शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पूल वाहतुकीस खुला

By admin | Updated: August 11, 2016 00:30 IST

पूर ओसरला : अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर निर्णय; नागरिकांना दिलासा

कोल्हापूर : पुराचे पाणी कमी झाल्याने गेले सहा दिवस बंद असणारा शिवाजी पूल बुधवारी सायंकाळी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याबाबतचे आदेश देण्यात आल्याने दूरच्या अंतराची वाहतूक करून शहरात याव्या लागणाऱ्या ग्रामीण जनतेला दिलासा मिळाला.पंचगंगा नदीच्या पुरामुळे पाणीपातळी वाढल्याने ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी दक्षता म्हणून शिवाजी पूल गुरुवारी (दि. ४) रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही दक्षता घेतली होती. यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद राहिली होती. मंगळवारी (दि. ९) सकाळपासून पावसाने उसंत दिल्यानंतर पुराचे पाणी ओसरू लागले. त्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केल्याने प्रशासनाने किमान दुचाकी वाहतुकीसाठी पूल खुला केला होता. बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर त्यांनी शिवाजी पुलावरून वाहतूक सुरू करण्यास हरकत नसल्याचे पत्र दुपारी जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाकडे दिले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे या पुलावर असणारा पोलिस बंदोबस्त काढण्यात आला. सायंकाळनंतर या पुलावरून अवजडसह सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाल्याने ग्रामीण जनतेने नि:श्वास सोडला. पुलावर रोज ३० हजार टनांचा भारशिवाजी पुलाला १३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुलाची लांबी ४३२ फूट आहे. पुलाची उंची ६९ फूट, रोज १० हजार (पी.सी.यू.) अर्थात पॅसेंजर कार युनिट म्हणजेच दहा हजारांहून अधिक वाहनांची ये-जा या मार्गावरून होते. यात दुचाकींची संख्या लक्षणीय, तर वाळू वाहतूक, बॉक्साईट वाहतूक, मत्स्य वाहतूक, मालवाहतूक, एस. टी. बस, खासगी आरामबस अशा अवजड वाहनांची संख्याही किमान दोन ते तीन हजारांहून अधिक आहे. यासह चारचाकी, ट्रॅक्टर, जेसीबी, टँकर यांचाही राबता वेगळा आहे. या पुलावरून रोजचा भार सर्वसाधारणपणे ३० हजार टन इतका आहे. १९७८ साली या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांनी दिली.सकाळी पुलाची पाहणीबुधवारी पुराचे पाणी आणखी खाली गेल्यानंतर सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता आर. के. बामणे, उपअभियंता व्ही. जी. गुळवणी आणि सहायक अभियंता अबदार रावसो या तिघा अधिकाऱ्यांनी संपूर्ण पुलाची पाहणी केली. कोणताही धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर वाहतुकीसाठी पूल खुला करण्यास हरकत नसल्याचे े पत्र जिल्हा प्रशासनास दिले.