शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

फेरनिवडणूक हाच ‘केडीसीसी’ला पर्याय

By admin | Updated: January 26, 2016 01:22 IST

चंद्रकांतदादा पाटील : ‘कुमुदा’शी व्यवहार म्हणजे ‘दरोडेखोरी’; स्वीकृत संचालकही ‘अपात्रच’

कोल्हापूर : एखाद्या संस्थेचे संचालक मंडळ अल्पमतात येत असेल तर तिथे प्रशासक येतो. नवीन वटहुकुमामुळे अपात्र होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांची संख्या पाहता संचालक मंडळ अल्पमतात येते. परिणामी बँकेवर एक तर प्रशासक येईल अथवा संचालक मंडळाची फेरनिवडणूक होईल, असे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. ‘दौलत’ भाडेतत्त्वावर घेऊ इच्छिणारे ‘कुमुदा’ शुगर्सवाले शेतकऱ्यांचे पैसे बुडविणारे दरोडेखोर आहेत, त्यांना कारखाना देणे म्हणजे दरोडेखोरांशी संगत असल्याची घणाघाती टीकाही सहकारमंत्र्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केली. यामुळे सहकारमंत्री व मुश्रीफ यांच्यातील राजकीय कलगीतुरा पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत. गैरकारभारामुळे बरखास्त झालेल्या बँकेतील संचालकांबाबत रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार राज्य सरकारने केलेल्या नवीन वटहुकुमामुळे जिल्हा बँकेचे दहा संचालक अपात्र होणार आहेत. संचालक मंडळ अल्पमतात जाऊ नये, यासाठी सत्तारूढ गट गुपचूप दोन-दोन संचालकांचा राजीनामा घेऊन त्याठिकाणी स्वीकृत म्हणून नव्याने दोघांची नियुक्ती करत आहे. ही प्रक्रियाच बेकायदेशीर असून त्याकडे सहकार खात्याचे बारीक लक्ष असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे; पण जिल्हा बँकेचे कारभारी पळवाट काढून स्वीकृत संचालकांची नियुक्ती करत सुटले आहेत; पण या स्वीकृत संचालकांचे प्रस्ताव सहकार विभागाकडे येतील त्यावेळी त्यांना निवडी बेकायदेशीर असल्याच्या नोटिसा काढण्यात येतील. त्यामुळे स्वीकृत संचालकही अपात्र ठरणार असून, त्यांनाही राजीनामा द्यावा लागेल. बँकेच्या एकूण संचालकांपैकी १० ते ११ संचालक अपात्र ठरणार असल्याने संचालक मंडळ अल्पमतात येणार आहे. त्यामुळे एकतर बँकेवर प्रशासक येईल किंवा बँकेची निवडणूक नव्याने घ्यावी लागेल. दौलत विकत घेण्याचा करार ‘कुमुदा’ने रद्द केल्यास आणि त्यामुळे जिल्हा बँकेचे नुकसान झाल्यास त्यास सहकारमंत्री पाटील हेच जबाबदार असतील अशी टीका परवाच आमदार मुश्रीफ यांनी केली होती. त्याची दखल घेत पाटील म्हणाले, ‘आपल्यामुळे ‘कुमुदा’ने ‘दौलत’बाबत केलेला करार रद्द केल्याची टीका काही मंडळी करत आहेत; पण मुळात ‘कुमुदा’शी केलेल्या व्यवहारावरच आमची हरकत आहे. सहकार विभाग व साखर आयुक्त अशा बोगस कंपनीशी व्यवहार करण्यास कधीच परवानगी देणार नाही. ‘कुमुदा’वाले हेच मुळचे दरोडेखोर आहेत. त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या उसाची बिले दिलेली नाहीत. अशा लोकांना ‘दौलत’ कारखाना चालविण्यास देणे म्हणजे दरोडेखोरांशी संगत करण्याचाच प्रकार आहे. साखर विकून पळून जाणाऱ्यांना सरकार माफ करणार नसल्याचा इशाराही सहकारमंत्री पाटील यांनी दिला. (प्रतिनिधी)