शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त दूध स्वीकारा; अन्यथा १ डिसेंबरपासून संकलन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 03:40 IST

गाईचे दूध अतिरिक्त होत असल्याने दूध संघांना मोठा तोटा सहन करावा लागत असून, हे अतिरिक्त दूध शासनाने स्वीकारावे किंवा दूध उत्पादक शेतकºयांना प्रतिलिटर सहा रुपयांचे थेट अनुदान द्यावे.

ठळक मुद्देपण ‘बघूया, करूया’ यापलीकडे सरकार काहीच करीत नाही. दूध उत्पादक शेतकºयांना प्रतिलिटर सहा रुपयांचे थेट अनुदान द्यावे.

कोल्हापूर : गाईचे दूध अतिरिक्त होत असल्याने दूध संघांना मोठा तोटा सहन करावा लागत असून, हे अतिरिक्त दूध शासनाने स्वीकारावे किंवा दूध उत्पादक शेतकºयांना प्रतिलिटर सहा रुपयांचे थेट अनुदान द्यावे. अन्यथा, १ डिसेंबरपासून राज्यातील दूध संकलन बंद करू, असा इशारा महाराष्टÑ राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्यावतीने सरकारला देण्यात आला. राज्यातील प्रमुख दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक बुधवारी कोल्हापुरात झाली.‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायक पाटील म्हणाले, अनेक दूध संघ सरकारपेक्षा जादा दराने दूध खरेदी करीत होते. आताही म्हशीच्या दुधाचा खरेदी दर सरकारपेक्षा तीस पैसे जादाच आहे; पण गाईचे दूध अतिरिक्त झाल्याने संघांपुढे पेच निर्माण झाला असून, संपूर्ण व्यवसाय अडचणीत आला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांची भेट घेऊन दुग्धविकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून निर्णय घेण्याची विनंती केली; पण ‘बघूया, करूया’ यापलीकडे सरकार काहीच करीत नाही. यामुळे संघ तोट्यात जाणार असून, पर्यायाने उत्पादक अडचणीत येणार आहेत. यासाठी पुणे येथील बैठकीत आम्ही चर्चा केली आणि बुधवारच्या बैठकीत निर्णय घेतला आहे.सरकारने अतिरिक्त दूध खरेदी करावे अथवा पावडर तयार करण्यासाठी प्रतिलिटर चार ते पाच रुपये अनुदान द्यावे. हे दोन्ही पर्याय जर मान्य नसतील तर सरकारने उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान वर्ग करावे. यापैकी सरकारने कोणतीच भूमिका घेतली नाही, तर १ डिसेंबरपासून राज्यातील दूध संघ संकलन बंद करणार असल्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.सरकारने विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात दुधाच्या पावडरीचा वापर करावा. त्यातून मुलांना प्रोटिन, कॅल्शियम मिळेल. कर्नाटकात याचा सर्रास वापर सुरू असताना येथे सहकारी व खासगी संघांचे दूध घ्यायचे नाही, हा सरकारचा उद्देश दिसतो, असा आरोप सोनाई दूध संघाचे दशरथ माने यांनी केला. ते म्हणाले, लोण्यावर१२ टक्के जीएसटी केल्याने प्रतिलिटर दोन रुपयांचा फटका बसत आहे.यावेळी ‘इंडियन डेअरी’चे अध्यक्ष अरुण नरके, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, ‘महानंदा’चे उपाध्यक्ष डी. के. पवार, अश्विनी चव्हाण, गौरव नाईक, अमरसिंह नाईक, रणजितदादा निंबाळकर यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.राज्यातील दूध व्यवसायएकूण संकलन प्रतिदिन - २.८७ कोटी लिटर (पैकी खासगी ६० टक्के व सहकारी ४० टक्के)दुधाची मागणी प्रतिदिन - १.२७ कोटी लिटरविक्री - ७० टक्के दूध पिशवीतून, तर ३० टक्के पावडर, लोणी तयार करण्यासाठी वापरले जाते.खासगी संघ - डायनॅमिक्स, सोनाई, प्रभात, गोविंद, स्वराज्य, चितळे.महाराष्टÑातील व बाहेरील संघ - अमूल, पारस, मदर डेअरी, हेरिटेज, हॅटसन, क्रीमलाईन, वैष्णवी, नंदिनी.मंत्रालयात आज बैठकअतिरिक्त दुधाच्या प्रश्नाबाबत आज, गुरुवारी दुपारी अडीच वाजता मंत्रालयात दुग्धविकासमंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत दूध संघ प्रतिनिधींची बैठक होत आहे. बैठकीला प्रतिदिनी ४० हजारांपेक्षा जास्त दूध संकलन असणाºया संघांच्या प्रतिनिधींना बोलावले आहे.जानकरांनी ‘जाणकार’ व्हावे !अतिरिक्त दुधाची पावडर करून सरकारने त्याचा बफर स्टॉक करावा; पण सरकार राजकारण करीत असल्याने मार्ग काढत नसल्याचा आरोप रणजितदादा निंबाळकर यांनी केला. त्यामुळे महादेव जानकर यांनी थोडे ‘जाणकार’ व्हावे, असा टोलाही त्यांनी लगावला.दूध उत्पादक आत्महत्या करीतच नाहीदूध व्यवसायामुळे शेतकरी बळकट झाला असून, आतापर्यंत ज्या-ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या, त्यांची चौकशी करा. यामध्ये ज्याच्या गोठ्यात गाय-म्हैस आहे, असा एकही दिसणार नाही, असे दशरथ माने यांनी सांगितले.मागण्या :अतिरिक्त दूध सरकारने स्वीकारावे. अतिरिक्त दुधाची पावडर करून बफर स्टॉक करावा. माध्यान्ह भोजनात पावडरीचा समावेश करावा. उत्पादकांना प्रतिलिटर सहा रुपये अनुदान द्यावे. अभ्यास समिती नेमावी.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारministerमंत्री