शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत मिळवावे लागणार २० टक्के गुण

By admin | Updated: May 28, 2015 00:56 IST

दहावी, बारावीबाबत शिक्षण मंडळाचा निर्णय; पुढील वर्षी अंमलबजावणी

कोल्हापूर : दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्णतेसाठी आता विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. निव्वळ टक्केवारी नव्हे तर निकालाची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव शरद गोसावी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.सचिव गोसावी म्हणाले, आतापर्यंत दहावी, बारावीच्या परीक्षेमधील कला आणि वाणिज्य शाखेच्या पेपरचे स्वरूप ८० गुणांची लेखी आणि २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच विज्ञान शाखेतील पेपरचे स्वरूप ७० गुणांची लेखी व ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असे होते. त्यामुळे लेखी परीक्षेत गुण कमी मिळाले तरी प्रात्यक्षिकामधील गुणांच्या जोरावर विद्यार्थी उत्तीर्ण होत होते. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षेच्या निकालातील टक्केवारी वाढत आहे. निव्वळ टक्केवारी नव्हे तर गुणवत्तादेखील वाढावी या उद्देशाने शासनाने लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याची अट निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कला, वाणिज्य शाखेच्या ८० गुणांच्या पेपरमध्ये १६ आणि विज्ञान शाखेच्या ७० गुणांच्या पेपरमध्ये १४ गुण मिळवावे लागणार आहेत. त्याबाबत शासनाने अभ्यास समिती नेमली आहे. फेब्रुवारी-मार्च २०१६ पासूनच्या परीक्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा विचार आहे. (प्रतिनिधी)यंदाचे निकाल उच्चांकी राहतील...लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पुढील वर्षी निकालाची टक्केवारी यावर्षीपेक्षा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे निकाल पुढील काही वर्षांपर्यंत उच्चांकी राहतील, अशी शक्यता सचिव गोसावी यांनी व्यक्त केली.