शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मूळ २९ कोटींचा प्रकल्प, गेला ११४ कोटींवर

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

काम रखडल्याचा फटका : आतापर्यंत ९५ कोटी रुपये खर्च; आणखी ५० कोटींच्या निधीची गरज

रवींद्र येसादे - उत्तूर -आंबेओहळ प्रकल्पाच्या कामासाठी सुरुवातीस २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, पहिली तीन वर्षे वगळता प्रकल्प १५ वर्षे रखडला. यामुळे वेळोवेळी महागाईमुळे प्रकल्पाच्या कामासाठी ११४ कोटी मंजूर करण्यात आले. त्यानुसार प्रकल्पाची कामे व पुनर्वसन आदींसाठी ९५.३६ कोटी रुपये खर्च झाले. प्रकल्पाचे उर्वरित काम व पुनर्वसनाच्या मंजूर रकमेसाठी ५० कोटींपेक्षा अधिक निधीची गरज आहे. भू-संपादन व पुनर्वसनासाठी २१ कोटींची तसेच धरण व अनुषंगिक कामासाठी ४० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. अतिरिक्त ४१ कोटी जादा निधी उपलब्ध झाल्यास सन २0१६-१७ मध्ये घळभरणी होऊ न पाणीसाठा होऊ शकतो.आजअखेर प्रकल्प कामाची सद्य:स्थितीधरणाची माथापातळी ६९०.२३० मी. आहे. साखळी क्रमांक २१० मी., तर २०४० मी. भागातील रोधी चर खोदाई व भरावाचे काम पूर्ण झाले आहे. डाव्या व उजव्या तिरावरील कामासाठी निधीची गरज आहे. कोल्हापूर पद्धतीच्या सहा बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून, गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील बंधाऱ्यासाठी निधीची गरज आहे.मातकाम ७० टक्के पूर्णप्रकल्पाच्या डाव्या तिरावरील ६८१.० मी. व उजव्या तिरावरील ६८२.०० मी. तलावापर्यंत मातकाम आहे. हे काम ७० टक्केपूर्ण झाले आहे. उर्वरित काम अद्याप अपूर्णच राहिलेले आहे.विद्युत विमोचक सिंचन तथा विद्युत विमोचकाचे खोदकाम पूर्ण झाले असून, ऊर्ध्वनलिका, शुष्कविहीर, पाणतळ व यांत्रिकी घटकांची कामे ८० टक्के पूर्ण आहेत.सांडवा काम अंतिम टप्यातप्रकल्पास द्वाररहित डकबिल प्रकारचा सांडवा आहे. या प्रकल्पाच्या सांडव्याची लांबी ८० मी.असृून त्याची खुदाई पूर्ण आहे. सांडवा पुच्छ कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांडवा संधानकाचे ५ टक्के काम पूर्ण होणे बाकी आहे.घळभरणीचे काम जवळपास पूर्णप्रकल्पाच्या दोन्ही तिरावरील मातकाम व दगडी पिचिंगचे काम पूर्ण झाले आहे. आधी पुनर्वसन मगच घळभरणी, असा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे घळभरणीचे काम २० टक्के अपूर्ण आहे. प्रकल्पाचे काम सध्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. मात्र, विस्थापितांचे प्रश्न अर्धवट स्थितीत आहे.