शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आजरा कारखाना बिनविरोधला नेत्यांचा विरोधच

By admin | Updated: March 29, 2016 00:18 IST

गोंधळाचे वातावरण : आघाड्या बांधणीवरच ठरणार निवडणुकीतील यशापयश

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा काही मंडळी व्यक्त करीत असली तरी प्रमुख नेतेमंडळींचाच बिनविरोधला विरोध असल्याने आता आघाड्यांच्या बांधणीवरच निवडणुकीतील यशापयश ठरणार, हे स्पष्ट होत आहे.गडहिंग्लज साखर कारखान्याची रणधुमाळी आता शांत झाली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह नेतेमंडळींचे लक्ष आजरा साखर कारखान्याकडे केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँगे्रस हे एकत्र राहणार हे स्पष्टच आहे, तर प्रबळ विरोधक म्हणून अशोक चराटी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना-भाजप असे चित्र पहिल्या टप्प्यात दिसत आहे. कदाचित यामध्ये बदलही होऊ शकतो.अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांचे चाचपणी मेळावे पार पडले. यामध्ये केवळ अंजनातार्इंनी बिनविरोधबाबत भाष्य केले, तर अशोकअण्णा यांच्या मेळाव्यात बिनविरोध नकोच, चांगल्या कार्यकर्त्यांना त्यामुळे संधी मिळत नाही, अशी उघड भूमिका जिल्हा दूध संघाचे संचालक रवींद्र आपटे यांनी घेऊन बिनविरोधचा ‘चराटी’ यांच्या गटाकडून मुद्दा निकालात काढला आहे.सत्तारूढ मंडळींमध्ये आता एकंदर परिस्थिती पाहिली तर मनोमिलन होणे अशक्य आहे. याशिवाय जिल्हा बँक, जनता बँक, तालुका खरेदी-विक्री संघ निवडणुकीतही अनेकांना ‘कारखान्याचे’ गाजर दाखवून त्या-त्यावेळी शांत केले आहे. अशी मंडळीही बिनविरोध हा प्रकार बाजूला ठेवण्याच्या सूचना नेत्यांना करू लागली आहेत. बिनविरोधच्या नादात कार्यकर्ते दुखावण्याचा धोकाही समोर आहे.कारखाना निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असली तरी ती विरोधकांना बंधनकारक निश्चितच असणार नाही. सध्या असणाऱ्या गटामध्ये जयवंतराव शिंपी, भाजप, श्रमिक मुक्ती दल यांनाही बऱ्यापैकी प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे.सगळेच गोंधळाचे वातावरण असल्याने बिनविरोधी केवळ चर्चाच राहील आणि उमेदवारांची संख्या मात्र विक्रमी असेल, असेच दिसत आहे.