शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

शेट्टी-कोरे समेटाची नुसतीच हवा

By admin | Updated: September 3, 2014 00:14 IST

शाहूवाडीचे राजकारण : भारतअप्पाही लढणार

कोल्हापूर : शाहूवाडी मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेऊन आमदार विनय कोरे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारतअप्पा पाटील यांच्यात समेट घडवून आणल्याची हवा गेल्या काही दिवसांत शाहूवाडी तालुक्यात व वारणा खोऱ्यात पसरली आहे. असा कोणताही प्रकार झाला नसून, २३ आॅगस्टला मी अमेरिकेला गेलो होतो, आजच भारतात आल्याने ही भेट झाली केव्हा आणि समेट तरी कसा झाला, अशी विचारणा स्वत: खासदार शेट्टी यांनीच केली आहे. दुसऱ्या बाजूला निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे भारतअप्पा पाटील यांनीही जाहीर केले. संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी नव्याने गावोगावी डिजीटल लावून विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.आमदार विनय कोरे हे नुसते राजू शेट्टी यांचेच राजकीय शत्रू नसून ते ऊस आंदोलनाच्या चळवळीचेही शत्रू आहेत. अशा नेत्यांशी एका निवडणुकीत नव्हे, तर उभ्या आयुष्यात कधीच आपला समेट होणार नसल्याची प्रतिक्रिया खासदार शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.ते म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत मी दोन माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांची जपणूक मनापासून केली. त्यामध्ये एक शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील व दुसरे शिराळ््याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक. त्यामुळे त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत आपल्याला सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा बाळगण्यात गैर नाही. अफवा... कार्यकर्त्याकर्त्याकडून विचारणाशाहूवाडी मतदारसंघातील लढत निवडणुकीपूर्वीच गाजू लागली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून सत्यजित पाटील यांना कामाला लागा असा आदेश दिला आहे. त्यांच्या उमेदवारीस खासदार शेट्टी यांचा विरोध आहे. स्वाभिमानीला ही जागा आपल्याला हवी आहे, त्यांच्याकडून सदाभाऊ खोत व भारतअप्पा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. आमदार कोरे स्वत: जनसुराज्य पक्षातून रिंगणात उतरणार आहेत. त्याशिवाय काँग्रेसचाही उमेदवार रिंगणात असेल. परंतु सध्यातरी कोरे-सत्यजित पाटील व भारतअप्पा यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. भारतअप्पा यांनी या निवडणुकीत माघार घेऊन सावकरांना मदत करावी यासाठी कोरे गटाकडून दबाव आहे. त्यास भारतअप्पा तयार नसल्याने सत्यजित यांना पुढे करून कोरे-शेट्टी व भारतअप्पा यांच्यात समेट झाल्याची हवा मतदारसंघात उठवून देण्यात आली आहे. स्वत: शेट्टी यांनाही मतदारसंघातून त्यासंबंधी आज कार्यकर्त्यांकडून विचारणा झाली.