा व माद्याळ या गावांतील साठवण तलाव मंजूर असून, कामे सुरू झालेली आहेत; परंतु या तलावामध्ये ज्यांची जमीन गेलेली आहे, त्यांना मोबदला तत्काळ मिळावा. पालकमंत्र्यांनी पॅकेजला मान्यता द्यावी. शिष्टमंडळात जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, गणपतराव फराकटे, आदींचा समावेश होता.कालव्याच्या कामाची चौकशी व्हावीदूधगंगा डावा कालवा १८ वर्षे प्रलंबित आहे. जमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मार्च २०१९ पर्यंत अधिकाºयांनी कालव्यामधील पाणी कागलच्या जयसिंग तलावात सोडण्याचे अभिवचन दिले होते; परंतु ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करावे; तसेच या कामाची व दिलेल्या देयकांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली.