शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

केशरी रेशनकार्ड नावापुरतेच

By admin | Updated: February 26, 2015 00:08 IST

सव्वा लाख कार्डधारकांना धान्य नाही : ५५ टक्केच पात्र; तीन महिन्यांपासून धान्य नाही

प्रवीण देसाई -कोल्हापूर -शासनाने अन्नसुरक्षा योजनेत नसलेल्या केशरी कार्डधारकांपैकी जिल्ह्यातील फक्त ५० टक्के कार्डधारकांनाच सध्याच्या दराप्रमाणे धान्य दिले आहे. उर्वरितांना फक्त नावापुरतेच कार्डवर ठेवल्याचे चित्र आहे; कारण त्यांना अद्याप धान्याचा एक कणही मिळालेला नाही. जिल्ह्णातील २ लाख ८५ हजार ४७ केशरी कार्डधारकांपैकी १ लाख २९ हजार जणांचा यामध्ये समावेश आहे.अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य (अंत्योदय) व प्राधान्य (इतर) असे कार्डधारकांचे वर्गीकरण करण्यात आले आहेत. ही योजना सुरू होऊन एक वर्ष झाले आहे. यामध्ये या योजनेत पात्र न झालेले; परंतु ज्यांचे उत्पन्न लाखापेक्षा कमी आहे, अशा केशरी कार्डधारकांना सध्याच्या दराप्रमाणे रेशनवर लवकरच धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार हे धान्य दिले गेले; परंतु यासाठी पात्र असलेल्या २ लाख ८५ हजार ४७ जणांपैकी फक्त १ लाख ५५ हजार ४७७ कार्डधारकांनाच आतापर्यंत हे धान्य दिले गेले आहे. शासनाने हाच आकडा पात्रतेसाठी धरला आहे. उर्वरितांना एक कणही धान्य न मिळाल्याचे चित्र आहे. ज्यांना मिळत होते त्यांनाही नोव्हेंबरपासून धान्य मिळालेले नाही. कार्डधारकांना होणाऱ्या त्रासाबद्दल जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधल्यावर, याबाबत पात्र लाभार्थ्यांच्या धान्यासंदर्भात प्रत्येक महिन्याला लेखी कळविले आहे. त्याचबरोबर उर्वरित कार्डधारकांच्या समावेशासंदर्भातही शासनाला विचारणा केली आहे; परंतु कोणतेही उत्तर आले नसल्याचे सांगण्यात आले.अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना अद्याप सुरळीतपणे धान्यपुरवठा सुरू आहे. २४ लाख १३ हजार ९१५ लाभार्थ्यांना महिन्याला हे धान्य मिळत आहे. यातील प्राधान्य (इतर) कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ व प्राधान्य (अंत्योदय ) कार्डधारकांना प्रतिकार्ड २० किलो गहू व १५ किलो तांदूळ दिले जात आहेत.अन्नसुरक्षा योजनेतील धान्यपुरवठा सुरळीतप्राधान्य (इतर) ७०५५ ४७०३ ३ किलो २ किलो २ रुपये ३ रुपये २३५१६१५ प्राधान्य (अंत्योदय) १२४६ ९३४ २० किलो १५ किलो २ रुपये ३ रुपये ६२३०० केशरी कार्डधारक १०२५ ८३८ १० किलो ५ किलो ७.२० रु. ९.६० रु. १,५५,४७७