शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत मिळवावे लागणार २० टक्के गुण

By admin | Updated: May 28, 2015 00:56 IST

दहावी, बारावीबाबत शिक्षण मंडळाचा निर्णय; पुढील वर्षी अंमलबजावणी

कोल्हापूर : दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्णतेसाठी आता विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. निव्वळ टक्केवारी नव्हे तर निकालाची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव शरद गोसावी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.सचिव गोसावी म्हणाले, आतापर्यंत दहावी, बारावीच्या परीक्षेमधील कला आणि वाणिज्य शाखेच्या पेपरचे स्वरूप ८० गुणांची लेखी आणि २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच विज्ञान शाखेतील पेपरचे स्वरूप ७० गुणांची लेखी व ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असे होते. त्यामुळे लेखी परीक्षेत गुण कमी मिळाले तरी प्रात्यक्षिकामधील गुणांच्या जोरावर विद्यार्थी उत्तीर्ण होत होते. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षेच्या निकालातील टक्केवारी वाढत आहे. निव्वळ टक्केवारी नव्हे तर गुणवत्तादेखील वाढावी या उद्देशाने शासनाने लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याची अट निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कला, वाणिज्य शाखेच्या ८० गुणांच्या पेपरमध्ये १६ आणि विज्ञान शाखेच्या ७० गुणांच्या पेपरमध्ये १४ गुण मिळवावे लागणार आहेत. त्याबाबत शासनाने अभ्यास समिती नेमली आहे. फेब्रुवारी-मार्च २०१६ पासूनच्या परीक्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा विचार आहे. (प्रतिनिधी)यंदाचे निकाल उच्चांकी राहतील...लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पुढील वर्षी निकालाची टक्केवारी यावर्षीपेक्षा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे निकाल पुढील काही वर्षांपर्यंत उच्चांकी राहतील, अशी शक्यता सचिव गोसावी यांनी व्यक्त केली.