शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा विकास झाला तरच देश महासत्ता

By admin | Updated: October 27, 2015 23:57 IST

डी. वाय. पाटील : नद्याजोड प्रकल्पाल गती द्यावी

कोपार्डे : छत्रपती शाहू महाराजांनी शेतीला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचा व पर्यायाने खेड्यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल यादृष्टीने दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरणाची उभारणी केली. या थोर राजाचा आदर्श समोर ठेवून नद्याजोड प्रकल्पाला गती दिल्यास भारत जगात सहज महासत्ता बनेल, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. वाकरे (ता. करवीर) येथे ज्ञानू रामा पाटील सहकार समूहाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ते प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके होते. डॉ. पाटील म्हणाले, सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांचे हीत जोपासणे महत्त्वाचे आहे. जर शेतीला पाणी मिळाले तरच देशातील शेतकरी आपल्या कष्टाने शेती फुलवेल. यासाठी नद्याजोड प्रकल्पाला महत्त्व देणे फार महत्त्वाचे आहे. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, सहकारी संस्था व साखर कारखाने यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आर्थिक विकास झाला. राज्यात अडीच लाख सहकारी संस्थांमधील किमान ५० टक्के संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अरुण नरके, प्रदीप मालगावे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, जिल्हा परिषदेचे विलास पाटील, एस. आर. पाटील, पंचायत समिती सदस्या छाया माने, जयंत आसगावकर, कुंभीचे उपाध्यक्ष शामराव गोधडे, सरपंच लता माने, कुंभीचे संचालक भगवान पाटील, आनंदराव पाटील, जयसिंग पाटील, शंकर पाटील, सुभाष पाटील, भरत खाडे, किशोर पाटील, यल्लाप्पा कांबळे, पांडुरंग दाभोळकर, संजय पाटील उपस्थित होते. ‘ज्ञानू’स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. डी. वाय. पाटील, आमदार नरके यांच्या हस्ते करण्यात आले. समूहाचे नेते अनिल पाटील यांनी प्रास्ताविक, तर प्रा. एस. ए. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)