शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

...अन्यथा धुराडे पेटू देणार नाही : रघुनाथ पाटील

By admin | Updated: August 9, 2014 00:30 IST

‘रंगराजन’च्या शिफारशीची मागणी : पाच एकरांवरील शेतकऱ्यांची कर्जे माफ करा

कोल्हापूर : सी. रंगराजन समितीने सुचविलेल्या शिफारशींमधील कारखान्यांच्या हवाई अंतराची अट रद्द करा व साखरेच्या उत्पन्नातील ७० टक्के वाटा ऊस दर म्हणून द्यावा, या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उसाचे कांडेही तोडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी आज, शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिला.पाटील म्हणाले, मंत्री समितीने १५ आॅक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एफआरपी’प्रमाणे दर आम्हाला मान्य नाही. सी. रंगराजन समितीच्या शिफारशी जशाच्या तशा लागू करा, अशी मागणी होती; पण सरकारने कारखानदारांच्या फायद्याच्या दोन शिफारशी लागू करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. साखरेचे दर पडले तर त्याचा तोटा केवळ शेतकऱ्यांच्या माथी, हे आता चालणार नाही. साखरेच्या उत्पन्नातील ७० टक्के वाटा ऊस दराच्या रूपाने शेतकऱ्यांना दिला पाहिजे, त्याचबरोबर दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द होत नाही, तोपर्यंत एकही धुराडे पेटू देणार नाही, आगामी ऊस आंदोलनाबाबत ११ व १२ आॅगस्टला पुणे येथे कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा घेतला असून, त्यामध्ये या सर्व बाबींवर विस्तृत चर्चा केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. विजेच्या बिलात सवलत दिल्याचा कांगावा राज्य शासन करीत आहे; पण मुळात जे देणे आम्ही लागत नाही, ते कसे माफ करता. शेतकऱ्यांना आठ तास वीज द्यायची आणि चोवीस तासांचे पैसे वसूल करायचे असे सर्रास सुरू आहे. लूट करणाऱ्यांनाच पैसे देऊन शेतकऱ्यांवर मेहरबानी करीत असल्यासारखे सरकार जाहिरात करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. केंद्राने पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले;पण लहान शेतकऱ्यांचेच कर्ज थकते असे नाही, निसर्गाचा फटका सर्वांनाच सारखाच बसतो. त्यामुळे पाच एकरांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गूळ नियमन रद्द केले त्याचे स्वागत करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)