शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

‘हिरण्यकेशी’च्या उपसाबंदीला विरोध

By admin | Updated: December 11, 2015 00:52 IST

किसान संघ : आंदोलनाचा इशारा; उपसा नियोजनाची मागणी

गडहिंग्लज : ११ डिसेंबरपासून हिरण्यकेशी नदीतील पाणी शेतीसाठी उपसण्यास पाटबंधारे खात्याने केलेल्या बंदीला भारतीय किसान संघाने तीव्र विरोध केला आहे. जानेवारीपर्यंत उपसा कालावधी वाढवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील उपअभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबर २०१५ मध्ये हिरण्यकेशी नदीतील पाण्याच्या नियोजनासंदर्भात किसान संघाचे शिष्टमंडळ उपअभियंत्यांना भेटले होते. त्यावेळी चर्चेसाठी पुन्हा बोलवू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत कोणताही निरोप मिळाला नाही. दरम्यान, अचानक ११ डिसेंबरपासून उपसा बंदीची सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील उभ्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हाताशी आलेला ऊस कारखान्याला सुस्थितीत घालविण्यासाठी जानेवारीपर्यंत उपसा कालावधी वाढवावा. जानेवारीनंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शिल्लक पाणीसाठा पाहून उपसा कालावधीचे नियोजन करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष बाळगोंड पाटील, राम पाटील, अजित नडगदल्ली, उमाशंकर मोहिते, सुनील कराळे, अशोक देशपांडे, गुरुराज हत्ती, अ‍ॅड. सत्यजित मोळदी, आदींचा समावेश होता. उपसाबंदी ३५ दिवसचित्री धरणात सध्या १३३४ एमसीएफटी पाणीसाठा आहे. त्यापैकी ३०० एमसीएफटी पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्याचा आदेश आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी जुलै २०१६ पर्यंत पुरावे यासाठी शेतीसाठी पाणी उपसण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज, शुक्रवारपासून १५ जानेवारी २०१६ अखेर ही उपसाबंदी कायम राहणार आहे.पूर्ण क्षमतेने वीज द्याउपसा काळात वीज यंत्रणा दुरुस्तीची व नूतनीकरणाची कामे काढू नयेत, तांत्रिक अडचण आल्यास वीजप्रवाह बंद ठेवलेला कालावधी वाढवून मिळावा आणि वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने व पूर्ण दाबाने मिळावा अशी मागणीदेखील किसान संघाने महावितरण कंपनीच्या येथील कार्यकारी अभियंत्याकडे निवेदनातून केली आहे.