शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

अपंगांच्या नोकऱ्यांसाठी अनुदान रोखण्याचे आदेश

By admin | Updated: October 25, 2016 01:08 IST

शासनाचे आदेश : तीन टक्के नोकऱ्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी

दत्ता बिडकर --हातकणंगले -शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये अपंगांच्या तीन टक्के नोकऱ्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अपंगांना १ ते ३४ बिंदू नियमावलीनुसार नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे, असा शासन आदेश असतानाही अपंगांना नोकऱ्या दिल्या जात नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. शासन नियमानुसार कार्यवाही होत नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरणे, शासकीय अनुदान प्राप्त संस्थांचे वार्षिक अनुदान तत्काळ रोखण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रांत खळबळ उडाली आहे.अपंगांचा अनुशेष भरून काढण्यासाठी अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ राज्यामध्ये लागू करण्यात आला आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासन अनुदानप्राप्त संस्था, प्राधिकरणे, महामंडळे, शासकीय भागभांडवल गुंतले आहेत, अशा संस्थांमध्ये तीन टक्के नोकऱ्यांचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र, याचे काटेकोर पालन होत नसल्याने शासनाने २७ एप्रिल २00४ला शासन निर्णय घेऊन याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले होते.अपंगांच्या आरक्षणासंदर्भात आणि नियुक्ती व पदोन्नतीबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १0/११/२00४ रोजी निर्णय घेऊन अपंग कर्मचाऱ्यांना गट ‘क’ आणि गट ‘ड’मधील नियुक्ती देताना शंभर रिक्त पदांची नोंद ठेवून अपंगांच्या भरतीसाठी बिंदू नियमावली तयार केली आहे. यामध्ये एक पदापासून ३४ पदांपर्यंत एक अपंग कर्मचारी नियुक्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत सर्व विभागीय आयुक्तांना अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. अपंग व्यक्ती अधिनियमानुसार भरती वर्षामध्ये एखादी व्यक्ती त्या वर्षात उपलब्ध झाली नाही, तर आरक्षणानुसार सदरचे पद तीन वर्षांपर्यंत रिक्त ठेवून अपंग व्यक्तीची या पदावर नियुक्ती करण्यात यावी, असेही आदेश दिले आहेत. तातडीने जागा भरा : शासकीय कार्यालयांमध्ये खळबळअपंग व्यक्तींना नोकरीमध्ये समान संधी व त्यांच्या हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग कृती आराखडा अंमलबजावणीसाठी शासनाने २0/७/२0११ च्या आदेशाने ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, नगरपंचायती, नगरपरिषदा, आणि महानगर पालिका यांना तीन टक्के अपंगांच्या जागा तातडीने भरण्याचे आदेश दिले. या सर्वच शासकीय यंत्रणांनी शासन आदेश धाब्यावर बसवून अपंगांची दखल घेतली नाही. म्हणून शासनाने प्रतिनिधी अपंग/२0१५/ प्र. क्र. २२/ अ, क्र, ५/२५ फेब्रुवारी २0१५ शासन निर्णय घेऊन अपंग कल्याण कृती आराखडा २00१ ची अंमलबजावणी करावी, असे आदेश देऊन शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालये, शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून गंभीर कार्यवाही होत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करून ज्यांच्याकडून अपंग व्यक्ती अधिनियमाची अंमलबजावणी होत नाही, अशी सर्व शासकीय कार्यालये, प्राधिकरणे, महामंडळे, शासकीय भागभांडवल गुंतले आहे, अशा संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका यांसह सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांचे वार्षिक अनुदान तत्काळ रोखण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.