शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

कृष्णाकाठावरून अमृत योजनेला विरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:40 IST

उदगाव : इचलकरंजीला पाणी देण्याविरोधात कोथळी येथे रविवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. कोथळी-हरिपूर संगमातून मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, असा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आला. रविवारी गाव बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोथळी (ता. शिरोळ) येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांमध्ये सकाळी अकराच्या सुमारास बैठकीस सुरुवात झाली. यावेळी संजय नांदणे ...

उदगाव : इचलकरंजीला पाणी देण्याविरोधात कोथळी येथे रविवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. कोथळी-हरिपूर संगमातून मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, असा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आला. रविवारी गाव बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोथळी (ता. शिरोळ) येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांमध्ये सकाळी अकराच्या सुमारास बैठकीस सुरुवात झाली. यावेळी संजय नांदणे म्हणाले, कोथळी हे क्रांतिकारकांचे गाव आहे. कृषी संपन्नता असलेले व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे चळवळीतील गाव आहे़ दानोळीनंतर कोथळीकरही ही योजना एकीच्या बळावर हाणून पाडतील, असे त्यांनी सांगितले.यावेळी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले, शासनाने अमृत योजना रद्द करण्याऐवजी तडजोडीचे धोरण स्वीकारले आहे़ त्यामुळे कृष्णा नदीतून काही झाले तरी मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी वारणा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, कोथळीजवळच्या संगमातूनच पाणी घेण्याचे अद्याप निश्चित नसतानाही अधिकारी येऊन पाहणी करतात, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे दानोळीप्रमाणेच कोथळीकरांच्या पाठीमागेही खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले.सावकार मादनाईक म्हणाले, पंचगंगेचे पाणी दूषित झाल्यामुळे हे पाणी पिण्याला तर सोडाच, शेतीलासुद्धा पाजायच्या लायकीचे राहिलेले नाही़ वारणेचे पाणी घेऊन पुन्हा वारणा दूषित करण्याचा डाव शासनाने आखला आहे. या योजनेच्या कामावर होणारा खर्च प्रशासनाने शुद्धिकरणासाठी खर्च करावा, असे त्यांनी सांगितले.बैठकीस पं. स. सदस्य राजगोंडा पाटील, सरपंच अमृता पाटील, उपसरपंच सागर पुजारी, धनगोंडा पाटील, देवगोंडा पाटील, बाहुबली इसराण्णा, दिलीप पाटील, सर्जेराव शिंदे, मानाजीराव भोसले, शीतल पाटील-धडेल, बापूसो दळवी, केशव राऊत, प्रसाद धर्माधिकारी, सतीश मलमे, विद्याधर कर्वे, विजय पाटील, सुकुमार नेजकर, भीमगोंडा बोरगावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ वृषभ पाटील यांनी आभार मानले.आरोग्याचा प्रश्न गंभीरकोथळी संगमावरून अमृत योजना नेली तर पुढील गावांना सांगलीच्या शेरी नाल्याचे पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहराबरोबरच दोन्ही बाजूच्या गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असून, पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठकीत सांगितले.बैठकीतील ठरावसंगमालगतच्या शेतजमिनी कोणीही योजनेसाठी देणार नाही.गावावर कोणतेही संकट आल्यास भोंगा वाजवून सूचना देणे.कोथळी हद्दीतून योजनेस विरोधाचा गावसभेत ठराव करणे.यापुढे चर्चा नाही, पाणीही नाही. त्यामुळे ही पहिली व शेवटची बैठक.