शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

साखर कामगारांसाठी आज परिषदेचे आयोजन

By admin | Updated: May 11, 2015 01:07 IST

अनेक प्रश्न प्रलंबित : आंदोलनाची दिशा ठरवणार

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी कामगार, साखर कारखान्यांचे कामगार व ऊस वाहतूकदार यांच्या विविध प्रश्नांबाबत आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, सोमवारी कोल्हापुरात राज्यस्तरीय परिषद होत आहे. राज्य शासनाने ऊसतोडणी कामगारांना तोडणीदरात वाढीची घोषणा केली; पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. साखर कामगारांची देणी अशा अनेक प्रश्नांबाबत या परिषदेत जोरदार चर्चा होणार आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीवाढीच्या कराराची मुदत संपून वर्ष झाले. संपलेल्या हंगामात शासनाने केवळ चर्चेचे गुऱ्हाळ घातले. शेवटच्या क्षणी वाढ केली; पण त्याची अंमलबजावणीही केलेली नाही. वाढती महागाई पाहता ऊसतोड कामगारांना पोट भरणे मुश्कील झाले आहे. त्याचबरोबर एफ. आर. पी.प्रमाणे पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत. परिणामी शेतकरी अडचणीत आला आहे. कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने होत आले तरी पैसे दिलेले नाहीत. साखर कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही आहे. या सर्व प्रश्नांबाबत अनेक वेळा शासकीय पातळीवर चर्चा केली. आंदोलन केले, मोेर्चे काढले; पण शासनाने फारशी दखल घेतलेली नाही. हा हंगाम तसाच गेला. किमान आगामी हंगामाबाबत तरी ठोस निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे कोल्हापुरात आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी-वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी दिली. या परिषदेचे उद्घाटन ‘सिटू’चे राज्य सचिव डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते व उद्धव भवलकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी डॉ. अजित नवले, अण्णा सावंत यांच्यासह ऊसतोडणी कामगार, राज्य साखर कामगार, ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ठराव केले जाणारच; पण आगामी आंदोलनाचे रणशिंगही फुंकले जाणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)