शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाह्यवळण रस्त्याला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रत्नागिरी ते नागपूर राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे, मलकापूर येथून जाणाºया तीन बाह्यवळण रस्त्याच्या जमीन अधिगृहणासाठी झालेल्या सर्वेक्षणाला पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील शेतकºयांनी मंगळवारी सुनावणीवेळी विरोध दर्शविला. या सर्वेक्षण केलेल्या बाह्यवळण रस्त्यामध्ये अनेक शेतकºयांच्या शेतजमिनी, घरे, विहिरी, नद्या, पूरक्षेत्र जमीन बाधित होत असल्याने यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रत्नागिरी ते नागपूर राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे, मलकापूर येथून जाणाºया तीन बाह्यवळण रस्त्याच्या जमीन अधिगृहणासाठी झालेल्या सर्वेक्षणाला पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील शेतकºयांनी मंगळवारी सुनावणीवेळी विरोध दर्शविला. या सर्वेक्षण केलेल्या बाह्यवळण रस्त्यामध्ये अनेक शेतकºयांच्या शेतजमिनी, घरे, विहिरी, नद्या, पूरक्षेत्र जमीन बाधित होत असल्याने यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, अशी मागणी करण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातून १२२ तर पन्हाळा तालुक्यातून ७४ हरकती प्राप्त झाल्या होत्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात मंगळवारी हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अरविंद लाटकर आणि राष्टÑीय महामार्ग आॅथॉरिटीचे अधिकारी यांच्यासमोर ही सुनावणी झाली. शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील ज्यांच्या जमिनी या महार्गामुळे बाधीत होणार आहेत असे सर्वच शेतकरी सुनावणीसाठी आल्याने सभागृह खचाखच भरले होते, या हरकतींवर सुनावणीवेळीअनेक शेतकºयांनी आपले म्हणणे मांडले.ससेगाव ते येलूर या बाह्यवळण मार्गाचे सर्वेक्षण झाले असले तरीही या मार्गामुळे ३ नद्या, शेतजमिनी, विहिरी, घरे, पूरबाधित क्षेत्र असल्याने त्याला करंजोशी ते ससेगाव ते कोपार्डे (ता. शाहूवाडी) या रस्त्याचा पर्याय शेतकºयांनी सुचविला. कारण पर्यायी रस्त्यामध्ये माळरान व गायरान जमीन असल्याने उदरनिर्वाहाचे साधन जात असल्याचे शेतकºयांनी सुनावणीवेळी सांगितले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली सुनावणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.बाधित शेतजमिनीला वाढीव मोबदला मिळावाया राष्टÑीय महामार्गासाठी शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतजमीन जाणार आहे. या जमिनी बागायत असल्याने शेतकºयांचे नुकसान होणार आहे. या बाधित होणाºया जमिनींना जमीन खरेदी-विक्रीचे नवीन दर ग्राह्य मानून त्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील (पेरिडकर) यांनी सुनावणीवेळी केली. या बाह्यवळण रस्त्यामध्ये आंबा, तळवडे, केर्ले, वारूळ, करंगुळे, वालूर, निळे, यलूर, पेरिड, जाधववाडी, कोपार्ड, नाळेवाडी, सनवाड, ससेगाव, बहिरेवाडी, सावे, गगवे, बांबवडे, डोनोली, चरण, खटाळवाडी, भडळे यांचा समावेश आहे.