शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तीन खोल्यांमध्ये नांदतंय १८ जणांचं कुटुंब

By admin | Updated: January 19, 2016 23:37 IST

आजी-नातवंडं-परतवंडं एकत्रच : परस्परांचा मानसिक आधार दूर-दूर पळवतोय येणारी संकटं--बिग फॅमिली

प्रगती जाधव-पाटील -- सातारा  -घरात एखादं कार्य असो, सणवार असो किंवा उन्हाळी कामं. महिलांबरोबरच बच्चे कंपनीचा हातभार लागतोच. घरातली कामे असोत व मुलांची जबाबदारी. सर्वांनीच वाटून घेतल्यामुळे घरातील कोणा एकावर त्याचा ताण येत नाही. अवघ्या तीन खोल्यांमध्ये राहणाऱ्या १८ जणांमध्ये दातृत्वाची प्रवृत्ती सर्वाधिक दिसते.येथील पंताच्या गोटात जगन्नाथ बाबूराव बाबर आणि जानकी बाबर यांच्या संसाराला सुरुवात झाली. खिंडवाडी गावातील या कुटुंबांची कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथे चांगली शेतजमीन आहे. त्यांना योजना, दिलीप, हरिविजय, सागर, योगीता अशी पाच मुलं. यातील योजना यांचा विवाह बाबर यांच्या बहिणीच्या मुलाशी झाला. त्या मल्हारपेठेत राहतात. तर योगीता विवाहानंतर सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात स्थायिक झाल्या. जगन्नाथ बाबर यांचा मोठा मुलगा दिलीप पत्नी वसुंधरा यांच्याबरोबर ल्हासुर्णे येथील शेती पाहतात. त्यांची दोन मुलं प्रतीक आणि सिद्धी शिक्षणासाठी साताऱ्यातच राहतात.बाबर यांचा दुसरा मुलगा हरिविजय पत्नी हर्षल आणि मुलं रिद्धी, प्रथमेश आणि अभिषेक यांच्यासमेवत साताऱ्यात राहतात. ते पवनचक्की देखभालीची कामे पाहतात. त्यांची मुलगी रिद्धी हिचा विवाह राजेवाडी येथील प्रवीण भोसले यांच्याबरोबर झाला आहे. बाळंतपणासाठी ती सध्या माहेरी आहे.शेंडेफळ असणारे सागर पत्नी सरिता, संदेश व सुदेश या मुलांसह येथेच राहतात. सागर एका खासगी कारखान्यात नोकरीस आहेत. हजार स्क्वेअर फूट घरातही जिथं मुलांना अभ्यासाला एकांत मिळत नाही, अशी ओरड असते; मात्र तीन खोल्यांत १८ जणांमध्ये राहून बाबर यांच्या नातवंडांनी पदवी संपादन केली आहे. प्रत्येकाला एकमेकाचा आधार वाटत आहे.घरातील अठरा माणसांबरोबरच येणारे पाहुणे आणि त्यांची सरबराई करण्यातच या घरातील महिलांचा मोठा वेळ जातो. पहाटे साडेपाच वाजता उठलेले हे घर रात्री अकरापर्यंत झोपी जाते. १७ जणांच्या बाबर कुटुंबीयांना एका महिन्याला एक तेलाचा डबा लागतो. २५ किलो साखर, २५ किलो तांदूळ, ३० किलो गहू, ३० किलो ज्वारी, चार किलो पोहे, ३ किलो रवा, २ किलो गूळ, ४ किलो तूरडाळ, ३ किलो शेंगदाणे, १ किलो शाबुदाणा, दीड किलो चहा पावडर, ५ किलो हरभरा डाळ, ३ सिलिंडर लागतात. अंघोळीचे पाणी बंबात तापविण्यात येते. त्यासाठी ५ मण लाकूड लागते. एका वेळी एक किलोची फळभाजी व ३ पेंड्या पालेभाजी करावी लागते.संकटांची कधीच काळजी नाहीआपल्या कुटुंबाविषयी बोलताना बाबर म्हणतात, ‘आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे आम्हाला कधीच कोणत्या संकटाची काळजी वाटली नाही. गावात आणि समाजातही आमच्या एकीचे कौतुक केले जाते. हीच परंपरा पुढची पिढीही चालवणार आहे. नातवंडं अंगा, खांद्यावर खेळवून आमच्या आयुष्याचे सार्थक झाले आहे.