शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

पंतप्रधानच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : संसदेत घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे आता निश्चित आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : संसदेत घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे आता निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणले तर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. मात्र ते आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, ती करावी, असे आवाहन शाहू छत्रपती यांनी केले.

शाहू छत्रपती म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार परवा भेटले, त्यांनीही राज्य सरकारच्या पातळीवरील प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकार आपल्यासोबत आहे, याबाबत आपणाला शंका वाटत नाही. तरीही मराठा आरक्षणासाठी खूप लढाई झाली, आता महाराष्ट्राने एकजुटीने पुढे गेले पाहिजे. पुनर्विचार याचिका दाखल करायला हरकत नाही, मात्र ही प्रक्रिया दीर्घ काळ आहे, त्यातून यश मिळेल असे नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

कोणाचे आरक्षण कमी करून आम्हाला नको आहे, त्यामुळेच आम्ही ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण करून घेतले पाहिजे. केंद्र सरकारने मनावर घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. संसदेत दोन तृतीयांश खासदारांपेक्षा अधिक संख्याबळ नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सकारात्मक आहेत, पंतप्रधान मोदी भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यांनी ती केली पाहिजे.

शिक्षण संस्था, साखर कारखानदारीत आपण पुढे आहे. उद्योगातही पुढे गेले पाहिजे. स्वत: मजबूत नसलो तर समाज मजबूत करता येणार नाही. मराठा समाज कमजोर आहे, असे समजू नका. मोठी ताकद आहे, ती दिल्लीपर्यंत दाखवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही शाहू छत्रपती यांनी केले.

आंदोलन संयमाचे व सर्वांना घेऊन जाणारे असावे

कोणत्याही प्रश्नांवरील आंदोलन हे संयमाचे, शांततेत व सर्वांना सोबत घेऊन जाणारे असावे. असे आपण खासदार संभाजीराजे यांना सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केल्याचे कौतुक वाटते, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले.