शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:01 IST

कोल्हापूर : गेल्या सात वर्षांपासून खंडित असलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग आता खुला झाला आहे. रविवारी दुपारी मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे ‘एअर डेक्कन’चे चार्टर विमान दाखल झाले. त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. वॉटर शॉवर (पाण्याचे फवारे)ने सलामी देऊन या विमानाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. २० ते २२ एप्रिल दरम्यान विमानसेवेचे रीतसर ...

कोल्हापूर : गेल्या सात वर्षांपासून खंडित असलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग आता खुला झाला आहे. रविवारी दुपारी मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे ‘एअर डेक्कन’चे चार्टर विमान दाखल झाले. त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. वॉटर शॉवर (पाण्याचे फवारे)ने सलामी देऊन या विमानाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. २० ते २२ एप्रिल दरम्यान विमानसेवेचे रीतसर उद्घाटन होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.बहुप्रतीक्षित कोल्हापूर-मुंबई विमानसेवा केव्हा सुरू होते, याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष होते. यासाठी खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे यांचा दिल्लीदरबारी पाठपुरावा सुरू होता. त्याला यश येऊन या विमानसेवेचा मार्ग खुला झाला आहे. याच्या चाचणीसाठी रविवारी दुपारी तीन वाजता उजळाईवाडीच्या कोल्हापूर विमानतळावर ‘एअर डेक्कन’चे अठरा आसनी चार्टर विमान दाखल झाले. धावपट्टीवर दोन्ही बाजूंना स्वागतास सज्ज असलेल्या अग्निशमन बंबांतून पाण्याच्या फवाऱ्याने सलामी देऊन या विमानाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी विमानातून आलेले भारतीय विमानतळ प्राधिकरणचे सिव्हिल मॅनेजर राजेश अय्यर, फेस्ट आॅफिसर नवीन के., पश्चिम विभागाचे इंजिनिअरिंंग जनरल मॅनेजर एस. के. व्यवहारे, एअर डेक्कनच्या केबिन क्रू उमा पांडे, कॅप्टन अ‍ॅँड्री व्ही. यांचे खासदार महाडिक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळाच्या व्यवस्थापिका पूजा मूल, कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर सेठ, गोकुळ दूध संघाचे संचालक रामराज कुपेकर, इंद्रजित जाधव, आदी प्रमुख उपस्थित होते.विमान उड्डाणाची चाचणी यशस्वी होऊन दुपारी चारच्या सुमारास या विमानाने पुन्हा मुंबईकडे उड्डाण केले. आणखी पुढील चार दिवस ही चाचणी सुरू राहणार आहे.खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूरची विमानसेवा २०११ पासून बंद झाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण कोल्हापूरची विमानसेवा लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्या चार वर्षांत आपण पाठपुरावा सुरू ठेवला. त्याचबरोबर केंद्रीय विमान उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे यासाठी प्रयत्न केले. यावर प्रभू यांनी ‘एअर डेक्कन’ला यासंबंधी सूचना दिल्या. त्यानुसार विमान उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. आणखी चार दिवस ही चाचणी सुरू राहून त्यानंतर रीतसर विमानसेवा सुरू होईल. २२ एप्रिलला या विमानसेवेचे रीतसर उद्घाटन होईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्'ातील खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले जाईल. तसेच केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनाही निमंत्रित केले जाणार आहे.सहा महिन्यांचे तिकीट भाडे भरतो; पण विमान सुरू ठेवाकोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत होते की नाही, याबद्दल येथील प्रवाशांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे आर्थिक बाबीची चिंता न करता ‘एअर डेक्कन’ने ही सेवा सुरळीत ठेवावी. आवश्यकता वाटल्यास सहा महिन्यांच्या तिकिटांचे भाडे आपण भरू; पण ही सेवा कायम सुरू राहावी, याची हमी आपण विमान प्राधिकरणाला दिली आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.