शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

माजी संचालकांच्या इतर कारनाम्यांचीही होणार वसुली

By admin | Updated: December 25, 2015 00:23 IST

भूखंड, बोळ घेणाऱ्यांना बसणार झटका : माजी संचालकांना पैसे भरण्यासाठी महिन्याची मुदत

राजाराम लोंढे --कोल्हापूर --बाजार समितीच्या माजी संचालकांवर २२ लाखांची जबाबदारी निश्चिती केली असली तरी चौकशीतून सुटलेल्या काही मुद्द्यांची पुन्हा चौकशी होऊन त्यांची वसुलीही केली जाणार आहे. बेकायदेशीर दिलेले भूखंड, बोळ काढून घेतले जाणार असून, १८ माजी संचालक व तीन सचिवांना पैसे भरण्यासाठी महिन्याची मुदत देण्यात आली आहे. महिन्यात पैसे भरले नाहीत तर महसुली कारवाई केली जाणार आहे. समितीच्या मागील संचालक मंडळाने केलेल्या कारभाराची चौकशी होऊन, त्या चौकशी अहवालानुसार लवादाने त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे. १८ माजी संचालक व तीन माजी सचिव यांच्याकडून २२ लाख ८७ हजार ३६१ रुपयांची वसुली करावी, असा अहवाल लवाद प्रदीप मालगावे यांनी दिला होता. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी कार्यवाही सुरू केली आहे. जबाबदारी निश्चितीची रक्कम वसूल करण्यासाठी पणन कायदा कलम २२/८७ नुसार प्रक्रिया राबविली आहे. तीस दिवसांत जबाबदारी निश्चिततेचे पैसे भरण्याची मुदत दिली जाणार आहे. तशा नोटिसा काढल्या असून, या मुदतीत पैसे भरले नाहीत तर बाजार समिती प्रशासनाला कळवून महसुली कारवाईची प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले जाणार आहेत. चौकशी अहवालातून काही महत्त्वाच्या बाबी सुटल्याचे निदर्शनास आले आहे. लवादाने निश्चित केलेली जबाबदारी कायम ठेवत बाजार समितीची, त्याशिवाय केलेल्या आर्थिक नुकसानीची चौकशी केली जाणार आहे. तशा हालचाली जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सुरू झाल्या आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही, त्यातच राजकीय दबावामुळे काही माहिती समोर आली नव्हती. चौकशी अहवाल पाहिल्यानंतर हे लक्षात येते. माजी संचालकांचे कारनामे पाहिले तर २२ लाखांची जबाबदारी निश्चितीची कारवाई ही काहीच नाही. त्यामुळे जबाबदारी निश्चिती झाल्यापासून समितीच्या कारभाराची फेरचौकशी करण्याची मागणी रेटली जात होती. त्यानुसार उपनिबंधक कार्यालयाने तयारी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते. संचालकांनी बेकायदेशीर भूखंड वाटप तर केलेच; पण त्याबरोबर मोकळे बोळही भाडेतत्त्वावर दिल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहेत. कमी भाड्यावर ९० वर्षे अशा प्रदीर्घ मुदतीने प्लॉटचे वाटप केल्याने समितीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पहिल्यांदा ९० वर्षे भाड्याच्या प्लॉटचे करार रद्द करून ते ३० वर्षांचे करणे व सुधारित भाडेदराने वसुली करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. करार रद्द होणार : शाहू मंदिराला भाडे कमीशाहू सांस्कृतिक मंदिर हे कोल्हापुरातील सर्वांत मोठे कार्यालय पंचरत्न एंटरप्रायझेसला तुटपुंज्या भाड्याने दिलेले आहे. तत्कालीन संचालक मंडळाने ‘पंचरत्न’शी केलेला करार बेकायदेशीर असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. अशा प्रकारचे करार रद्द करून नवीन करार केले जाणार आहेत. त्याचबरोबर रस्ते, बोळ, पॅसेज, मोकळ्या जागा मोठ्या प्रमाणात भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. त्यांचे करार रद्द करून या जागा मोकळ्या केल्या जाणार आहेत.