शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पंतप्रधानच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : संसदेत घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे आता निश्चित आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : संसदेत घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे आता निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणले तर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. मात्र ते आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, ती करावी, असे आवाहन शाहू छत्रपती यांनी केले.

शाहू छत्रपती म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार परवा भेटले, त्यांनीही राज्य सरकारच्या पातळीवरील प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकार आपल्यासोबत आहे, याबाबत आपणाला शंका वाटत नाही. तरीही मराठा आरक्षणासाठी खूप लढाई झाली, आता महाराष्ट्राने एकजुटीने पुढे गेले पाहिजे. पुनर्विचार याचिका दाखल करायला हरकत नाही, मात्र ही प्रक्रिया दीर्घ काळ आहे, त्यातून यश मिळेल असे नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

कोणाचे आरक्षण कमी करून आम्हाला नको आहे, त्यामुळेच आम्ही ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण करून घेतले पाहिजे. केंद्र सरकारने मनावर घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. संसदेत दोन तृतीयांश खासदारांपेक्षा अधिक संख्याबळ नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सकारात्मक आहेत, पंतप्रधान मोदी भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यांनी ती केली पाहिजे.

शिक्षण संस्था, साखर कारखानदारीत आपण पुढे आहे. उद्योगातही पुढे गेले पाहिजे. स्वत: मजबूत नसलो तर समाज मजबूत करता येणार नाही. मराठा समाज कमजोर आहे, असे समजू नका. मोठी ताकद आहे, ती दिल्लीपर्यंत दाखवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही शाहू छत्रपती यांनी केले.

आंदोलन संयमाचे व सर्वांना घेऊन जाणारे असावे

कोणत्याही प्रश्नांवरील आंदोलन हे संयमाचे, शांततेत व सर्वांना सोबत घेऊन जाणारे असावे. असे आपण खासदार संभाजीराजे यांना सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केल्याचे कौतुक वाटते, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले.