शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत मिळवावे लागणार २० टक्के गुण

By admin | Updated: May 28, 2015 00:56 IST

दहावी, बारावीबाबत शिक्षण मंडळाचा निर्णय; पुढील वर्षी अंमलबजावणी

कोल्हापूर : दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्णतेसाठी आता विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. निव्वळ टक्केवारी नव्हे तर निकालाची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव शरद गोसावी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.सचिव गोसावी म्हणाले, आतापर्यंत दहावी, बारावीच्या परीक्षेमधील कला आणि वाणिज्य शाखेच्या पेपरचे स्वरूप ८० गुणांची लेखी आणि २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच विज्ञान शाखेतील पेपरचे स्वरूप ७० गुणांची लेखी व ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असे होते. त्यामुळे लेखी परीक्षेत गुण कमी मिळाले तरी प्रात्यक्षिकामधील गुणांच्या जोरावर विद्यार्थी उत्तीर्ण होत होते. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षेच्या निकालातील टक्केवारी वाढत आहे. निव्वळ टक्केवारी नव्हे तर गुणवत्तादेखील वाढावी या उद्देशाने शासनाने लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याची अट निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कला, वाणिज्य शाखेच्या ८० गुणांच्या पेपरमध्ये १६ आणि विज्ञान शाखेच्या ७० गुणांच्या पेपरमध्ये १४ गुण मिळवावे लागणार आहेत. त्याबाबत शासनाने अभ्यास समिती नेमली आहे. फेब्रुवारी-मार्च २०१६ पासूनच्या परीक्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा विचार आहे. (प्रतिनिधी)यंदाचे निकाल उच्चांकी राहतील...लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पुढील वर्षी निकालाची टक्केवारी यावर्षीपेक्षा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे निकाल पुढील काही वर्षांपर्यंत उच्चांकी राहतील, अशी शक्यता सचिव गोसावी यांनी व्यक्त केली.