शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

...अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही

By admin | Updated: August 6, 2015 23:56 IST

रघुनाथदादा पाटील : उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याची मागणी

कोल्हापूर : साखरेवर आधारित दर देण्याचा प्रकार शेतकरी विरोधातील षङ्यंत्र आहे. उत्पादन खर्चावर आधारित दर मिळालाच पाहिजे. या पद्धतीने दर मिळाला नाही, तर आगामी हंगामात साखर कारखाने सुरू करू न देण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेद्वारे दिला.रघुनाथदादा पाटील म्हणाले, केंद्र सरकारने जे ऊस दराबाबतचे पॅकेज जाहीर केले. याबाबत शेतकरी, संघटना समाधानी नाही. अजून दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले पाहिजे. शिवाय ‘एफआरपी’देखील चुकीचा काढला असून, तो दुरुस्त व्हायला हवा. ‘एसएमपी’ ऐवजी ‘एफआरपी’वर देण्याचा घाट शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. ‘एफआरपी’मध्ये दर देण्याचे फारसे बंधन राहिलेले नाही. शिवाय यातून उपपदार्थांवरील ५० टक्के नफा शेतकऱ्यांना देण्याची अट शिथील झाली आहे. एफआरपीमधून ही अट काढून टाकताना महाराष्ट्रातील नेते, खासदार चिडीचूप बसले. त्यांनी याद्वारे संगनमताने शेतकऱ्यांना लुटले आहे. ही अट शिथील झाल्याने ते शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. मात्र, उलट खासगी कारखान्यांचे पेव वाढले आहे. शेतकरी हितासाठी ३५०० रुपये एफआरपी दिला पाहिजे. उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. या पद्धतीने दर मिळाला नाही, तर आगामी हंगामात कारखाने सुरू करू देणार नाही. उसाच्या माध्यमातून सरकारला २५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कराच्या माध्यमातून मिळते. पत्रकार परिषदेस पी. जी. पाटील, अजित पाटील, आदी उपस्थित होते. मूठभर लोकांसाठी सरकारने गुडघे टेकलेपोर्नसाईटवरील बंदी आवश्यक असताना सरकारने ती का उठविली, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आजच्या पिढीला लागणारे वाईट वळण टाळण्यासाठी पोर्नसाईटवरील बंदी महत्त्वाची होती. मात्र, काही मूठभर लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलेल्या दबावापुढे सरकारने बंदी उठवून गुडघे टेकले. अशा साईटवर सरकारने बंदी ठेवावी.