शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

कोरोना निवळल्यानंतरच महापालिकेसह अन्य निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोरोना काळात कोणत्याही निवडणुका घेतल्या जाणार नसल्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोनाची साथ पूर्णपणे निवळल्याशिवाय महापालिकेसह कोणत्याही ...

कोल्हापूर : कोरोना काळात कोणत्याही निवडणुका घेतल्या जाणार नसल्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोनाची साथ पूर्णपणे निवळल्याशिवाय महापालिकेसह कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मराठा आरक्षण आता केंद्र सरकारच्या हातात असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

रविवारी खासगी दौऱ्यानिमित्ताने कोल्हापुरात आलेल्या तनपुरे यांनी शासकीय विश्रामगृहावर काही काळ मुक्काम केला. यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य शासनाची निवडणुका, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि महाविद्यालयीन फीच्या संदर्भातील विषयांवर भूमिका मांडली.

निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना तनपुरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी होती, पण कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने ते अनिश्चित काळासाठी पुढे गेले. जोपर्यंत हे वातावरण पूर्णपणे निवळत नाही, तोवर कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेण्याच्या विचारात सरकार नाही. मराठा आरक्षणाबाबतीत विचारलेल्या प्रश्नावर १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे हा विषय आता केंद्र सरकारच्या कक्षेत गेला आहे. राज्य सरकारच्या अखत्यारित जितके आहे, तितके केले आहे,अजूनही केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच घटना दुरुस्तीचे विधेयक आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबतीतील निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर यावर अजून अभ्यास सुरु आहे. राज्य सरकार म्हणणे मांडण्याची तयारी करत असल्याचे सांगितले.

शाळा, महाविद्यालयीन फीच्या संदर्भात पालकांच्या भावना समजून घेतल्या आहेत. अनावश्यक फी कपातीसंदर्भात राज्य शासन गांभीर्याने विचार करत असून, लवकरच धोरण जाहीर केले जाईल, असेही तनपुरे यांनी सांगितले.