शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जिल्ह्यात केवळ २८८ रुग्ण कोरोनामुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST

कोल्हापूर : प्रतिबंधात्मक लस केव्हा यायची तेव्हा येवो; कोल्हापुरातून मात्र कोरोनाचा संसर्ग लसीशिवाय हद्दपार होऊ लागला आहे. शुक्रवारी केवळ ...

कोल्हापूर : प्रतिबंधात्मक लस केव्हा यायची तेव्हा येवो; कोल्हापुरातून मात्र कोरोनाचा संसर्ग लसीशिवाय हद्दपार होऊ लागला आहे. शुक्रवारी केवळ नवीन २२ कोरोना रुग्णांची नोंद झाली; तर ४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ २८८ रुग्ण कोरोनामुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. रुग्णांना ठेवायला रुग्णालये अपुरी पडली. अनेकांना उपचार मिळाले नाहीत. शेवटी स्वत:च्या घरातच अलगीकरणात राहून डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपचार घ्यावे लागले होते, एवढी भयानक परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली होती.

कोरोना प्रतिबंधक लस केव्हा येणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आता ही लस केव्हा यायची तेव्हा येवो; कोल्हापूरकर मात्र लसीशिवाय कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. जिल्ह्यात आता केवळ २८८ रुग्ण उपचार घेत असल्याने तेही लवकरच कोरोनामुक्त होतील, अशी अपेक्षा आहे.

सध्या २८८ पैकी १६० रुग्ण तर स्वत:च्या घरातच उपचार घेत आहेत. १२८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या मानगुटीवरील कोरोनाचे भूत पूर्णपणे उतरले आहे. जिल्ह्यात सगळीकडे भयमुक्त वातावरण असले तरी नागरिक पुन्हा संसर्ग वाढू नये म्हणून पुरेशी काळजी घेत आहेत. दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने सगळेच दक्ष आहेत.

शुक्रवारी कोल्हापूर शहरात सहा, शिरोळ तालुक्यात तीन, हातकणंगले तालु्क्यात दोन; तर राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज तालुक्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार १३२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यांपैकी १६८७ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४७ हजार १५८ रुग्ण पूर्ण बरे झाले.