शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेवर कर्जमाफीच पर्याय

By admin | Updated: October 1, 2016 01:11 IST

राजू शेट्टी : प्रसंगी सदाभाऊंच्या लाल दिव्याचा बळी देऊ !

कोल्हापूर : देशभरामध्ये शेतीशी संबंधित असलेल्या मराठा, पाटीदार, गुजर आणि जाट समाजांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे देश अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता संपवायची असेल तर कर्जमाफी हा एकच पर्याय आहे. वेळ पडली तर सदाभाऊंच्या लाल दिव्याचा बळी देईन; मात्र कोणत्याही परिस्थितीत २०१९ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. ‘स्वाभिमानी’च्या कोल्हापुरातील संपर्क कार्यालयाचे शुक्रवारी दुपारी उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ‘स्वाभिमानी’चे हे जिल्हा संपर्क (पान १४ वर) कार्यालय सुरू करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनानिमित्ताने आजारपणातून बरे झालेले खोत पहिल्यांदाच कोल्हापूरात आल्याने कार्यक र्त्यांनी मोठी गर्दी केली.शेट्टी म्हणाले, गुजरातमध्ये पाटीदार, राजस्थानमध्ये गुजर, हरियाणामध्ये जाट आणि महाराष्ट्रातील मराठा समाजात अस्वस्थता आहे. शेतीशी संबंधित असलेला हा समाज आहे. या समाजाचे दुखणे दारिद्र्यात आहे. त्याचमुळे देशभरातील शेतकरी नेत्यांना एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून पुढच्या लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे फॉर्म भरले असून देशभरातून ५० लाख शेतकऱ्यांचे फॉर्म भरून ते पंतप्रधानांकडे देणार आहे. तीन टक्के सरकारी नोकरांसाठी सातव्या वेतन आयोगावर चर्चा न करता कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्यांना कर्जमुक्ती करायला भाग पाडणार आहे. त्यासाठी सदाभाऊंच्या लाल दिव्याचा बळी द्यायलाही मागे-पुढे पाहणार नाही.’राज्यमंत्री खोत म्हणाले, दलाल बाजूला करून शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांना पुरविण्याच्या आठवडी बाजार योजनेवर अनेकांनी टीका केली. मात्र मुंबईत ही योजना यशस्वी ठरली. राज्यभरात ही योजना यशस्वी ठरत असून उद्या, रविवारी मुंबईत हुतात्मा चौकामध्ये हा आठवडी बाजार भरविणार आहे. तीन वर्षांचे ‘ठिबक’चे अनुदान गेल्या सरकारने दिले नव्हते. ते १२९ कोटी रुपये देऊन पुन्हा राज्यासाठी ४०८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील तीन लाख हेक्टरवर ठिबक सिंचन करण्यासाठी ‘नाबार्ड’कडून अडीच टक्के व्याजाने निधी देण्याचे धोरण ठरत आहे. आम्ही केलेली चांगली कामे लोकांसमोर मांडत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचीही तयारी करा.’संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी प्रास्ताविक केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, हातकणंगले महिला तालुकाध्यक्ष मेघा चौगुले यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती सीमा पाटील, शिरोळच्या सभापती सुवर्णा अपराज, जिल्हा परिषदेचे सदस्य सावकर मादनाईक, सुरेश कांबळे, सांगलीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, दि. बा. पाटील, राजेंद्र गड्यान्नावर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ....................राजू शेट्टी यांच्या घोषणा- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी जिल्हा कार्यालयात थांबणार.- पुढील वर्षीपर्यंत साडेपाच कोटींची सहकारी राईस मिल उभारणार...................यंदाचे आंदोलन खणखणीतयंदा उसाची पळवापळवी होणार असल्यामुळे उसाच्या कांड्याला सोन्याचा भाव येणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी भंगाराच्या भावाने ऊस घालण्यासाठी गडबड करू नये. यंदाचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत खणखणीत करायचे आहे. तशी मानसिकता ठेवा, असे शेट्टी म्हणाले. ...................................गड्यान्नावरांना धक्काबुक्की करणारे तुरुंगात जाणारदौलत साखर कारखाना चालवायला देण्याचा व्यवहार संशयास्पद आहे. यासाठीच आमचे पदाधिकारी राजेंद्र गड्यान्नावर यांनी जिल्हा बॅँकेच्या वार्षिक सभेत प्रश्न विचारला, तर त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. ‘दौलत’चीच केस घेऊन मी न्यायालयात जाणार असून गड्यान्नावर यांना धक्काबुक्की करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागेल, असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला. ...............काही लोकांना आम्ही काय करतोय याची शंकामी आणि सदाभाऊ नेमके कुठे आहोत आणि काय करतो आहोत याबद्दल काही लोकांना शंका आहे, असे सांगत शेट्टी यांनी गेल्या दोन वर्षांत पाठपुरावा केलेल्या प्रश्नांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांतील गुन्ह्यांचे आकडे बघा. ‘स्वाभिमानी’च्या कार्यक र्त्यांवरच अधिक गुन्हे दाखल आहेत. आम्ही रस्त्यांवर उतरलो की आम्हीच सरकार आणल्यानं ते लगेच निर्णय घेतंय. ‘सेझ’मधून, एमआयडीसीतून शेतकऱ्यांची जमीन वाचवली, मुंबईतील जेएनपीटी बंदरासाठी जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांना ११ टक्के भूखंड आम्ही मिळवून दिला. पोलिस अणि अधिकारी होण्याची वयोमर्यादा वाढवून घेतली. आम्ही कुणाच्या फायली घेऊन सरकारच्या तिजोरीवर दरोडे घालायला गेलो नाही. अजून आमच्या मिशीला कुणाचं खरकटं लागलं नाही, अशा शब्दांत शेट्टी यांनी विरोधकांचा समाचार घेतला. मराठा मोर्चाला पाठिंबामहाराष्ट्रातील मराठा समाजाचे आर्थिक दुखणे हे तोट्यातील शेतीमध्ये आहे. शिक्षणसम्राटांनी शिक्षण महाग केले असून, या समाजातील तळातील घटक दारिद्र्यातच खितपत पडला आहे. म्हणूनच मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले. ऊस परिषद २५ आॅक्टोबरला..ऊस परिषद जयसिंगपूर येथे २५ आॅक्टोबरला होणार असल्याचे यावेळी शेट्टी यांनी जाहीर केले. याच परिषदेत अपेक्षित दर जाहीर करण्यात येणार असून, प्रथेप्रमाणे मोठ्या संख्येने परिषदेला हजर राहण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले.