शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

पंचगंगा हॉस्पिटलमधील औषधांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: June 9, 2016 01:24 IST

‘स्थायी’ सभापतींची अचानक भेट : आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

संजय तिपाले , बीडजिल्ह्यात दारुबंदीचे वारे जोरजोरात वाहू लागले आहे. बाटली आडवी करण्यासाठी पदर खोचून उभ्या झालेल्या महिलांनी माजलगाव व पाटोदा येथे थेट दारुविक्रेत्यांच्या घरावर छापे टाकून पकडलेल्या बाटल्या पोलिसांच्या समोर ठेवल्या. त्यामुळे रणरागिणींच्या संतापाचा उद्रेक तर दिसलाच शिवाय पोलिसांची निष्क्रियताही लपून राहिली नाही. आता स्थिती अशी आहे की, अवैध विक्रेत्यांनी पोलिसांऐवजी महिलांचीच जास्त धास्ती घेतली आहे.परळी तालुक्यातील धारावती तांडा, पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे वर्षभरापासून तर माजलगाव तालुक्यातील लऊळ येथे तीन महिन्यांपासून अवैध दारुविक्रीविरोधात लढा सुरू आहे. दारुमुळे होणारे भांडण - तंटे, उद्धवस्थ झालेले संसार व कुटुंबाची वाताहत या महिलांनी जवळून पाहिली. त्यामुळे घरातल्यांपासून ते दारातल्यापर्यंत सर्वांचा विरोध पत्कारुन काही महिला दारुबंदीसाठी पुढे आल्या. पोलीस ठाण्यांपासून ते उत्पादन शुल्क कार्यालय व महानिरीक्षकांपर्यंत उंबरठे झिजवले; परंतु रणरागिणींच्या पदरी निराशाच पडली. विके्रत्यांची नावासह यादी पोलिसांकडे देऊनही दारुविक्री बंद होत नाही म्हणून दोन दिवसांपूर्वी सौताडा (ता. पाटोदा) येथे सीता सानप व लऊळ (ता. माजलगाव) येथे सत्यभामा सौंदरमल, दीपाली पाटील यांनी थेट दारुविक्रेत्यांच्या घरांवर धडक दिली. लऊळमध्ये सौंदरमल व पाटील या दोघींनी दारुच्या बाटल्यांचा पुरावा घेऊन ग्रामीण ठाणे गाठले.सौताड्यात सीता सानप यांनी विके्रत्याला इतर महिलांच्या मदतीने पकडून पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर दोन्ही ठिकाणची पोलीस यंत्रणा कामाला लागली. सर्वसामान्य महिलांना दारु सापडते; परंतु कायद्याचे कवच, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असे सारे अस्त्र हातात असताना पोलिसांना ती सापडत नाही. रणरागिणनी बंडाच्या पावित्र्यात असताना कायद्याचे रक्षक थंड कसे? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.मागील ५० वर्षांच्या कालावधीत केवळ दोनच गावांत दारुबंदी होऊ शकली. बीड तालुक्यातील काळेगाव येथे राहीबाई धुमाळ या सत्तरीतील महिलेने २००९ मध्ये दारुची बाटली आडवी करुन अनेकांचे संसार वाचविले.४त्यानंतर केज तालुक्यातील आडस येथे २०११ मध्ये दारुबंदीचा लढा महिलांनी जिंकला होता. आता गावाबाहेरून विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. दारूबंदीच्या बाजूने एकूण मतदारांपैकी ५० टक्के कौल हवा असतो.४काही गावांत राजकीय मंडळींचा विक्रेत्यांना वरदहस्त असतो. प्रशासन दरबारी पाठपुरावा करताना महिलांचीही दमछाक होते. त्यामुळे दारूबंदी होण्यास अडचणी येतात.परळी तालुक्यातील धारावती तांडा येथे वर्षभरापासून अंगणवाडी सेविका शांताबाई राठोड व पारुबाई चव्हाण या दारुबंदीची मागणी करत आहेत. २६ मे रोजी विशेष पोलिीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन त्यांनी कैफियत मांडली होती. त्यानंतर आठ दिवसांत दारु हद्दपार केली जाईल, असे आश्वासन त्यांना दिले होते; परंतु चोरीछुपे दारुअड्डे सुरुच आहेत. शांताबाई राठोड यांनी कित्येकदा दारुअड्डे उद्ध्वस्थ केले. रसायन, दारुचे बॅरेल उलथवून टाकले. अधीक्षक अनिल पारसकर यांनी तांड्यावर राहुटी देऊन तीन पोलीस कायमस्वरुपी नेमले; पण अद्यापही दारुविक्री थांबलेली नाही.