शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

...तरच संविधानाला अभिप्रेत सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 00:53 IST

यशवंत मनोहर : गवळी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरव

कोल्हापूर : जात, धर्म हे अहिताचे असून, या भिंती तोडायला हव्यात. आपल्यातील अविश्वास बाजूला सारून परिवर्तनवादी, अल्पसंख्याक एकत्र आल्यास संविधानाला अभिप्रेत असलेली सत्ता देशात राबविली जाईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. कोल्हापूर येथील आबाजी सुबराव आणि आकुताई आबाजी गवळी प्रतिष्ठानतर्फे डॉ. मनोहर यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मंगळवारी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एन. बी. ताठे होते.डॉ. मनोहर म्हणाले, जात, धर्म आपल्याला सत्तेच्या परिघाबाहेर ठेवतो. अल्पसंख्याक जोपर्यंत बहुसंख्य होत नाहीत, तोवर त्यांच्या हाती सत्ता येणे शक्य नाही. जुन्या नोटा जशा बदलल्या, तशी आपली मने बदलून एकत्र या. एकमेकांबद्दल असलेला अविश्वास बाजूला ठेवा. जुन्या मनाचं, संस्काराचं चलन बदलून नवी मूल्ये डोक्यात गेली पाहिजेत. संविधान ज्यांच्या हितासाठी बनले आहे, त्यांना ही जाती, धर्माची बंधने सत्तेपासून दूर ठेवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे गुलाम होते त्यांना मालक बनविण्यासाठी संविधानाची निर्मिती केली; परंतु ते ज्यांच्यासाठी बनले आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे का ते पाहणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बौद्धिक महत्ता जगाच्या पाठीवर पटली आहे. त्यांच्या मानवी जीवनाच्या पुनर्रचनेच्या सिद्धांताचा जगातील अनेक देश अभ्यास करीत आहेत. अशा स्थितीत त्यांना आपण जयंती, उत्सव, नामगजर यापलीकडे जाऊन समजून घ्यायला हवे. माणुसकीची उंची वाढविण्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करायला हवा. साहित्याविषयी डॉ. मनोहर म्हणाले, ‘नव्या पिढीच्या साहित्यिकांनी जात, धर्म यापलीकडे जाऊन साहित्यनिर्मिती करावी. आपल्या डोक्यात सरंजामशाहीचा कैफ भरलेला आहे. तो आपल्याला ना धड माणूस होऊ देतो, ना धड साहित्यिक. देश, धर्म, जात या मर्यादा ओलांडून जो पुढे जातो, तो माणूस होतो. निर्मितीची शक्ती माणसाला निरामय, नितळ माणुसकीच्या पातळीवर घेऊन जाते. लेखक ज्या बिंदूवर साहित्यनिर्मिती करतो, त्याच बिंदूवर वाचक त्याच्याशी एकजीव होतो, असे साहित्य माणसाचे उन्नयन करते.’कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, आई-वडिलांच्याप्रती कृतज्ञ राहणे प्रत्येक पाल्याची जबाबदारी असते. आयुष्याच्या वाटचालीत संस्काराची बीजे रूजविण्यात पालक महत्त्वाचे असतात. ती आपल्या जीवनातील ऊर्जाकेंद्रे असतात. गवळी प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य आहे. प्राचार्य टी. ए. गवळी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश कुंभार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. प्रसेनजित गवळी यांनी मानपत्राचे वाचन केले. (प्रतिनिधी) डॉ. मनोहर म्हणाले,जात, धर्म, भाषा यांच्या पल्याड जाऊन नागरिकांमध्ये भातृभाव निर्माण करणे, तो वाढीस लावणे शासनाचे कर्तव्य संविधान हे धर्मनिरपेक्ष ; त्यास कोणत्याही एका धर्माचे नाव देता कामा नये अन्यथा देशाच्या असंख्य फाळण्या होतीलमहाराष्ट्रातील मराठा, ओबीसी अशा जातींच्या मोर्चाला प्रोत्साहन देणारी गुप्त यंत्रणा असावी काय? असा प्रश्न पडायला हवा.