शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

साखर कामगारांसाठी आज परिषदेचे आयोजन

By admin | Updated: May 11, 2015 01:07 IST

अनेक प्रश्न प्रलंबित : आंदोलनाची दिशा ठरवणार

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी कामगार, साखर कारखान्यांचे कामगार व ऊस वाहतूकदार यांच्या विविध प्रश्नांबाबत आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, सोमवारी कोल्हापुरात राज्यस्तरीय परिषद होत आहे. राज्य शासनाने ऊसतोडणी कामगारांना तोडणीदरात वाढीची घोषणा केली; पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. साखर कामगारांची देणी अशा अनेक प्रश्नांबाबत या परिषदेत जोरदार चर्चा होणार आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीवाढीच्या कराराची मुदत संपून वर्ष झाले. संपलेल्या हंगामात शासनाने केवळ चर्चेचे गुऱ्हाळ घातले. शेवटच्या क्षणी वाढ केली; पण त्याची अंमलबजावणीही केलेली नाही. वाढती महागाई पाहता ऊसतोड कामगारांना पोट भरणे मुश्कील झाले आहे. त्याचबरोबर एफ. आर. पी.प्रमाणे पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत. परिणामी शेतकरी अडचणीत आला आहे. कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने होत आले तरी पैसे दिलेले नाहीत. साखर कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही आहे. या सर्व प्रश्नांबाबत अनेक वेळा शासकीय पातळीवर चर्चा केली. आंदोलन केले, मोेर्चे काढले; पण शासनाने फारशी दखल घेतलेली नाही. हा हंगाम तसाच गेला. किमान आगामी हंगामाबाबत तरी ठोस निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे कोल्हापुरात आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी-वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी दिली. या परिषदेचे उद्घाटन ‘सिटू’चे राज्य सचिव डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते व उद्धव भवलकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी डॉ. अजित नवले, अण्णा सावंत यांच्यासह ऊसतोडणी कामगार, राज्य साखर कामगार, ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ठराव केले जाणारच; पण आगामी आंदोलनाचे रणशिंगही फुंकले जाणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)