शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

... अन्यथा बड्या अधिकाऱ्यांची ‘परेड’

By admin | Updated: May 4, 2016 00:48 IST

२३ जूनला सुनावणी : सीबीआय, एसआयटीवर हायकोर्टाचे ताशेरे

मुंबई /कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे उलटूनही सीबीआय व एसआयटीचा तपास कासवगतीने सुरू असल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी संताप व्यक्त केला. पुढील सुनावणीस हा तपास पुढे सरकला नाही आणि तपास यंत्रणांच्या हाती काही ठोस आले नाही, तर बड्या अधिकाऱ्यांची न्यायालयात ‘परेड’ लावू, असा इशारा उच्च न्यायालयाने दोन्हीही तपास यंत्रणांना दिला.दाभोलकर, पानसरे यांच्या कुटुंबीयांनी हत्येचा तपास एसआयटीकडे वर्ग करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या, तर केतन तिरोडकर यांनी या दोन्ही प्रकरणांचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या तिन्ही याचिकांवरील एकत्रित सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी झाली. सीबीआयने दाभोलकर, तर एसआयटीने पानसरे हत्या प्रकरणाचा तपास अहवाल सादर केला. अहवाल वाचल्यानंतर उच्च न्यायालयाने कासवगतीने सुरू असलेल्या तपासावरून सीबीआय व एसआयटीवर ताशेरे ओढले. ‘असाच तपास सुरू राहिला तर न्यायालयात अहवालांचा ढीग होईल. आम्ही हे शेवटपर्यंत सुरू राहून देणार नाही. या केसचा उलगडा करणे, हे तुमच्यापुढे (सीबीआय, एसआयटी) आव्हान आहे. तुमच्याकडे सर्वसामान्य अपेक्षेने बघतात. तुमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या केसचा तपास जलदगतीने करा. तुम्ही कसोटीला खरे उतरू शकता, हे तुम्हाला सिद्ध करायचे आहे,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांचे कान टोचले.‘$पालकांच्या हत्येचा तपास करण्यासाठी तरुणांना उच्च न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येऊ देऊ नका. वयापेक्षा अधिक समजूतदार होण्याचे ओझे त्यांच्यावर लादू नका. परदेशात राहणाऱ्या भारतीय मुलांना काय वाटेल? त्यांची या देशाबद्दल काय धारणा होईल? याचा विचार करा. पीडितांच्या कुुटुंबीयांची बाजू ऐका. तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात, हे सांगा,’ असे बोलही खंडपीठाने सुनावले.उच्च न्यायालयाने या याचिकांवरील पुढील सुनावणी २३ जून रोजी ठेवत सीबीआय व एसआयटीला तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या सुनावणीस तपास अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, ज्येष्ठ वकील अभय नेवगी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)समीरच्या दोषारोपावर आज निर्णयपानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याच्या निर्णयावर आज, बुधवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या दालनात सुनावणी होत आहे. दि. २७ एप्रिलला उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये समीर गायकवाडच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करायचे की नाही, याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत. आम्ही या खटल्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही, असे स्पष्ट केले होते. या आदेशाची प्रत न्यायाधीश बिले यांना प्राप्त झाली आहे. त्यावर चर्चा होऊन ११ मे रोजी दोषारोप निश्चित करण्याची शक्यता आहे. समीरच्या दोषारोपावर आज निर्णयपानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याच्या निर्णयावर आज, बुधवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या दालनात सुनावणी होत आहे. दि. २७ एप्रिलला उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये समीर गायकवाडच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करायचे की नाही, याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत. आम्ही या खटल्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही, असे स्पष्ट केले होते. या आदेशाची प्रत न्यायाधीश बिले यांना प्राप्त झाली आहे. त्यावर चर्चा होऊन ११ मे रोजी दोषारोप निश्चित करण्याची शक्यता आहे. सनातन संस्था आश्रमामध्ये प्रवेश देत नसल्याची बाब तपास यंत्रणांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यावर खंडपीठाने अशा ठिकाणांना केवळ धार्मिक ठिकाण म्हणून भेट देऊ नका, असे म्हटले. ‘सुवर्ण मंदिराचा इतिहास आपल्याला माहीत आहे. गुरुही गुन्ह्यात (आसारामबापू) सामील असतात. धार्मिक ठिकाणांमध्येही गुन्ह्याचे कट रचले जाऊ शकतात. गुन्हेगार येथेच आश्रय घेतात,’ अशा शब्दांत धार्मिक ठिकाणांचाही तपास करण्याची सूचना खंडपीठाने पोलिसांना केली.