शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

अवघ्या तीन खोल्यांमध्ये नांदतंय १८ जणांचं कुटुंब

By admin | Updated: January 19, 2016 23:37 IST

आजी-नातवंडं-परतवंडं एकत्रच : परस्परांचा मानसिक आधार दूर-दूर पळवतोय येणारी संकटं--बिग फॅमिली

प्रगती जाधव-पाटील -- सातारा  -घरात एखादं कार्य असो, सणवार असो किंवा उन्हाळी कामं. महिलांबरोबरच बच्चे कंपनीचा हातभार लागतोच. घरातली कामे असोत व मुलांची जबाबदारी. सर्वांनीच वाटून घेतल्यामुळे घरातील कोणा एकावर त्याचा ताण येत नाही. अवघ्या तीन खोल्यांमध्ये राहणाऱ्या १८ जणांमध्ये दातृत्वाची प्रवृत्ती सर्वाधिक दिसते.येथील पंताच्या गोटात जगन्नाथ बाबूराव बाबर आणि जानकी बाबर यांच्या संसाराला सुरुवात झाली. खिंडवाडी गावातील या कुटुंबांची कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथे चांगली शेतजमीन आहे. त्यांना योजना, दिलीप, हरिविजय, सागर, योगीता अशी पाच मुलं. यातील योजना यांचा विवाह बाबर यांच्या बहिणीच्या मुलाशी झाला. त्या मल्हारपेठेत राहतात. तर योगीता विवाहानंतर सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात स्थायिक झाल्या. जगन्नाथ बाबर यांचा मोठा मुलगा दिलीप पत्नी वसुंधरा यांच्याबरोबर ल्हासुर्णे येथील शेती पाहतात. त्यांची दोन मुलं प्रतीक आणि सिद्धी शिक्षणासाठी साताऱ्यातच राहतात.बाबर यांचा दुसरा मुलगा हरिविजय पत्नी हर्षल आणि मुलं रिद्धी, प्रथमेश आणि अभिषेक यांच्यासमेवत साताऱ्यात राहतात. ते पवनचक्की देखभालीची कामे पाहतात. त्यांची मुलगी रिद्धी हिचा विवाह राजेवाडी येथील प्रवीण भोसले यांच्याबरोबर झाला आहे. बाळंतपणासाठी ती सध्या माहेरी आहे.शेंडेफळ असणारे सागर पत्नी सरिता, संदेश व सुदेश या मुलांसह येथेच राहतात. सागर एका खासगी कारखान्यात नोकरीस आहेत. हजार स्क्वेअर फूट घरातही जिथं मुलांना अभ्यासाला एकांत मिळत नाही, अशी ओरड असते; मात्र तीन खोल्यांत १८ जणांमध्ये राहून बाबर यांच्या नातवंडांनी पदवी संपादन केली आहे. प्रत्येकाला एकमेकाचा आधार वाटत आहे.घरातील अठरा माणसांबरोबरच येणारे पाहुणे आणि त्यांची सरबराई करण्यातच या घरातील महिलांचा मोठा वेळ जातो. पहाटे साडेपाच वाजता उठलेले हे घर रात्री अकरापर्यंत झोपी जाते. १७ जणांच्या बाबर कुटुंबीयांना एका महिन्याला एक तेलाचा डबा लागतो. २५ किलो साखर, २५ किलो तांदूळ, ३० किलो गहू, ३० किलो ज्वारी, चार किलो पोहे, ३ किलो रवा, २ किलो गूळ, ४ किलो तूरडाळ, ३ किलो शेंगदाणे, १ किलो शाबुदाणा, दीड किलो चहा पावडर, ५ किलो हरभरा डाळ, ३ सिलिंडर लागतात. अंघोळीचे पाणी बंबात तापविण्यात येते. त्यासाठी ५ मण लाकूड लागते. एका वेळी एक किलोची फळभाजी व ३ पेंड्या पालेभाजी करावी लागते.संकटांची कधीच काळजी नाहीआपल्या कुटुंबाविषयी बोलताना बाबर म्हणतात, ‘आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे आम्हाला कधीच कोणत्या संकटाची काळजी वाटली नाही. गावात आणि समाजातही आमच्या एकीचे कौतुक केले जाते. हीच परंपरा पुढची पिढीही चालवणार आहे. नातवंडं अंगा, खांद्यावर खेळवून आमच्या आयुष्याचे सार्थक झाले आहे.