शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

शेतकऱ्यांचा विकास झाला तरच देश महासत्ता

By admin | Updated: October 27, 2015 23:57 IST

डी. वाय. पाटील : नद्याजोड प्रकल्पाल गती द्यावी

कोपार्डे : छत्रपती शाहू महाराजांनी शेतीला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचा व पर्यायाने खेड्यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल यादृष्टीने दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरणाची उभारणी केली. या थोर राजाचा आदर्श समोर ठेवून नद्याजोड प्रकल्पाला गती दिल्यास भारत जगात सहज महासत्ता बनेल, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. वाकरे (ता. करवीर) येथे ज्ञानू रामा पाटील सहकार समूहाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ते प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके होते. डॉ. पाटील म्हणाले, सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांचे हीत जोपासणे महत्त्वाचे आहे. जर शेतीला पाणी मिळाले तरच देशातील शेतकरी आपल्या कष्टाने शेती फुलवेल. यासाठी नद्याजोड प्रकल्पाला महत्त्व देणे फार महत्त्वाचे आहे. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, सहकारी संस्था व साखर कारखाने यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आर्थिक विकास झाला. राज्यात अडीच लाख सहकारी संस्थांमधील किमान ५० टक्के संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अरुण नरके, प्रदीप मालगावे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, जिल्हा परिषदेचे विलास पाटील, एस. आर. पाटील, पंचायत समिती सदस्या छाया माने, जयंत आसगावकर, कुंभीचे उपाध्यक्ष शामराव गोधडे, सरपंच लता माने, कुंभीचे संचालक भगवान पाटील, आनंदराव पाटील, जयसिंग पाटील, शंकर पाटील, सुभाष पाटील, भरत खाडे, किशोर पाटील, यल्लाप्पा कांबळे, पांडुरंग दाभोळकर, संजय पाटील उपस्थित होते. ‘ज्ञानू’स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. डी. वाय. पाटील, आमदार नरके यांच्या हस्ते करण्यात आले. समूहाचे नेते अनिल पाटील यांनी प्रास्ताविक, तर प्रा. एस. ए. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)