शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

आजरा कारखाना बिनविरोधला नेत्यांचा विरोधच

By admin | Updated: March 29, 2016 00:18 IST

गोंधळाचे वातावरण : आघाड्या बांधणीवरच ठरणार निवडणुकीतील यशापयश

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा काही मंडळी व्यक्त करीत असली तरी प्रमुख नेतेमंडळींचाच बिनविरोधला विरोध असल्याने आता आघाड्यांच्या बांधणीवरच निवडणुकीतील यशापयश ठरणार, हे स्पष्ट होत आहे.गडहिंग्लज साखर कारखान्याची रणधुमाळी आता शांत झाली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह नेतेमंडळींचे लक्ष आजरा साखर कारखान्याकडे केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँगे्रस हे एकत्र राहणार हे स्पष्टच आहे, तर प्रबळ विरोधक म्हणून अशोक चराटी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना-भाजप असे चित्र पहिल्या टप्प्यात दिसत आहे. कदाचित यामध्ये बदलही होऊ शकतो.अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांचे चाचपणी मेळावे पार पडले. यामध्ये केवळ अंजनातार्इंनी बिनविरोधबाबत भाष्य केले, तर अशोकअण्णा यांच्या मेळाव्यात बिनविरोध नकोच, चांगल्या कार्यकर्त्यांना त्यामुळे संधी मिळत नाही, अशी उघड भूमिका जिल्हा दूध संघाचे संचालक रवींद्र आपटे यांनी घेऊन बिनविरोधचा ‘चराटी’ यांच्या गटाकडून मुद्दा निकालात काढला आहे.सत्तारूढ मंडळींमध्ये आता एकंदर परिस्थिती पाहिली तर मनोमिलन होणे अशक्य आहे. याशिवाय जिल्हा बँक, जनता बँक, तालुका खरेदी-विक्री संघ निवडणुकीतही अनेकांना ‘कारखान्याचे’ गाजर दाखवून त्या-त्यावेळी शांत केले आहे. अशी मंडळीही बिनविरोध हा प्रकार बाजूला ठेवण्याच्या सूचना नेत्यांना करू लागली आहेत. बिनविरोधच्या नादात कार्यकर्ते दुखावण्याचा धोकाही समोर आहे.कारखाना निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असली तरी ती विरोधकांना बंधनकारक निश्चितच असणार नाही. सध्या असणाऱ्या गटामध्ये जयवंतराव शिंपी, भाजप, श्रमिक मुक्ती दल यांनाही बऱ्यापैकी प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे.सगळेच गोंधळाचे वातावरण असल्याने बिनविरोधी केवळ चर्चाच राहील आणि उमेदवारांची संख्या मात्र विक्रमी असेल, असेच दिसत आहे.