शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
5
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
6
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
7
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
8
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
9
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
10
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
11
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
12
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
13
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
14
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
15
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
16
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
19
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
20
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

पंचगंगा हॉस्पिटलमधील औषधांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: June 9, 2016 01:24 IST

‘स्थायी’ सभापतींची अचानक भेट : आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

संजय तिपाले , बीडजिल्ह्यात दारुबंदीचे वारे जोरजोरात वाहू लागले आहे. बाटली आडवी करण्यासाठी पदर खोचून उभ्या झालेल्या महिलांनी माजलगाव व पाटोदा येथे थेट दारुविक्रेत्यांच्या घरावर छापे टाकून पकडलेल्या बाटल्या पोलिसांच्या समोर ठेवल्या. त्यामुळे रणरागिणींच्या संतापाचा उद्रेक तर दिसलाच शिवाय पोलिसांची निष्क्रियताही लपून राहिली नाही. आता स्थिती अशी आहे की, अवैध विक्रेत्यांनी पोलिसांऐवजी महिलांचीच जास्त धास्ती घेतली आहे.परळी तालुक्यातील धारावती तांडा, पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे वर्षभरापासून तर माजलगाव तालुक्यातील लऊळ येथे तीन महिन्यांपासून अवैध दारुविक्रीविरोधात लढा सुरू आहे. दारुमुळे होणारे भांडण - तंटे, उद्धवस्थ झालेले संसार व कुटुंबाची वाताहत या महिलांनी जवळून पाहिली. त्यामुळे घरातल्यांपासून ते दारातल्यापर्यंत सर्वांचा विरोध पत्कारुन काही महिला दारुबंदीसाठी पुढे आल्या. पोलीस ठाण्यांपासून ते उत्पादन शुल्क कार्यालय व महानिरीक्षकांपर्यंत उंबरठे झिजवले; परंतु रणरागिणींच्या पदरी निराशाच पडली. विके्रत्यांची नावासह यादी पोलिसांकडे देऊनही दारुविक्री बंद होत नाही म्हणून दोन दिवसांपूर्वी सौताडा (ता. पाटोदा) येथे सीता सानप व लऊळ (ता. माजलगाव) येथे सत्यभामा सौंदरमल, दीपाली पाटील यांनी थेट दारुविक्रेत्यांच्या घरांवर धडक दिली. लऊळमध्ये सौंदरमल व पाटील या दोघींनी दारुच्या बाटल्यांचा पुरावा घेऊन ग्रामीण ठाणे गाठले.सौताड्यात सीता सानप यांनी विके्रत्याला इतर महिलांच्या मदतीने पकडून पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर दोन्ही ठिकाणची पोलीस यंत्रणा कामाला लागली. सर्वसामान्य महिलांना दारु सापडते; परंतु कायद्याचे कवच, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असे सारे अस्त्र हातात असताना पोलिसांना ती सापडत नाही. रणरागिणनी बंडाच्या पावित्र्यात असताना कायद्याचे रक्षक थंड कसे? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.मागील ५० वर्षांच्या कालावधीत केवळ दोनच गावांत दारुबंदी होऊ शकली. बीड तालुक्यातील काळेगाव येथे राहीबाई धुमाळ या सत्तरीतील महिलेने २००९ मध्ये दारुची बाटली आडवी करुन अनेकांचे संसार वाचविले.४त्यानंतर केज तालुक्यातील आडस येथे २०११ मध्ये दारुबंदीचा लढा महिलांनी जिंकला होता. आता गावाबाहेरून विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. दारूबंदीच्या बाजूने एकूण मतदारांपैकी ५० टक्के कौल हवा असतो.४काही गावांत राजकीय मंडळींचा विक्रेत्यांना वरदहस्त असतो. प्रशासन दरबारी पाठपुरावा करताना महिलांचीही दमछाक होते. त्यामुळे दारूबंदी होण्यास अडचणी येतात.परळी तालुक्यातील धारावती तांडा येथे वर्षभरापासून अंगणवाडी सेविका शांताबाई राठोड व पारुबाई चव्हाण या दारुबंदीची मागणी करत आहेत. २६ मे रोजी विशेष पोलिीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन त्यांनी कैफियत मांडली होती. त्यानंतर आठ दिवसांत दारु हद्दपार केली जाईल, असे आश्वासन त्यांना दिले होते; परंतु चोरीछुपे दारुअड्डे सुरुच आहेत. शांताबाई राठोड यांनी कित्येकदा दारुअड्डे उद्ध्वस्थ केले. रसायन, दारुचे बॅरेल उलथवून टाकले. अधीक्षक अनिल पारसकर यांनी तांड्यावर राहुटी देऊन तीन पोलीस कायमस्वरुपी नेमले; पण अद्यापही दारुविक्री थांबलेली नाही.