शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

शेट्टी-कोरे समेटाची नुसतीच हवा

By admin | Updated: September 3, 2014 00:14 IST

शाहूवाडीचे राजकारण : भारतअप्पाही लढणार

कोल्हापूर : शाहूवाडी मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेऊन आमदार विनय कोरे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारतअप्पा पाटील यांच्यात समेट घडवून आणल्याची हवा गेल्या काही दिवसांत शाहूवाडी तालुक्यात व वारणा खोऱ्यात पसरली आहे. असा कोणताही प्रकार झाला नसून, २३ आॅगस्टला मी अमेरिकेला गेलो होतो, आजच भारतात आल्याने ही भेट झाली केव्हा आणि समेट तरी कसा झाला, अशी विचारणा स्वत: खासदार शेट्टी यांनीच केली आहे. दुसऱ्या बाजूला निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे भारतअप्पा पाटील यांनीही जाहीर केले. संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी नव्याने गावोगावी डिजीटल लावून विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.आमदार विनय कोरे हे नुसते राजू शेट्टी यांचेच राजकीय शत्रू नसून ते ऊस आंदोलनाच्या चळवळीचेही शत्रू आहेत. अशा नेत्यांशी एका निवडणुकीत नव्हे, तर उभ्या आयुष्यात कधीच आपला समेट होणार नसल्याची प्रतिक्रिया खासदार शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.ते म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत मी दोन माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांची जपणूक मनापासून केली. त्यामध्ये एक शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील व दुसरे शिराळ््याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक. त्यामुळे त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत आपल्याला सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा बाळगण्यात गैर नाही. अफवा... कार्यकर्त्याकर्त्याकडून विचारणाशाहूवाडी मतदारसंघातील लढत निवडणुकीपूर्वीच गाजू लागली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून सत्यजित पाटील यांना कामाला लागा असा आदेश दिला आहे. त्यांच्या उमेदवारीस खासदार शेट्टी यांचा विरोध आहे. स्वाभिमानीला ही जागा आपल्याला हवी आहे, त्यांच्याकडून सदाभाऊ खोत व भारतअप्पा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. आमदार कोरे स्वत: जनसुराज्य पक्षातून रिंगणात उतरणार आहेत. त्याशिवाय काँग्रेसचाही उमेदवार रिंगणात असेल. परंतु सध्यातरी कोरे-सत्यजित पाटील व भारतअप्पा यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. भारतअप्पा यांनी या निवडणुकीत माघार घेऊन सावकरांना मदत करावी यासाठी कोरे गटाकडून दबाव आहे. त्यास भारतअप्पा तयार नसल्याने सत्यजित यांना पुढे करून कोरे-शेट्टी व भारतअप्पा यांच्यात समेट झाल्याची हवा मतदारसंघात उठवून देण्यात आली आहे. स्वत: शेट्टी यांनाही मतदारसंघातून त्यासंबंधी आज कार्यकर्त्यांकडून विचारणा झाली.