शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

शेतकऱ्यांचा विकास झाला तरच देश महासत्ता

By admin | Updated: October 27, 2015 23:57 IST

डी. वाय. पाटील : नद्याजोड प्रकल्पाल गती द्यावी

कोपार्डे : छत्रपती शाहू महाराजांनी शेतीला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचा व पर्यायाने खेड्यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल यादृष्टीने दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरणाची उभारणी केली. या थोर राजाचा आदर्श समोर ठेवून नद्याजोड प्रकल्पाला गती दिल्यास भारत जगात सहज महासत्ता बनेल, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. वाकरे (ता. करवीर) येथे ज्ञानू रामा पाटील सहकार समूहाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ते प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके होते. डॉ. पाटील म्हणाले, सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांचे हीत जोपासणे महत्त्वाचे आहे. जर शेतीला पाणी मिळाले तरच देशातील शेतकरी आपल्या कष्टाने शेती फुलवेल. यासाठी नद्याजोड प्रकल्पाला महत्त्व देणे फार महत्त्वाचे आहे. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, सहकारी संस्था व साखर कारखाने यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आर्थिक विकास झाला. राज्यात अडीच लाख सहकारी संस्थांमधील किमान ५० टक्के संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अरुण नरके, प्रदीप मालगावे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, जिल्हा परिषदेचे विलास पाटील, एस. आर. पाटील, पंचायत समिती सदस्या छाया माने, जयंत आसगावकर, कुंभीचे उपाध्यक्ष शामराव गोधडे, सरपंच लता माने, कुंभीचे संचालक भगवान पाटील, आनंदराव पाटील, जयसिंग पाटील, शंकर पाटील, सुभाष पाटील, भरत खाडे, किशोर पाटील, यल्लाप्पा कांबळे, पांडुरंग दाभोळकर, संजय पाटील उपस्थित होते. ‘ज्ञानू’स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. डी. वाय. पाटील, आमदार नरके यांच्या हस्ते करण्यात आले. समूहाचे नेते अनिल पाटील यांनी प्रास्ताविक, तर प्रा. एस. ए. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)