शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पंतप्रधानच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : संसदेत घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे आता निश्चित आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : संसदेत घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे आता निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणले तर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. मात्र ते आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, ती करावी, असे आवाहन शाहू छत्रपती यांनी केले.

शाहू छत्रपती म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार परवा भेटले, त्यांनीही राज्य सरकारच्या पातळीवरील प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकार आपल्यासोबत आहे, याबाबत आपणाला शंका वाटत नाही. तरीही मराठा आरक्षणासाठी खूप लढाई झाली, आता महाराष्ट्राने एकजुटीने पुढे गेले पाहिजे. पुनर्विचार याचिका दाखल करायला हरकत नाही, मात्र ही प्रक्रिया दीर्घ काळ आहे, त्यातून यश मिळेल असे नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

कोणाचे आरक्षण कमी करून आम्हाला नको आहे, त्यामुळेच आम्ही ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण करून घेतले पाहिजे. केंद्र सरकारने मनावर घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. संसदेत दोन तृतीयांश खासदारांपेक्षा अधिक संख्याबळ नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सकारात्मक आहेत, पंतप्रधान मोदी भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यांनी ती केली पाहिजे.

शिक्षण संस्था, साखर कारखानदारीत आपण पुढे आहे. उद्योगातही पुढे गेले पाहिजे. स्वत: मजबूत नसलो तर समाज मजबूत करता येणार नाही. मराठा समाज कमजोर आहे, असे समजू नका. मोठी ताकद आहे, ती दिल्लीपर्यंत दाखवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही शाहू छत्रपती यांनी केले.

आंदोलन संयमाचे व सर्वांना घेऊन जाणारे असावे

कोणत्याही प्रश्नांवरील आंदोलन हे संयमाचे, शांततेत व सर्वांना सोबत घेऊन जाणारे असावे. असे आपण खासदार संभाजीराजे यांना सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केल्याचे कौतुक वाटते, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले.