शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कृष्णाकाठावरून अमृत योजनेला विरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:40 IST

उदगाव : इचलकरंजीला पाणी देण्याविरोधात कोथळी येथे रविवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. कोथळी-हरिपूर संगमातून मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, असा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आला. रविवारी गाव बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोथळी (ता. शिरोळ) येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांमध्ये सकाळी अकराच्या सुमारास बैठकीस सुरुवात झाली. यावेळी संजय नांदणे ...

उदगाव : इचलकरंजीला पाणी देण्याविरोधात कोथळी येथे रविवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. कोथळी-हरिपूर संगमातून मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, असा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आला. रविवारी गाव बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोथळी (ता. शिरोळ) येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांमध्ये सकाळी अकराच्या सुमारास बैठकीस सुरुवात झाली. यावेळी संजय नांदणे म्हणाले, कोथळी हे क्रांतिकारकांचे गाव आहे. कृषी संपन्नता असलेले व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे चळवळीतील गाव आहे़ दानोळीनंतर कोथळीकरही ही योजना एकीच्या बळावर हाणून पाडतील, असे त्यांनी सांगितले.यावेळी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले, शासनाने अमृत योजना रद्द करण्याऐवजी तडजोडीचे धोरण स्वीकारले आहे़ त्यामुळे कृष्णा नदीतून काही झाले तरी मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी वारणा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, कोथळीजवळच्या संगमातूनच पाणी घेण्याचे अद्याप निश्चित नसतानाही अधिकारी येऊन पाहणी करतात, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे दानोळीप्रमाणेच कोथळीकरांच्या पाठीमागेही खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले.सावकार मादनाईक म्हणाले, पंचगंगेचे पाणी दूषित झाल्यामुळे हे पाणी पिण्याला तर सोडाच, शेतीलासुद्धा पाजायच्या लायकीचे राहिलेले नाही़ वारणेचे पाणी घेऊन पुन्हा वारणा दूषित करण्याचा डाव शासनाने आखला आहे. या योजनेच्या कामावर होणारा खर्च प्रशासनाने शुद्धिकरणासाठी खर्च करावा, असे त्यांनी सांगितले.बैठकीस पं. स. सदस्य राजगोंडा पाटील, सरपंच अमृता पाटील, उपसरपंच सागर पुजारी, धनगोंडा पाटील, देवगोंडा पाटील, बाहुबली इसराण्णा, दिलीप पाटील, सर्जेराव शिंदे, मानाजीराव भोसले, शीतल पाटील-धडेल, बापूसो दळवी, केशव राऊत, प्रसाद धर्माधिकारी, सतीश मलमे, विद्याधर कर्वे, विजय पाटील, सुकुमार नेजकर, भीमगोंडा बोरगावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ वृषभ पाटील यांनी आभार मानले.आरोग्याचा प्रश्न गंभीरकोथळी संगमावरून अमृत योजना नेली तर पुढील गावांना सांगलीच्या शेरी नाल्याचे पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहराबरोबरच दोन्ही बाजूच्या गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असून, पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठकीत सांगितले.बैठकीतील ठरावसंगमालगतच्या शेतजमिनी कोणीही योजनेसाठी देणार नाही.गावावर कोणतेही संकट आल्यास भोंगा वाजवून सूचना देणे.कोथळी हद्दीतून योजनेस विरोधाचा गावसभेत ठराव करणे.यापुढे चर्चा नाही, पाणीही नाही. त्यामुळे ही पहिली व शेवटची बैठक.