शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा कर्नाटकच्या बसगाड्या जिल्ह्याच्या हद्दीत घेऊ नका ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:30 IST

गडहिंग्लज : निपाणीमार्गे गडहिंग्लज-कोल्हापूर महाराष्ट्राच्या बसफेऱ्यांना कर्नाटकने बंदी घातली आहे. त्या पूर्ववत सुरू करण्यास बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती न दिल्यास ...

गडहिंग्लज : निपाणीमार्गे गडहिंग्लज-कोल्हापूर महाराष्ट्राच्या बसफेऱ्यांना कर्नाटकने बंदी घातली आहे. त्या पूर्ववत सुरू करण्यास बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती न दिल्यास कर्नाटकच्या बसगाड्या कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत घेऊ नका, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून निपाणीमार्गे गडहिंग्लज-कोल्हापूर बसफेऱ्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे गडहिंग्लज-आजरा-चंदगडच्या प्रवाशांना गोरंबे-कागलमार्गे कोल्हापूरला जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडाबरोबरच वेळेचा अपव्ययही होत आहे.

या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखालील गडहिंग्लज विभागातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन चर्चा केली.

निवेदनात म्हटले आहे, रोज काळभैरी-निपाणीमार्गे कोल्हापूर या मार्गावर गडहिंग्लज, आजरा व चंदगड आगारांच्या सुमारे ५० बसफेऱ्या होतात. कोरोनाच्या नावाखाली कर्नाटकच्या हद्दीत जाण्यास महाराष्ट्राच्या बसगाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे केवळ एस.टी.वर अवलंबून असलेल्या प्रवाशांना नाहक त्रास दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात, अरळगुंडीचे माजी सरपंच चेतन लोखंडे, तारेवाडीचे माजी सरपंच अजित तुरटे, किणीचे उपसरपंच सखाराम केसरकर, झुलपेवाडीचे भिकाजी पाडेकर, बसर्गेचे मारुती गोणी यांचा समावेश होता.