शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

शिवाजी पूल वाहतुकीस खुला

By admin | Updated: August 11, 2016 00:30 IST

पूर ओसरला : अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर निर्णय; नागरिकांना दिलासा

कोल्हापूर : पुराचे पाणी कमी झाल्याने गेले सहा दिवस बंद असणारा शिवाजी पूल बुधवारी सायंकाळी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याबाबतचे आदेश देण्यात आल्याने दूरच्या अंतराची वाहतूक करून शहरात याव्या लागणाऱ्या ग्रामीण जनतेला दिलासा मिळाला.पंचगंगा नदीच्या पुरामुळे पाणीपातळी वाढल्याने ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी दक्षता म्हणून शिवाजी पूल गुरुवारी (दि. ४) रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही दक्षता घेतली होती. यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद राहिली होती. मंगळवारी (दि. ९) सकाळपासून पावसाने उसंत दिल्यानंतर पुराचे पाणी ओसरू लागले. त्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केल्याने प्रशासनाने किमान दुचाकी वाहतुकीसाठी पूल खुला केला होता. बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर त्यांनी शिवाजी पुलावरून वाहतूक सुरू करण्यास हरकत नसल्याचे पत्र दुपारी जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाकडे दिले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे या पुलावर असणारा पोलिस बंदोबस्त काढण्यात आला. सायंकाळनंतर या पुलावरून अवजडसह सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाल्याने ग्रामीण जनतेने नि:श्वास सोडला. पुलावर रोज ३० हजार टनांचा भारशिवाजी पुलाला १३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुलाची लांबी ४३२ फूट आहे. पुलाची उंची ६९ फूट, रोज १० हजार (पी.सी.यू.) अर्थात पॅसेंजर कार युनिट म्हणजेच दहा हजारांहून अधिक वाहनांची ये-जा या मार्गावरून होते. यात दुचाकींची संख्या लक्षणीय, तर वाळू वाहतूक, बॉक्साईट वाहतूक, मत्स्य वाहतूक, मालवाहतूक, एस. टी. बस, खासगी आरामबस अशा अवजड वाहनांची संख्याही किमान दोन ते तीन हजारांहून अधिक आहे. यासह चारचाकी, ट्रॅक्टर, जेसीबी, टँकर यांचाही राबता वेगळा आहे. या पुलावरून रोजचा भार सर्वसाधारणपणे ३० हजार टन इतका आहे. १९७८ साली या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांनी दिली.सकाळी पुलाची पाहणीबुधवारी पुराचे पाणी आणखी खाली गेल्यानंतर सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता आर. के. बामणे, उपअभियंता व्ही. जी. गुळवणी आणि सहायक अभियंता अबदार रावसो या तिघा अधिकाऱ्यांनी संपूर्ण पुलाची पाहणी केली. कोणताही धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर वाहतुकीसाठी पूल खुला करण्यास हरकत नसल्याचे े पत्र जिल्हा प्रशासनास दिले.