शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

विरोधक काहीही म्हणोत, ‘देश बदल रहा है।’

By admin | Updated: June 11, 2016 00:31 IST

चंद्रकांतदादा पाटील : कागल येथे विकासपर्व मेळावा; सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून निर्णय

कागल : केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर दोन्ही ठिकाणी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जात आहेत. देशाचे स्वरूप बदलत आहे. विरोधक काहीही म्हणोत, मात्र ‘देश बदल रहा है।’ हे सामान्य माणूसही मान्य करीत आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विविध योजना राबविल्या असून, राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना पाच लाख रुपये किंमत असणारे सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप देणार आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कागल येथे अयोजित विकासपर्व मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबा देसाई होते. यावेळी आ. सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संभाजीराव पाटील, परशुराम तावरे, अतुल जोशी, आदी प्रमुख उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार योजना असेल अथवा पाण्याचे आॅडिट असेल नैसर्गिक आपत्तीमध्ये संधी शोधून पाणलोट क्षेत्रात विकास केला आहे. कोणताही गाजावाजा न करता वीजनिर्र्मिती केली आहे. उत्पादन वाढविले आहे. महात्मा गांधी आरोग्य योजनेत ११00 विविध आजारांवर मोफत उपचार, तर बाळासाहेब ठाकरे अपघात योजनेत पहिले तीन दिवस शासन रुग्णांची काळजी घेणार आहे. आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.कागल शहराध्यक्ष अरुण सोनुले यांनी स्वागत, तर अतुल जोशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आ. सुरेश हाळवणकर म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी तीन कोटी महिलांना गॅस कनेक्शन दिली आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांशी सामान्य माणूस जोडून काळा पैसा, नकली नोटा यावर निर्बंध ठेवले जाणार आहेत. तालुकाध्यक्ष परपशुराम तावरे, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटनमंत्री बाबा देसाई यांची भाषणे झाली. तमनाकवाड्याचे सरपंच दत्ता चव्हाण यांनी आभार मानले.टीका टाळली...मेळाव्यात टीकाटिप्पणी होईल, असे वाटत होते. मात्र, मुश्रीफांवरील टीका टाळण्यात आली. आ. हाळवणकार यांनी सुरुवातीलाच सांगितले की, या मेळाव्यात मुद्दाम आलो नाही, तर मुश्रीफ यांना घाबरलो असे होईल, म्हणून आलो, तर चंद्रकांतदादांनी सांगितले की, कागल तालुक्यात भाजपला एवढी गर्दी बघून मला आनंद झाला आणि मला आनंद झाला की, मुश्रीफ यांच्या छातीत धडकी भरते, इतकीच टीकाटिप्पणी केली.सत्ता नसल्याने निधी देण्यात अडचण...चंद्रकांतदादा म्हणाले, ग्रामपंचायत काय, तर साध्या साध्या कोंबडी, बकरी संस्थांच्याही निवडणुका कार्यकर्र्त्यांनी लढविल्या पाहिजेत. केंद्रात, राज्यात सत्ता आहे; पण ग्रामपंचायती, नगरपालिका, पंचायती ताब्यात नसल्याने निधी देण्यात अडचणी आहेत. कारण काँग्रेसवाले ठराव देत नाहीत. कोल्हापूर महानगर पालिका, जिल्हा परिषद यांचे उदाहरण आहे. मला मोठा निधी द्यायचा आहे; पण ही मंडळी ठरावच देत नाहीत, असा आरोप केला.