शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही

By admin | Updated: August 6, 2015 23:56 IST

रघुनाथदादा पाटील : उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याची मागणी

कोल्हापूर : साखरेवर आधारित दर देण्याचा प्रकार शेतकरी विरोधातील षङ्यंत्र आहे. उत्पादन खर्चावर आधारित दर मिळालाच पाहिजे. या पद्धतीने दर मिळाला नाही, तर आगामी हंगामात साखर कारखाने सुरू करू न देण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेद्वारे दिला.रघुनाथदादा पाटील म्हणाले, केंद्र सरकारने जे ऊस दराबाबतचे पॅकेज जाहीर केले. याबाबत शेतकरी, संघटना समाधानी नाही. अजून दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले पाहिजे. शिवाय ‘एफआरपी’देखील चुकीचा काढला असून, तो दुरुस्त व्हायला हवा. ‘एसएमपी’ ऐवजी ‘एफआरपी’वर देण्याचा घाट शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. ‘एफआरपी’मध्ये दर देण्याचे फारसे बंधन राहिलेले नाही. शिवाय यातून उपपदार्थांवरील ५० टक्के नफा शेतकऱ्यांना देण्याची अट शिथील झाली आहे. एफआरपीमधून ही अट काढून टाकताना महाराष्ट्रातील नेते, खासदार चिडीचूप बसले. त्यांनी याद्वारे संगनमताने शेतकऱ्यांना लुटले आहे. ही अट शिथील झाल्याने ते शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. मात्र, उलट खासगी कारखान्यांचे पेव वाढले आहे. शेतकरी हितासाठी ३५०० रुपये एफआरपी दिला पाहिजे. उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. या पद्धतीने दर मिळाला नाही, तर आगामी हंगामात कारखाने सुरू करू देणार नाही. उसाच्या माध्यमातून सरकारला २५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कराच्या माध्यमातून मिळते. पत्रकार परिषदेस पी. जी. पाटील, अजित पाटील, आदी उपस्थित होते. मूठभर लोकांसाठी सरकारने गुडघे टेकलेपोर्नसाईटवरील बंदी आवश्यक असताना सरकारने ती का उठविली, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आजच्या पिढीला लागणारे वाईट वळण टाळण्यासाठी पोर्नसाईटवरील बंदी महत्त्वाची होती. मात्र, काही मूठभर लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलेल्या दबावापुढे सरकारने बंदी उठवून गुडघे टेकले. अशा साईटवर सरकारने बंदी ठेवावी.