शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

...अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही

By admin | Updated: August 6, 2015 23:56 IST

रघुनाथदादा पाटील : उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याची मागणी

कोल्हापूर : साखरेवर आधारित दर देण्याचा प्रकार शेतकरी विरोधातील षङ्यंत्र आहे. उत्पादन खर्चावर आधारित दर मिळालाच पाहिजे. या पद्धतीने दर मिळाला नाही, तर आगामी हंगामात साखर कारखाने सुरू करू न देण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेद्वारे दिला.रघुनाथदादा पाटील म्हणाले, केंद्र सरकारने जे ऊस दराबाबतचे पॅकेज जाहीर केले. याबाबत शेतकरी, संघटना समाधानी नाही. अजून दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले पाहिजे. शिवाय ‘एफआरपी’देखील चुकीचा काढला असून, तो दुरुस्त व्हायला हवा. ‘एसएमपी’ ऐवजी ‘एफआरपी’वर देण्याचा घाट शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. ‘एफआरपी’मध्ये दर देण्याचे फारसे बंधन राहिलेले नाही. शिवाय यातून उपपदार्थांवरील ५० टक्के नफा शेतकऱ्यांना देण्याची अट शिथील झाली आहे. एफआरपीमधून ही अट काढून टाकताना महाराष्ट्रातील नेते, खासदार चिडीचूप बसले. त्यांनी याद्वारे संगनमताने शेतकऱ्यांना लुटले आहे. ही अट शिथील झाल्याने ते शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. मात्र, उलट खासगी कारखान्यांचे पेव वाढले आहे. शेतकरी हितासाठी ३५०० रुपये एफआरपी दिला पाहिजे. उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. या पद्धतीने दर मिळाला नाही, तर आगामी हंगामात कारखाने सुरू करू देणार नाही. उसाच्या माध्यमातून सरकारला २५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कराच्या माध्यमातून मिळते. पत्रकार परिषदेस पी. जी. पाटील, अजित पाटील, आदी उपस्थित होते. मूठभर लोकांसाठी सरकारने गुडघे टेकलेपोर्नसाईटवरील बंदी आवश्यक असताना सरकारने ती का उठविली, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आजच्या पिढीला लागणारे वाईट वळण टाळण्यासाठी पोर्नसाईटवरील बंदी महत्त्वाची होती. मात्र, काही मूठभर लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलेल्या दबावापुढे सरकारने बंदी उठवून गुडघे टेकले. अशा साईटवर सरकारने बंदी ठेवावी.