शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

‘हिंदू एकता’सारख्या संघटनांची अजूनही गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST

कोल्हापूर : हिंदूंच्या संरक्षणासाठी यापुढच्या काळात लाठ्याकाठ्या घेऊन मारामाऱ्या करायची गरज नाही, परंतु बुद्धीच्या, लेखणीच्या बळावर या समाजाचे ...

कोल्हापूर : हिंदूंच्या संरक्षणासाठी यापुढच्या काळात लाठ्याकाठ्या घेऊन मारामाऱ्या करायची गरज नाही, परंतु बुद्धीच्या, लेखणीच्या बळावर या समाजाचे भले करण्यासाठी ‘हिंदू एकता’सारख्या संघटनांची अजूनही गरज आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

मिरजकर तिकटीजवळील विठ्ठल मंदिरावरील हिंदू एकताच्या सभागृहाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. पाटील म्हणाले, भारत देशाला आपलं मानणारे मुस्लीम बांधव आमचेच आहेत. हिंदू समाज बुरसटलेला नाही. या धर्मातील अनेक प्रथा परंपरांना वैज्ञानिक आधार आहे. नव्या पिढीला हे सर्व समजावून सांगण्याची गरज आहे.

संस्थापक अध्यक्ष नारायणराव कदम म्हणाले, १९८० साली कोल्हापुरात हिंदू एकताचे काम सुरू केले. त्यावेळी आमच्यावर जातीयवादाचा आरोप झाला. परंतु देशहितासाठी आम्ही काम करत राहिलो. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले. अनेक नेत्यांनी हे सभागृह बांधण्याच्या घोषणा केल्या, परंतु चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच हे सभागृह पूर्ण झाले.

बाबा पार्टे म्हणाले, कोल्हापुरात हिंदू एकताची चळवळ जोमात असताना चंद्रकांत पाटील यांच्यासारखा नेता मिळाला असता तर आम्ही मोठे काम करू शकलो असतो. संसारावर तुळशीपत्र ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी संघटना वाढवल्याचे गजानन तोडकर यांनी सांगितले. यावेळी प्रांत अध्यक्ष विनायक पावसकर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, तुषार देसाई, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, रवि घोरपडे, लाला गायकवाड, सुभाष वडगावकर, चंद्रकांत बराले, संजय साडविलकर, हिंदूराव शेळके, विलास मोहिते, दिलीप सूर्यवंशी, अजित तोडकर, सुरेश काकडे, अनिल चोरगे, जयसिंग पाटील उपस्थित होते.

१७०९२०२१ कोल हिंदू एकता

कोल्हापुरात ‘हिंदू एकता’च्या सांस्कृतिक सभागृहाचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी डावीकडून गजानन तोडकर, रवि घोरपडे, नारायणराव कदम, बाबा पार्टे, लाला गायकवाड, सुभाष वडगावकर, चंद्रकांत बराले उपस्थित होते.

छाया नसीर अत्तार