शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

'मुश्रीफ-सतेज' यांनी पुढाकार घेतला तरच 'गडहिंग्लज'ची वाट सुकर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST

राम मगदूम। गडहिंग्लज : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन शासनाची थकहमी व अर्थसाहाय्य ...

राम मगदूम।

गडहिंग्लज : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन शासनाची थकहमी व अर्थसाहाय्य उपलब्ध करण्यासाठी सहकार्य केले तरच गडहिंग्लज साखर कारखान्याची वाट सुकर होणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या सभासद, शेतकरी व कामगारांचे डोळे मंत्र्यांच्या भूमिकेकडे लागले आहेत.

सलग दोन वर्षे बंद असणारा आजरा साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी मंत्री मुश्रीफ व पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. यामुळेच जिल्हा बँकेच्या थकीत कर्जातून मुक्त होण्यास आजरा कारखान्याला मदत झाली.

तद्वत नवे कर्ज मिळून कारखाना सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला. म्हणूनच या कर्तबगार मंत्र्यांच्या भूमिकेकडे गडहिंग्लजकरही आशेने पाहत आहेत.

८ वर्षापूर्वी आर्थिक अरिष्टात सापडल्यामुळेच गडहिंग्लज कारखाना ब्रिस्क कंपनीला चालवायला देण्याची वेळ आली होती. त्यावेळीदेखील गडहिंग्लजचे लोकप्रतिनिधी म्हणून मुश्रीफ यांनीच पुढाकार घेतला होता. परंतु, आर्थिक तोटा व पोषक वातावरण नसल्याच्या कारणावरून कंपनीने याचवर्षी कारखाना सोडला आहे.

दरम्यान, 'ब्रिस्क'ने कारखाना सोडल्यानंतर कारखाना स्व:बळावर चालविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. परंतु, शासनाकडून थकहमी मिळाल्याशिवाय कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळणे अवघड आहे. म्हणूनच यंदाचा हंगाम सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे? हाच प्रश्न संचालकांना भेडसावत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठीच मंत्र्यांचे पाठबळ आवश्यक आहे.

चौकट :

मंत्र्याची आघाडीच सत्तेवर..!

सध्या गडहिंग्लज कारखान्यावर मंत्री मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राष्ट्रवादी-काँग्रेस व जनता दल' प्रणित शेतकरी आघाडी सत्तेवर आहे. त्यामुळे कारखाना आणि कंपनी यांच्यातील 'येणी-देणी'च्या वादावर मार्ग काढण्याबरोबरच कारखाना सुरू राहण्यासाठी मंत्रिद्वय नक्कीच मदत करतील, अशी आशा शेतकरी व कामगारांना आहे.

तांत्रिक सहकार्य उपलब्ध

'नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग'चे अध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी मशिनरीच्या दुरूस्ती व देखभालीसाठी नॅशनल हेव्हीकडून तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून दिले आहे.

चौकट :

आर्थिक पाठबळाची गरज

सध्या कारखान्यावर कोणतेही कर्ज नाही. नक्तमूल्य उणे असल्यामुळे कर्ज मिळण्यासाठी शासनाच्या थकहमीची गरज आहे. त्यासाठी आणि राज्य सहकारी बँक व जिल्हा बँकेच्या अर्थसाहाय्यासाठी विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी मंत्र्यांना साकडे घातले आहे. जि. प. माजी उपाध्यक्ष व संचालक सतीश पाटील, प्रकाश पताडे, अमर चव्हाण व बाळकृष्ण परीट यांनी मुंबईला जावून मंत्री मुश्रीफ व राज्य बँकेच्या अधिका-यांशी चर्चाही केली आहे.

गडहिंग्लज साखर कारखाना : ३००६२०२१-गड-०८